शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताबाबत बैठकांचा फार्स !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 12:16 IST

रस्ता अपघात व त्यात जीव जाणा-यांची आकडेवारी पाहता सर्वाेच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करुन अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत, मात्र जिल्हा स्तरावर बैठका घेऊन कागदोपत्री पुर्तता केली जात आहे. प्रत्यक्षात उपायोजना केल्या जात नसल्याने हा बैठका फार्स ठरल्या आहेत.

ठळक मुद्देविश्लेषणउपाययोजना नाहीच कागदोपत्री ठरताहेत बैठका

सुनील पाटीलजळगाव : रस्ता अपघात व त्यात जीव जाणाºयांची आकडेवारी पाहता सर्वाेच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करुन अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत, मात्र जिल्हा स्तरावर बैठका घेऊन कागदोपत्री पुर्तता केली जात आहे. प्रत्यक्षात उपायोजना केल्या जात नसल्याने हा बैठका फार्स ठरल्या आहेत.रस्ता अपघातासंदर्भात निर्देशाची अमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे. या समितीने महाराष्टÑ राज्याच्या रस्ता सुरक्षाविषयक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत बैठक घेतली होती. रस्ता अपघातात भरीव घट होण्याच्यादृष्टीने सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करुन सर्व मुद्यांची पुर्तता करुन ३१ डिसेंबरच्या आत न्या.राधाकृष्णन यांच्या समितीने अहवाल मागविला आहे.अपघात निवारणासाठी जिल्हाधिकाºयांनी जिल्हा स्तरावर विविध विभागांना सोबत घेऊन रस्ता सुरक्षा समितीमार्फत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी महिनाभरात दोन बैठकाही झाल्या, मात्र त्यावर कोणतीच अमलबजावणी केली नाही. पोलीस व आरटीओने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात तीन ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत. तेथे गतिरोधक, फलक व महामार्गाला जोडणारे जास्तीचे रस्त बंद करण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. याची जबाबदारी ‘नही’वर सोपविली. आरटीओ व वाहतूक शाखेने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयावर कारवाया करुन वाहन परवाना निलंबित करावयाचे आहेत. आरटीओने त्यानुसार २०५ जणांचे वाहन परवाने निलंबित केले तर वाहतूक शाखेने १६ प्रस्ताव आरटीओकडे पाठविले आहेत. ‘नही’ ने मात्र अजून कोणतीच जबाबदारी पुर्ण केलेली नाही. सर्वोच्च न्यायालय व मुख्य सचिव या विषयावर गंभीर असताना जिल्हास्तरीवरील यंत्रणा मात्र या सूचना गांभीर्याने घेताना दिसत नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव