शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मळगावला पाणी अन् जगण्यासाठी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:10 IST

भडगाव तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे सर्वत्र दुष्काळीस्थिती आहे. मळगाव येथील नागरिकांचा पाण्यासाठी आणि जगण्यासाठी संघर्ष सुरु असताना रोजगार व घोटभर पाण्यासाठी स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देपरिसरातील तिनही पाझर तलाव आटलेपिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांवर स्थलांतराची वेळकमी पावसामुळे शेतातील हंगाम गेला

भडगाव : तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे सर्वत्र दुष्काळीस्थिती आहे. मळगाव येथील नागरिकांचा पाण्यासाठी आणि जगण्यासाठी संघर्ष सुरु असताना रोजगार व घोटभर पाण्यासाठी स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच गावाला भीषण दुष्काळाच्या झळा बसत आहेत.भडगाव तालुक्यातील मळगाव डोंगराळ भागात बसले आहे. तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या या गावाची ७५१ इतकी लोकसंख्या आहे. या परिसरात छोटे ३ पाझर तलाव आहेत. मात्र पावसाळा कमी झाल्यानंतर ते कोरडे पडतात. त्यामुळे नागरीकांना नेहमी पाणीटंचाईशी सामना करावा लागतो. यापूर्वीही गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा लागला आहे.नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांचा पाण्याचा प्रश्न, चाºयाचा प्रश्न बिकट होत आहे. सद्यस्थितीला ४० टक्के लोक रोजगारासाठी परजिल्हयात स्थलांतरीत झाले आहेत.मळगावात मुख्य व्यवसाय शेती आहे. शेती पाण्यावर अवलंबुन असते. येथे मात्र पावसाळयावर शेती अवलंबुन असते. कारण शेतशिवार कोरडवाहू अन् डोंगराळ भागात आहे. कपाशी, ज्वारी, बाजरी, तुर, मुग, उडीद यासह अन्य पिकांची पेरणी केली होती. कमी पावसामुळे जेमतेम उत्पन्न शेतकºयांच्या हाती आले. मुग, तुर, उडीद, सोयाबीन पिकाचा दाणाही आला नाही.सतत दुष्काळी स्थितीशी सामना करीत यावर्षीही पिकांसाठी केलेला खर्चही शेतकºयांचा निघाला नाही. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पाऊस रुसला अन् बळीराजा दुखला अशी स्थिती या भागातील आहे.

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव