शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

महिलांना भाड्यात सूट, रिक्षा युनियनचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 14:11 IST

अजिंठा चौफुलीपासून मोर्चाला झाली सुरुवात

कुंदन पाटील, जळगाव: राज्य शासनाने राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये महिलांना भाड्यात ५० टक्के सूट दिल्याने रिक्षा, टॅक्सीसह अन्य वाहनधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने न्याय भूमिका घेत निर्णय घ्यावा, या मागणीसाठी एकता ॲपे रिक्षा युनियन चालक-मालक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता अजिंठा चौफुलीपासून मोर्चाला सुरुवात झाली.

इच्छादेवी चौकातून हा मोर्चा आकाशवाणीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात शिंदे सरकारने ५० टक्के भाडे सूट देताना खासगी वाहनचालकांचाही विचार करायला हवा होता. ५० टक्के सूट देण्याऐवजी डिजेल, पेट्रोलचे दर कमी करायला हवे होते. त्यातून सर्वसामान्य जनेतला न्याय मिळाला असता. एसटीसह खासगी वाहनचालकांनाही दिलासा मिळाला असता. मात्र शासनाने कुणाचाही विचार न करता सरसकट ५० टक्के भाडे सूट दिल्याने जिल्ह्यातील ॲपेरिक्षा, कालीपिलीसह अन्य खासगी वाहन चालक व मालकांच्या परिवारासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिलेला आहे. त्यामुळे शासनाने या गोष्टीचा विचार करुन न्याय भूमिका घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी युनियनचे नितीन महाजन, उपाध्यक्ष गणेश कोळी, खजीनदार सतीश पाटील, सल्लागार अमीन शेख, बाबू शेख, मनोज महाजन, सुनील महाजन, संतोष कोळी, ज्ञानेश्वर कोळी, बशीर शेख, गणेश पवार, दिनेश कोळी आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव