शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

गरिबीशी लढले, नाते फोटोग्राफीशी जुळले..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 12:10 IST

तीन पिढ्यांचा संघर्ष : शून्यातून विश्व निर्माण केलेल्या जगताप कुटुंबियांची कहाणी..

जळगाव : कमी पगाराच्या नोकरीपासून सुरुवात झाली. गरिबीशी लढता लढता रोजचा संघर्ष थांबत नव्हता. एका फोटो स्टुडिओत काम मिळालं अन् तेथे हळूहळू फोटो कसे काढायचे हे शिकत गेले. तीही नोकरी सोडली अन् स्वत:चा स्टुडिओ टाकला. पण परिस्थिती पाठ सोडत नव्हती अन् तेही पुढे जायचं थांबत नव्हते. अखेर जम बसला अन् फोटोग्राफीत रुळलो. आज त्यांचे जळगावात सहा स्टुडिओ आहेत. तीन पिढ्या, रोजचा संघर्ष अन् रोज फोटोग्राफीत नव्याने होणारे बदल या सर्व बाबींना एक नव्हे ती तिन्ही पिढ्यांनी स्वीकारले, काळासोबत चालले.शून्यातून घडलेल्या एका जुन्या फोटोग्राफरच्या कुटुंबाची ही कहाणी... नाव सुधाकर रामचंद्र जगताप. आज त्यांची तिसरी पिढीही फोटोग्राफी करून जगतेय अन् यशस्वीपणे हा उद्योग संभाळत आहे.जळगावातील मिलमध्ये असलेली नोकरी ही मजुरासारखी! त्या उत्पन्नातून काहीच भागत नसल्याने जगताप यांनी नोकरीला रामराम केला अन् नाना पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली ते एका स्टुडिओत काम करत असताना फोटोग्राफी शिकले अन् काही दिवसांनी, १९७०मध्ये त्यांनी सतीश फोटो स्टुडिओ नावाने स्टुडिओ सुरु केला. छोटा कॅमेरा घेऊन ते फोटो काढायचे.पहाटे ६ वाजता त्यांचा हा व्यवसाय सुरु व्हायचा तो मध्यरात्री १.३० वाजता संपायचा. त्यावेळी दोन चार महिने अगोदर फोटोग्राफीसाठी तारीख निश्चित केली जायची. या स्टुडिओमुळे आर्थिक व्यवस्था सुधारत गेली. त्यानंतर मार्तंड फोटो स्टुडिओ सुरु केला, नवी पेठेत १९७८ साली.त्यानंतर सतीश जगताप यांनी १४व्या वर्षापासून फोटोग्राफीचे काम करायला सुरुवात केली. १९८४-८५मध्ये रंगीत फोटोग्राफीला मागणी वाढली अन् व्यवसाय आणखी चांगला सुरु झाला. त्याचे पैसेही चांगले मिळायचे. ते फोटो धुण्यासाठी मुंबईत पाठवावे लागत.सहा महिन्यांनी ते मिळायचे. त्यानंतर व्हिडिओ शुटींग आले. प्रेस फोटोग्राफर म्हणून काम करायची संधी मिळाली. त्यामुळे व्यवसायात आणखीनच बहर आली.शुभम् जगताप, आज जगताप कुटुंबातील तिसरी पिढी या व्यवसायात उतरली आहे. फोटोग्राफीतील बदल, आव्हाने सर्व काही स्वीकारून सहा स्टुडिओचा भार संभाळत शुभम्ही या व्यवसायात उतरला आहे.राजीव गांधींची जळगाव भेट अन् आठ दिवसातच हत्या..माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी हत्या झाली होती. त्याच्या आठ दिवस अगोदर ते जळगावात कॉंग्रेसच्या एका कार्यक्रमासाठी आले होते. ते छायाचित्र टिपण्याचा मान सतीश जगताप यांना मिळाला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या माजी राष्टपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडे आल्या होत्या, त्यांचे छायाचित्र सुधाकर जगताप यांनी टिपले होते.- जुन्या काळात फोटो काढल्यानंतर तो एका विशिष्ट पाण्यात धुवावा लागे. ते पाणी घेण्याचीही ऐपत नसायची. त्यावेळी अन्य मोठ्या फोटोग्राफरकडून आम्ही ते करवून घ्यायचो. पण सेवेत खंड पडू दिला नाही, असे सतीश जगताप सांगतात.सुरुवातीपासून एक तत्व आम्ही जपलं. पैसे किती मिळतील, हे न पाहता आम्ही काही फोटोसाठीही इंदौर, विशाखापट्टणम गाठले. पण आॅर्डर कोणतीही सोडली नाही. त्यामुळे जास्त करून आमचा व्यवसाय बहरत गेला.-सतीश जगताप, छायाचित्रकार

टॅग्स :Photography Dayफोटोग्राफी डेJalgaonजळगाव