शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

जळगावात बारावीच्या विद्यार्थ्यांना पुरवणी न मिळाल्याने तीव्र संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 12:24 IST

विद्यार्थिनींना अश्रू अनावर

ठळक मुद्देनूतन मराठा महाविद्यालयातील प्रकारप्राचार्यांनी घातली समजूत

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १० - नूतन मराठा महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर शुक्रवारी झालेल्या बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपर दरम्यान अर्धातास शिल्लक असताना पुरवणी न मिळाल्याने विद्यार्थिनी व पालकांनी पेपर संपल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, पेपरला दहा मिनीटे शिल्लक असताना पुरवणी देता येत नाही असा नियम असल्याची माहिती केंद्र संचालकांनी दिली.शुक्रवारी अर्थशास्त्र या विषयाचा पेपर सकाळी ११ ते २ वाजेदरम्यान होता. नूतन मराठा महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एका इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिका पूर्ण लिहून झाल्याने पुरवणीची मागणी केली. तेव्हा पेपर संपायला ३० ते ३५ मिनीटांचा अवधी शिल्लक होता. मात्र, पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना पुरवणी देण्यास नकार दिला. आग्रह केल्यानंतरही पर्यवेक्षकाने विद्यार्थ्यांना पुरवणी न दिल्याने २० ते २५ गुणांचा पेपर अर्धातास शिल्लक असतानाही लिहिता आला नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी याबाबत पालकांना माहिती दिली. पालकांनी थेट मुख्याध्यापक व इतर प्राध्यापकांकडे जावून याबाबत तक्रार केली.प्राचार्यांनी घातली समजूत‘त्या’ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी याबाबत स्कूलच्या प्राचार्यांकडे तक्रार केल्यानंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्या नूतन मराठा महाविद्यालयात पोहचल्या. झालेल्या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती घेतल्यानंतर केंद्र संचालक व पर्यवेक्षकांशी त्यांनी चर्चा केली.या चर्चेनंतर ज्या विद्यार्थ्यांना पुरवणी मिळाली नाही त्यांची नावे लिहून घेण्यात आली.मात्र, पालक व विद्यार्थी पर्यवेक्षकावर कारवाईच्या मागणीवर ठाम होते. प्राचार्यांनी पालक व विद्यार्थ्यांची समजूत घातल्यानंतर हा गोंधळ शांत झाला. मात्र एकूणच या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.पर्यवेक्षकावर कारवाई करा२० ते २५ विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी मुख्याध्यापकांच्या दालनात जावून विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याने पर्यवेक्षकावर कारवाईची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या नुकसानीबाबत शिक्षणाधिकाºयांकडे व न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. यावेळी अनेक विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले होते. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या पेपर दरम्यान देखील विद्यार्थ्यांना पुरवणी मिळाली नसल्याची तक्रार पालकांनी केली. पेपर संपल्यानंतर सुमारे १ तास महाविद्यालयात गोंधळ सुरुच होता.प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या आवश्यकतेनुसार पुरवणी देण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी पेपर संपायला अवघे १० मिनीटे शिल्लक असताना पुरवणीची मागणी केली. मात्र, नियमानुसार पेपर संपायला १० मिनीटे बाकी असताना पुरवणी देता नसल्याने त्या विद्यार्थ्यांना पुरवणी देण्यात आली नाही.-प्रा.एस.डी.सुर्वे, केंद्र संचालक

टॅग्स :Jalgaonजळगावexamपरीक्षा