शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात बारावीच्या विद्यार्थ्यांना पुरवणी न मिळाल्याने तीव्र संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 12:24 IST

विद्यार्थिनींना अश्रू अनावर

ठळक मुद्देनूतन मराठा महाविद्यालयातील प्रकारप्राचार्यांनी घातली समजूत

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १० - नूतन मराठा महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर शुक्रवारी झालेल्या बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपर दरम्यान अर्धातास शिल्लक असताना पुरवणी न मिळाल्याने विद्यार्थिनी व पालकांनी पेपर संपल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, पेपरला दहा मिनीटे शिल्लक असताना पुरवणी देता येत नाही असा नियम असल्याची माहिती केंद्र संचालकांनी दिली.शुक्रवारी अर्थशास्त्र या विषयाचा पेपर सकाळी ११ ते २ वाजेदरम्यान होता. नूतन मराठा महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एका इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिका पूर्ण लिहून झाल्याने पुरवणीची मागणी केली. तेव्हा पेपर संपायला ३० ते ३५ मिनीटांचा अवधी शिल्लक होता. मात्र, पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना पुरवणी देण्यास नकार दिला. आग्रह केल्यानंतरही पर्यवेक्षकाने विद्यार्थ्यांना पुरवणी न दिल्याने २० ते २५ गुणांचा पेपर अर्धातास शिल्लक असतानाही लिहिता आला नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी याबाबत पालकांना माहिती दिली. पालकांनी थेट मुख्याध्यापक व इतर प्राध्यापकांकडे जावून याबाबत तक्रार केली.प्राचार्यांनी घातली समजूत‘त्या’ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी याबाबत स्कूलच्या प्राचार्यांकडे तक्रार केल्यानंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्या नूतन मराठा महाविद्यालयात पोहचल्या. झालेल्या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती घेतल्यानंतर केंद्र संचालक व पर्यवेक्षकांशी त्यांनी चर्चा केली.या चर्चेनंतर ज्या विद्यार्थ्यांना पुरवणी मिळाली नाही त्यांची नावे लिहून घेण्यात आली.मात्र, पालक व विद्यार्थी पर्यवेक्षकावर कारवाईच्या मागणीवर ठाम होते. प्राचार्यांनी पालक व विद्यार्थ्यांची समजूत घातल्यानंतर हा गोंधळ शांत झाला. मात्र एकूणच या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.पर्यवेक्षकावर कारवाई करा२० ते २५ विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी मुख्याध्यापकांच्या दालनात जावून विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याने पर्यवेक्षकावर कारवाईची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या नुकसानीबाबत शिक्षणाधिकाºयांकडे व न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. यावेळी अनेक विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले होते. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या पेपर दरम्यान देखील विद्यार्थ्यांना पुरवणी मिळाली नसल्याची तक्रार पालकांनी केली. पेपर संपल्यानंतर सुमारे १ तास महाविद्यालयात गोंधळ सुरुच होता.प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या आवश्यकतेनुसार पुरवणी देण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी पेपर संपायला अवघे १० मिनीटे शिल्लक असताना पुरवणीची मागणी केली. मात्र, नियमानुसार पेपर संपायला १० मिनीटे बाकी असताना पुरवणी देता नसल्याने त्या विद्यार्थ्यांना पुरवणी देण्यात आली नाही.-प्रा.एस.डी.सुर्वे, केंद्र संचालक

टॅग्स :Jalgaonजळगावexamपरीक्षा