शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

दुरांतो एक्सप्रेसमध्ये मुलाच्या डोळ्यादेखत पित्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 12:05 IST

जळगाव रेल्वे स्थानकावर प्रचंड गोंधळ

ठळक मुद्देरात्री ११.५० पर्यंत दुरान्तो खोळंबलीनियंत्रण कक्षाने घेतली नाही दखल

जळगाव : मुंबईहून निघालेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-इलाहाबाद दुरांतो एक्सप्रेसमध्ये दिनेश बालमुकूंद शुक्ला (वय ५२, रा.डोंबिवली, जि.ठाणे, मुळ रा.इलाहाबाद) या प्रवाशाला सोमवारी रात्री १०.१५ वाजता चाळीसगावनजीक ह्दयविकाराचा झटका आला. त्यामुळे छातीत प्रचंड वेदना होत असल्याने मुलाने सहप्रवाशांच्या मदतीने तातडीच्या उपचारासाठी रेल्वे थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडी न थांबल्याने शुक्ला यांनी प्राण सोडले व त्यानंतर एक तासाने गाडी जळगाव स्थानकावर थांबविण्यात आली.दरम्यान, डोळ्यादेखत पित्याचा मृत्यू झाल्याने १३ वर्षाच्या मयताच्या पियुश नामक मुलाचा प्रचंड आक्रोश होत होता. त्याची ही स्थिती पाहता अन्य प्रवाशांनाही गहिवरुन आले.शुक्ला यांच्या मृत्यूला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करुन प्रवाशांनी जळगाव स्थानकावर ५० मिनिटे गाडी रोखून धरत तिकिट निरीक्षक व स्टेशन मास्तरला जाब विचारला. यावेळी स्टेशनवर प्रचंड गोंधळ झाला होता.जबाबदारी स्विकारल्यानंतर गाडी रवानाजळगाव स्थानकावर गाडी आल्यानंतर बराच वेळ शववाहिका आलीच नाही. अर्धा तासाने लोहमार्ग पोलिसांनी शववाहिका उपलब्ध केली. त्यानंतर शुक्ला यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. शुक्ला व त्यांचा मुलगा जिल्हा रुग्णालयात लोहमार्ग पोलिसांसोबत असल्याची खात्री पटल्यानंतर प्रवाशांनी गाडी रवाना करण्यास परवानगी दिली. लोहमार्गचे हेडकॉन्स्टेबल मधुकर पारधी व गौतम शेंड्ये यांच्याशी मुलाबाबत बोलणे करुन दिल्यानंतर ११.५७ वाजता गाडी मार्गस्थ झाली. दरम्यान, या घटनेमुळे गाडीतील प्रवाशी व रेल्वे तिकिट निरीक्षक यांच्यात जोरदार वाद झाला. तिकिट निरीक्षक एन.के.तिवारी व ए.स.मीना यांच्यावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला.आईपाठोपाठ वडीलांनाही मुकला मुलगादीनेश शुक्ला यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर मुलाने प्रचंड आक्रोश केला. प्रवाशांनी त्याला धीर देत आईशी संपर्क करण्यासाठी माहिती विचारली असता गेल्या वर्षीच डिसेंबरमध्ये आईचेही निधन झाल्याची माहिती मुलाने दिली. ही माहिती ऐकून प्रवाशांना धक्का बसला. दरम्यान, शुक्ला हे डोंबिवलीत रिक्षा चालक होते. दोन मुली व एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. इलाहाबाद येथे जातीचा दाखला घेण्यासाठी शुक्ला रेल्वेने जात होते.नियंत्रण कक्षाने घेतली नाही दखलशुक्ला यांना चाळीसगावच्याजवळ छातीत त्रास व्हायला लागला. ही परिस्थिती पाहता त्यांना तत्काळ उपचार मिळावे म्हणून प्रवाशांनी तिकिट निरीक्षकांना सांगितले. त्यांनी भुसावळ नियंत्रण कक्षाला सूचना दिली, मात्र तरी देखील गाडी थांबविण्यात आली नाही. पाचोरा किंवा चाळीसगावला गाडी थांबली असती तर शुक्ला यांचा जीव वाचला असता.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव