शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

शेतकऱ्यांना सोसायट्यांमार्फतच मिळणार कर्ज; आधीचा निर्णय रद्द

By सुनील पाटील | Updated: April 15, 2023 19:13 IST

ऊस उत्पादकांनाही हमी पत्राची गरज नाही

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : शेतकऱ्यांना आता विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमार्फतच कर्ज मिळणार असून त्यातील ५० टक्के कर्ज रोखीने तर ५० टक्के एटीएमद्वारे काढता येणार आहे. ऊस उत्पादकांनाही विना हमीपत्र कर्ज वितरणासह जिल्ह्यातील रहिवाशी आहेत, परंतु ज्यांची शेती शेजारच्या जिल्ह्याच्या हद्दीत आहे अशा शेतकऱ्यांनाही कर्ज पुरवठा केला जाणार आहे. हे तीन महत्वपूर्ण निर्णय जिल्हा बँकेने शनिवारी घेतली.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची तहकुब बैठक शनिवारी चेअरमन संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पवार यांची चेअरमन निवडीनंतरची ही पहिलीच बैठक होती. व्हाईस चेअरमन अमोल पाटील, आमदार एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, राजीव देशमुख, ॲड. रोहीणी खडसे-खेवलकर, आमदार चिमणराव पाटील, आमदार अनिल पाटील, ॲड.रवींद्र पाटील, जनाबाई महाजन यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज देताना कारखान्याचे हमी पत्र आवश्यक होते. १५ वर्षापूर्वी बँकेने तसा निर्णय घेतलेला होता. आता साखर कारखाने खासगी तत्वावर चालविले जात असल्याने शेतकऱ्यांना कर्जासाठी अडचणी निर्माण होत होत्या. त्याशिवाय जिल्ह्यातील रहिवाशी शेतकऱ्यांच्या जमीन लगतच्या धुळे, औरंगाबाद, अकोला या जिल्ह्यातील गावांमध्ये आहे. त्या शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारण्यात येत होते. हे दोन्ही निर्णय देखील बँकेने रद्द केले आहेत. ज्या शेतकऱ्यांना थेट बँकेमार्फत कर्ज घ्यायचे असेल तर ती देखील मुभा देण्यात आली आहे.

‘त्या’ घोषणेची अमलबजावणी कराविकासो बळकटीकरणासाठी गट सचिवांचा पगार बँकमार्फत करण्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण व चेअरमन संजय पवार यांनी चेअरमननिवडीच्या दिवशी केली होती. या घोषणेची आठ दिवसात अमलबजावणी करावी अशी अपेक्षा खडसे व आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केली.

उध्दव ठाकरेंच्या सभेला जाणारउध्दव ठाकरे यांची पाचोरा येथे २३ रोजी सभा होत आहे. महाविकास आघाडी या नात्याने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष सहकार्य करेल तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते सभेला जातील, असे खडसे यांनी स्पष्ट केले

टॅग्स :Farmerशेतकरी