शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या दुरावस्थेमुळे होणाऱ्या अपघातप्रकरणी सात दिवसात गुन्हे दाखल करा; अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:16 IST

एस.पींची भेट घेऊन जिल्हा पेठला दिली तक्रार

जळगाव : राष्टÑीय महामार्गावर पडलेले खड्डे व रखडलेले चौपदरीकरण यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या तीन वर्षात हजारो लोकांचा या रस्त्यांनी बळी घेतला आहे. या साºया घटनांना ‘नही’चे संचालक, रस्त्याचे प्रोजेक्ट इंचार्ज व ठेकेदार जबाबदार आहेत.या सर्वांविरुध्द सात दिवसाच्या आत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा त्यांना काळे फासण्यासह ठोकून काढण्याचा इशारा शिवसेनेने गुरुवारी दिला.एरंडोल व पिंंपळकोठा या दरम्यान महामार्गावर सोमवारी ट्रक व कालीपीलीच्या अपघातात नऊ प्रवाशांचा बळी गेला व ११ जण जखमी झाले. खराब रस्ते, त्यावर पडलेले खड्डे व रखडलेले चौपदरीकरण या घटनेला जबाबदार असल्याने शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख गजानन मालुपरे यांनी गुरुवारी जिल्हा पेठ पोलिसांकडे लेखी तक्रार देवून जबाबदार यंत्रणेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, ही लेखी तक्रारच फिर्याद समजावी, पाच दिवसात चौकशी करावी व सात दिवसात गुन्हा दाखल करावा असा अल्टिमेटम मालपुरे यांनी पोलिसांना दिला. पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी तक्रार स्विकारल्यानंतर याप्रकरणात चौकशी करुन न्याय देवू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.यावेळी नीलेश पाटील, राजेंद्र पाटील, चेतन प्रभुदेसाई, लोकेश पाटील, माजी उपमहानगर प्रमुख राहूल नेतलेकर, सुनील ठाकूर, भैय्या वाघ, महेंद्र सोनवणे, बापू मेने, राहूल शिंदे, विजय चौधरी, विक्की पाटील, विनायक पाटील, ललित कोतवाल, स्वप्नील घुगे, विराज कावडिया, अमित जगताप व भाजपचे अशोक लाडवंजारी उपस्थित होते.अधिकारी व कंत्राटदारात हातमिळवणी ! तीन वर्षात दोन हजारावर लोकांचा बळीतरसोद ते फागणे दरम्यानचे महामार्ग रस्ता रुंदीकरणाचे काम लांबणीवर पडले आहे. नियमाप्रमाणे रस्ता रुंदीकरण करताना रस्त्याच्या बाजुचे रुंदीकरण आधी करायला हवे, त्यानंतर मुख्य रस्ता दुरुस्ती किंवा नवीन काम सुरु होणे अपेक्षित आहे. मात्र यात नहीचे अधिकारी व कंत्राटदार यांनी हातमिळवणी करुन मुख्य रस्ता हेतुपुरस्सरपणे खोदून ठेवला आहे, त्यामुळे वाहनांचे अपघात व पादचाºयांचाही जीव जात आहे. या तीन वर्षात दोन हजाराच्यावर लोकांचा या मार्गावर जीव गेला आहे. सोमवारी एरंडोलजवळ झालेला अपघात व त्यात ९ जणांचे गेलेले बळी याला हीच यंत्रणा जबाबदार आहे.याआधीही पारोळा व बांभोरीजवळ अपघात झाले व त्यात अनेकांचे बळी गेले आहेत.जनतेसाठी अंगावर गुन्हे घेऊगजानन मालपुरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, महामार्गावर निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. त्यात सरकारी अधिकारी व कंत्राटदार याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. आता अंत पाहिला जात आहे. सात दिवसात गुन्हे दाखल झाले नाही तर उग्र आंदोलन छेडले जाईल, त्यात अधिकारी व कंत्राटदारांना काळे फासू, कार्यालयात जावून ठोकून काढले जाईल. जनतेसाठी अंगावर गुन्हे घेण्याची तयारी आहे. पोलिसांना गुन्हे दाखल करायला भाग पाडले जाईल, असे मालपुरे यांनी सांगितले.जिल्हाधिकारी, नहीच्या अधिकाºयांसोबत बैठकगुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला जमण्याचे आवाहन केल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी गजानन मालपुरे यांना चर्चेसाठी बोलावले. त्यांच्या दालनात झालेल्या चर्चेनुसार जिल्हाधिकारी रजेवर गेले असून ते आल्यानंतर ३० किंवा ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी, नहीचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन यावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन डॉ.उगले यांनी दिल्यानंतर आज गुन्हा दाखल न करता तक्रार अर्ज दिला असे मालपुरे यांनी सांगितले.गजानन मालपुरे व सहकाºयांची पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामुळे आज गुन्हा दाखल न करता तक्रारी अर्ज घेतला. वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल.- अकबर पटेल, पोलीस निरीक्षक, जिल्हा पेठनहीचे अधिकारी व कंत्राटदार यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आज जिल्हा पेठ पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. पोलीस अधीक्षकांशीही चर्चा झाली. सात दिवसानंतर न्यायालयात जाण्यासह आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे.- गजानन मालपुरे, माजी महानगर प्रमुख, शिवसेना

टॅग्स :Jalgaonजळगाव