शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST

वरणगाव : परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा पाण्यासाठी आकाशाकडे लागलेल्या असून, कोरडवाहू जमिनीतील पिकांनी पाण्याअभावी माना टाकायला सुरुवात केली आहे, तर ...

वरणगाव : परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा पाण्यासाठी आकाशाकडे लागलेल्या असून, कोरडवाहू जमिनीतील पिकांनी पाण्याअभावी माना टाकायला सुरुवात केली आहे, तर बऱ्याच शेतांतील पिके वाळून चालली आहेत. वरणगाव परिसरातील सुसरी, पिंपळगाव, तळवेल, कठोरा, फुलगाव, अंजनसोंडा, गोळेगाव, आचेगावसह पंचक्रोशीत जवळजवळ ९५ टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. सर्वांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन शेतीच आहे. परंतु या वर्षी आजतागायत चांगला दमदार पाऊस न झाल्यामुळे पिकांची परिस्थिती जेमतेम आहे. शेतकऱ्यांनी आपल्या कष्टाचे व उसनवारीसह कर्जाचे लाखो रुपये शेतीमध्ये पीक रूपाने पेरले आहेत. आतापर्यंत अल्पशा पाण्यावर पिकांनी कसाबसा तग धरलेला होता. परंतु आता मात्र पिके कोमेजून चालली असून, पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी तर पिके उन्हाळ्यासारखी वाळून गेली आहेत, तर शेतकरी वाळलेली पिके वाया गेल्याने त्यांच्याकडे पाहून पाण्यासाठी निसर्गाची करुणा भाकत आहेत. अशीच परिस्थिती दोन-तीन दिवस राहिली तर हंगाम शून्यावर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोळपणी, निंदणीसह पिकांना खते देण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. सर्वांच्या नजरा आकाशाकडे खिळल्या आहेत. दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.