शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
2
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
3
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
4
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
5
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
6
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
7
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
8
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
9
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
10
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
11
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
12
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
13
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
14
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
15
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
16
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
17
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
18
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
19
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
20
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन कार्यालय २४ तास अलर्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST

जळगाव : उन, वारा असो किंवा पाऊस. आगीची घटना असो किंवा शहरातील इतर आपत्कालीन परिस्थिती असो. या सर्व संकटांचे ...

जळगाव : उन, वारा असो किंवा पाऊस. आगीची घटना असो किंवा शहरातील इतर आपत्कालीन परिस्थिती असो. या सर्व संकटांचे निवारण करण्यासाठी मनपाचा अग्निशमन विभाग हा रात्री उशिरादेखील अलर्ट असल्याचे दिसून आले. मनपा इमारतीच्या पाठीमागील गोलाणी मार्केटच्या संकुलात असलेल्या `मनपा अग्निशमन विभागाच्या कार्यालयात`लोकमत प्रतिनिधीने पाहणी केली असता, एक कर्मचारी जागा असलेला दिसून आला, तर इतरही कर्मचारींही कर्तव्याचे पालन करित कार्यालयात उपस्थित असलेले दिसून आले.

शहर व परिसरातील आगी सारख्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेचे शहरातील गोलाणी मार्केट, महाबळ कॉलनी व शिवाजी नगर या तीन ठिकाणी अग्निशमन केंद्र आहेत. सध्या अग्निशमन विभागाकडे पाच मोठे व दोन छोटे बंब आहेत. तसेच उंच इमारतीवरील आग विझविण्यासाठी ३५ फुटांपर्यंतच्या पाच सीडी असून, ५० छोटे सिलेंडर आहेत. तर अधिकाऱ्यांसह ५० कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. दरम्यान, `लोकमत` प्रतिनिधीने शहरातील गोलाणी मार्केटच्या संकुलातील केंद्राची पाहणी केली असता, या ठिकाणी दोन चालक, दोन फायरमन व त्यांच्या सोबतीला पुन्हा दोन सहायक फायरमन दिसून आले. यातील एक कर्मचारी टेलीफोन जवळ बसलेला दिसून आला. आगीचा फोन येताच, माहिती देणाऱ्याचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर घेऊन त्या ठिकाणी अग्निशमन बंब पाठविण्याची जबाबदारी या कर्मचावर सोपविण्यात आलेली दिसून आली.

इन्फो :

तयार स्थितीत बंब दोन

`लोकमत` प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत या ठिकाणी तीन बंबांमध्ये पाणी भरून तयार असलेले दिसून आले. तसेच या गाडींवरचे चालकही अग्निशमन कार्यालयात उपस्थित असलेले दिसून आले. पाणी भरण्याची या ठिकाणीच सुविधा असल्यामुळे, अवघ्या अर्धा तासात बंब भरला जात असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

सर्व कर्मचारी जागे :

`लोकमत` प्रतिनिधीने रविवारी रात्री अकराच्या सुमारास केलेल्या पाहणीत एक कर्मचारी टेलीफोन जवळ खुर्चीवर बसलेला होता. तर इतर कर्मचारीही आपसात चर्चा करित होते. तर काही कर्मचारी कार्यालयात बसलेले दिसून आले. सकाळी आठ ते दुपारी चार, दुपारी चार ते बारा व त्यानंतर बारा ते सकाळी आठ असे येथील कर्मचाऱ्यांच्या डयुट्या लावण्यात आलेल्या आहेत. रात्रपाळीच्या डयुटीवर असलेले कर्मचारीदेखील सर्व जण आराम न करता, उर्वरित कर्मचारी हे जागे राहत असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

नियम काय सांगतो :

नगरपालिका असो किंवा महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या डयुटीच्या वेळेस सावध राहणे गरजेचे आहे. आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी बंबासह व इतर सर्व साहित्य तयार ठेवणे गरजेचे आहे. तसेच आगीच्या घटना मोठी असल्यास सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्याना घटनेच्या ठिकाणी कर्तव्यावर बोलावणे गरजेचे आहे.

इन्फो :

आगीची घटना असो किंवा इतर कुठलीही आपात्कीन घटना असो, त्यासाठी मनपाचे अग्निशमन विभागातील कर्तव्यावर असलेले कर्मचारी आपले साहित्य तयार ठेवून सदैव जागरूक असतात. घटनेबाबत दुरध्वनी आला की लगेचच कर्मचारी घटनास्थळी जातात. घटना मोठी असल्यास सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्यानांही बोलावले जाते.

शशिकांत बारी, प्रमुख, अग्निशमन विभाग, मनपा

शहरातील कार्यालय गोलाणी मार्केट, महाबळ कॉलनी, शिवाजी नगर,

कर्मचारी संख्या ५५

बंब ५ मोठे

छोटे-२

सीड्या ३५ - ५

छोटे सिलेंडर : ५०