शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

सुसाईड नोट लिहून शेतकऱ्याने कवटाळले मृत्यूला; घरात सर्वजण झोपलेले असताना घेतला गळफास

By विजय.सैतवाल | Updated: December 19, 2023 13:00 IST

मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी कर्जासह आजाराला कंटाळले असल्याचाही उल्लेख केला आहे.

विजयकुमार सैतवाल

जळगाव : ‘माझ्यावर कर्ज झाल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’, अशी चिठ्ठी लिहून शिवाजी चिंधू पाटील (५५, रा. धानवड, ता. जळगाव) या शेतकऱ्याने कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरात मंगळवार, १९ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता गळफास घेवून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी कर्जासह आजाराला कंटाळले असल्याचाही उल्लेख केला आहे.

धानवड येथे शिवाजी पाटील यांची शेती असून त्यासाठी वि.का. सोसायटी व खासगी कर्ज घेतले होते. त्यात यंदा पाऊस कमी झाल्याने व कापसाच्या पिकावर परिणाम होऊन उत्पन्न कमी आल्याने गेल्या सात ते आठ दिवसांपासून कर्ज कसे फिटणार, या विवंचनेत ते होते.  मंगळवार, १९ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता झोपेतून उठून त्यांनी राहत्या घराच्या मागच्या खोलीत दोरीने गळफास घेतला.

बराच वेळ झाला तरी ते न आल्यामुळे पत्नी व मुलाने मागच्या खोलीत जाऊन पाहिले असता शिवाजी पाटील हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांना शेजारील मंडळी व भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील यांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. आत्महत्या करण्यापूर्वी पाटील सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात ‘आजाराला कंटाळून फाशी घेत आहे, माझ्यावर कर्ज झाल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’ असे नमूद केले आहे. 

मुलांनी काढली होती समजूत, तरीही टोकाचे पाऊल

कर्जामुळे शिवाजी पाटील हे विवंचनेत होते, त्यामुळे पत्नी, मुलांनी त्यांची समजूत काढून सर्व सुरळीत होईल, असा धीर देते होते. तरीदेखील त्यांनी मंगळवारी पहाटेच टोकाला निर्णय घेत जीवन संपविले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवडे आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी