शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

राज्यातील सैनिकी शाळांमधील आदिवासी मुलांच्या तुकड्या बंदचा फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:21 IST

संजय पाटील अमळनेर : राज्यातील सर्व २१ सैनिकी शाळांच्या आदिवासी तुकड्यांवर नियुक्त शिक्षक कर्मचारी शासनाच्या संदिग्ध निर्णयामुळे गेल्या ...

संजय पाटील

अमळनेर : राज्यातील सर्व २१ सैनिकी शाळांच्या आदिवासी तुकड्यांवर नियुक्त शिक्षक कर्मचारी शासनाच्या संदिग्ध निर्णयामुळे गेल्या पाच महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत. आधीच कोरोनाच्या काळात आजारांवर खर्च करून शिक्षकांना उपजीविका करणे कठीण झाले आहे. त्यात शासनाने तुकड्या बंद करण्याचा फतवा काढला आहे.

सैन्य दलाविषयी तरुणांच्या मनात आवड निर्माण व्हावी म्हणून राज्यात प्रत्येक जिल्ह्यावर निवासी सैनिक शाळांना मान्यता देण्यात आली आहे. त्यात आदिवासी मुलांनादेखील संधी मिळावी म्हणून सर्वसाधारण विद्यार्थी व आदिवासी विद्यार्थी, असे दोन गट करण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांचे वेतनदेखील दोन हेडखाली काढण्यात येते.

गेल्यावर्षी शासनाने पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सैनिकी शाळांना पाचवीच्या वर्गात प्रवेश देऊ नये, असे आदेश शासनाने दिले होते. त्यामुळे पाचवीचे वर्ग बंद पडले. यंदाच्या वर्षी मात्र शासनाकडून सैनिकी शाळेत पाचवी व सहावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या तुकडीवर काम करणाऱ्या शिक्षकांचे वेतन आदिवासी हेडखाली काढू नये, असा आदेश आल्याने शिक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. या शिक्षकांचे वेतन कसे काढावे, व्यवस्थापनालादेखील हा प्रश्न पडल्याने तक्रारी गेल्या, तर संबंधित विभागाने त्यांचे अनुदानच थांबवले. त्यामुळे मार्चपासून राज्यातील सर्व सैनिक शाळातील आदिवासी तुकड्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन थांबले आहे.

चौकट

पगार नसल्याने भंडारा जिल्ह्यातील एका शिक्षकाचा उपचार करायला पुरेसा पैसे नसल्याने कोरोनामुळे, तर अमळनेर येथील एका शिक्षकांचा कावीळच्या आजाराने मृत्यू झाला आहे.

कोट

कोरोनाच्या काळात वडील, आई, मुलगी यांचा आजाराने मृत्यू झाला आहे. दवाखान्यात लाखो रुपये खर्च झाले आहेत. पाच महिन्यांपासून पगार नाही. आता जगावे कसे, असा प्रश्न पडला आहे? -उमेश काटे, आर्मी स्कूल, अमळनेर

कोट

आदिवासीमंत्री के.सी. पाडवी यांनी सैनिकी शाळांतील आदिवासी तुकड्या बंद करण्याचे चुकीचे धोरण अवलंबल्यामुळे शिक्षकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. याबाबत न्यायासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.

-विजय नवल पाटील, राज्याध्यक्ष, खाजगी संस्थाचालक संघटना