शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या दुरावस्थेमुळे होणाऱ्या अपघातप्रकरणी सात दिवसात गुन्हे दाखल करा; अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:16 IST

एस.पींची भेट घेऊन जिल्हा पेठला दिली तक्रार

जळगाव : राष्टÑीय महामार्गावर पडलेले खड्डे व रखडलेले चौपदरीकरण यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या तीन वर्षात हजारो लोकांचा या रस्त्यांनी बळी घेतला आहे. या साºया घटनांना ‘नही’चे संचालक, रस्त्याचे प्रोजेक्ट इंचार्ज व ठेकेदार जबाबदार आहेत.या सर्वांविरुध्द सात दिवसाच्या आत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा त्यांना काळे फासण्यासह ठोकून काढण्याचा इशारा शिवसेनेने गुरुवारी दिला.एरंडोल व पिंंपळकोठा या दरम्यान महामार्गावर सोमवारी ट्रक व कालीपीलीच्या अपघातात नऊ प्रवाशांचा बळी गेला व ११ जण जखमी झाले. खराब रस्ते, त्यावर पडलेले खड्डे व रखडलेले चौपदरीकरण या घटनेला जबाबदार असल्याने शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख गजानन मालुपरे यांनी गुरुवारी जिल्हा पेठ पोलिसांकडे लेखी तक्रार देवून जबाबदार यंत्रणेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, ही लेखी तक्रारच फिर्याद समजावी, पाच दिवसात चौकशी करावी व सात दिवसात गुन्हा दाखल करावा असा अल्टिमेटम मालपुरे यांनी पोलिसांना दिला. पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी तक्रार स्विकारल्यानंतर याप्रकरणात चौकशी करुन न्याय देवू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.यावेळी नीलेश पाटील, राजेंद्र पाटील, चेतन प्रभुदेसाई, लोकेश पाटील, माजी उपमहानगर प्रमुख राहूल नेतलेकर, सुनील ठाकूर, भैय्या वाघ, महेंद्र सोनवणे, बापू मेने, राहूल शिंदे, विजय चौधरी, विक्की पाटील, विनायक पाटील, ललित कोतवाल, स्वप्नील घुगे, विराज कावडिया, अमित जगताप व भाजपचे अशोक लाडवंजारी उपस्थित होते.अधिकारी व कंत्राटदारात हातमिळवणी ! तीन वर्षात दोन हजारावर लोकांचा बळीतरसोद ते फागणे दरम्यानचे महामार्ग रस्ता रुंदीकरणाचे काम लांबणीवर पडले आहे. नियमाप्रमाणे रस्ता रुंदीकरण करताना रस्त्याच्या बाजुचे रुंदीकरण आधी करायला हवे, त्यानंतर मुख्य रस्ता दुरुस्ती किंवा नवीन काम सुरु होणे अपेक्षित आहे. मात्र यात नहीचे अधिकारी व कंत्राटदार यांनी हातमिळवणी करुन मुख्य रस्ता हेतुपुरस्सरपणे खोदून ठेवला आहे, त्यामुळे वाहनांचे अपघात व पादचाºयांचाही जीव जात आहे. या तीन वर्षात दोन हजाराच्यावर लोकांचा या मार्गावर जीव गेला आहे. सोमवारी एरंडोलजवळ झालेला अपघात व त्यात ९ जणांचे गेलेले बळी याला हीच यंत्रणा जबाबदार आहे.याआधीही पारोळा व बांभोरीजवळ अपघात झाले व त्यात अनेकांचे बळी गेले आहेत.जनतेसाठी अंगावर गुन्हे घेऊगजानन मालपुरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, महामार्गावर निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. त्यात सरकारी अधिकारी व कंत्राटदार याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. आता अंत पाहिला जात आहे. सात दिवसात गुन्हे दाखल झाले नाही तर उग्र आंदोलन छेडले जाईल, त्यात अधिकारी व कंत्राटदारांना काळे फासू, कार्यालयात जावून ठोकून काढले जाईल. जनतेसाठी अंगावर गुन्हे घेण्याची तयारी आहे. पोलिसांना गुन्हे दाखल करायला भाग पाडले जाईल, असे मालपुरे यांनी सांगितले.जिल्हाधिकारी, नहीच्या अधिकाºयांसोबत बैठकगुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला जमण्याचे आवाहन केल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी गजानन मालपुरे यांना चर्चेसाठी बोलावले. त्यांच्या दालनात झालेल्या चर्चेनुसार जिल्हाधिकारी रजेवर गेले असून ते आल्यानंतर ३० किंवा ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी, नहीचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन यावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन डॉ.उगले यांनी दिल्यानंतर आज गुन्हा दाखल न करता तक्रार अर्ज दिला असे मालपुरे यांनी सांगितले.गजानन मालपुरे व सहकाºयांची पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामुळे आज गुन्हा दाखल न करता तक्रारी अर्ज घेतला. वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल.- अकबर पटेल, पोलीस निरीक्षक, जिल्हा पेठनहीचे अधिकारी व कंत्राटदार यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आज जिल्हा पेठ पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. पोलीस अधीक्षकांशीही चर्चा झाली. सात दिवसानंतर न्यायालयात जाण्यासह आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे.- गजानन मालपुरे, माजी महानगर प्रमुख, शिवसेना

टॅग्स :Jalgaonजळगाव