शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

शेतकऱ्यांना सोसायट्यांमार्फतच मिळणार कर्ज; आधीचा निर्णय रद्द

By सुनील पाटील | Updated: April 15, 2023 19:13 IST

ऊस उत्पादकांनाही हमी पत्राची गरज नाही

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : शेतकऱ्यांना आता विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमार्फतच कर्ज मिळणार असून त्यातील ५० टक्के कर्ज रोखीने तर ५० टक्के एटीएमद्वारे काढता येणार आहे. ऊस उत्पादकांनाही विना हमीपत्र कर्ज वितरणासह जिल्ह्यातील रहिवाशी आहेत, परंतु ज्यांची शेती शेजारच्या जिल्ह्याच्या हद्दीत आहे अशा शेतकऱ्यांनाही कर्ज पुरवठा केला जाणार आहे. हे तीन महत्वपूर्ण निर्णय जिल्हा बँकेने शनिवारी घेतली.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची तहकुब बैठक शनिवारी चेअरमन संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पवार यांची चेअरमन निवडीनंतरची ही पहिलीच बैठक होती. व्हाईस चेअरमन अमोल पाटील, आमदार एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, राजीव देशमुख, ॲड. रोहीणी खडसे-खेवलकर, आमदार चिमणराव पाटील, आमदार अनिल पाटील, ॲड.रवींद्र पाटील, जनाबाई महाजन यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज देताना कारखान्याचे हमी पत्र आवश्यक होते. १५ वर्षापूर्वी बँकेने तसा निर्णय घेतलेला होता. आता साखर कारखाने खासगी तत्वावर चालविले जात असल्याने शेतकऱ्यांना कर्जासाठी अडचणी निर्माण होत होत्या. त्याशिवाय जिल्ह्यातील रहिवाशी शेतकऱ्यांच्या जमीन लगतच्या धुळे, औरंगाबाद, अकोला या जिल्ह्यातील गावांमध्ये आहे. त्या शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारण्यात येत होते. हे दोन्ही निर्णय देखील बँकेने रद्द केले आहेत. ज्या शेतकऱ्यांना थेट बँकेमार्फत कर्ज घ्यायचे असेल तर ती देखील मुभा देण्यात आली आहे.

‘त्या’ घोषणेची अमलबजावणी कराविकासो बळकटीकरणासाठी गट सचिवांचा पगार बँकमार्फत करण्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण व चेअरमन संजय पवार यांनी चेअरमननिवडीच्या दिवशी केली होती. या घोषणेची आठ दिवसात अमलबजावणी करावी अशी अपेक्षा खडसे व आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केली.

उध्दव ठाकरेंच्या सभेला जाणारउध्दव ठाकरे यांची पाचोरा येथे २३ रोजी सभा होत आहे. महाविकास आघाडी या नात्याने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष सहकार्य करेल तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते सभेला जातील, असे खडसे यांनी स्पष्ट केले

टॅग्स :Farmerशेतकरी