शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
4
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
5
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
6
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
7
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
8
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
9
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
10
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
11
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
12
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
13
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
14
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
15
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
16
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
17
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
18
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
19
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
20
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 

शेतकऱ्यांना २५ टक्के कर्ज रोख मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:11 IST

जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक, स्टेट बॅँकेकडे ४०० कोटींची मागणी

जळगाव : जिल्हा बॅँकेकडून यंदा शेतकºयांना होणाºया पीककर्जाची २५ टक्के रक्कम रोख स्वरुपात देण्याचा निर्णय जिल्हा बॅँकेने घेतला आहे. याबाबत बुधवारी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोटांव्दारे कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी हा निर्णय घेतला होता.जिल्हा बॅँकेच्या निर्णयानंतर बुधवारी शेतकºयांना पिक कर्ज वाटपासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली बँक अधिकाºयांची बैठक झाली. या बैठकीला जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, अग्रणी बँकेचे मॅनेजर अरुण प्रकाश, स्टेट बँकेचे अधिकारी महेश पाटील यांच्यासह बँकांचे अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोटांची हाताळणी करताना एकमेकाचा संपर्क येऊ नये म्हणून कर्ज वाटप करताना कर्जाची २५ टक्के रक्कम रोख स्वरूपात तर उर्वरित ७५ टक्के रक्कम ही कार्डद्वारे देण्यात येणार आहे. दरम्यान जिल्हा बँकेच्याअध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे, उपाध्यक्ष किशोर पाटील आणि संचालक मंडळ यांच्यातर्फे बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी स्टेट बँकेकडे ४०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. ही रक्कम टप्प्याटप्प्याने जिल्हा बँकेला उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी दिले आहे.जिल्ह्यातील शेतकºयांना सध्यस्थितीला पीक कर्ज वाटप सुरू आहे. एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नसल्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी सांगितले. शेतकºयांनी याबाबत जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षाकडे रोख रक्कमेपेक्षा किसान क्रेडीट कार्डव्दारेच पैसे मिळावे अशी मागणी केली होती. या मागणीच्या आधारावर जिल्हा बॅँकेने निर्णय घेतला.पीक क र्ज भरण्याची ३१ मे पर्यंत मुदतकर्ज घेतलेल्या शेतकºयांना आपल्या कर्जाची रक्कम भरण्याची मुदत ही दरवर्षी ३१ मे पर्यंत असते. मात्र, यंदा कोरोनामुळे २४ मार्चपासून लॉकडाऊन झाल्यानंतर शेतकºयांना आपली रक्कम भरण्यास बाहेर येता आले नव्हते. त्यामुळे शेतकºयांनी ही मुदत वाढविण्याची मागणी केली होती. त्यामुळे ही रक्कम भरण्यासाठी ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, अनेक कर्ज घेतलेल्या शेतकºयांचा कापुस व अन्य धान्य विक्री झालेले नाही. अशा परिस्थितीत कर्ज भरता येणे कठीण आहे. जर पुढील महिन्यात कापूस खरेदी व धान्य खरेदीला सुरुवात झाली तर ३१ मे पर्यंत कर्जााची रक्कम भरता येणे शक्य होणार आहे. मात्र, खरेदी केंद्र सुरु न झाल्यास ३० जून पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव