शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

भांडणे ठरताय विकासाला अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 13:14 IST

जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांमधील बेबनावाचे दुष्परिणाम

ठळक मुद्देविकास कामांच्या नियोजनास विलंबसमान निधी वाटपासाठीच्या ठरावाला मंजुरीसाठी ११ रोजी  विशेष सभा

हितेंद्र काळुंखेजळगाव : जिल्हा परिषदेत सत्ताधारी गटात पदाधिकारी आणि सदस्य यांच्यातील बेबनावामुळे विकास कामांना ब्रेक लागत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे काही वेळेस पदाधिकारी एकमेकांवर कुरघोडी करायला पाहतात तर दुसरीकडे सदस्यही पदाधिकाºयांवर विश्वास ठेवयला तयार नाहीत. अशा भांडणातच अधिक वेळ जात असल्याने कामांच्या नियोजनालाही खोडा बसत आहे.सुमारे दोन वर्षे झालीत जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा मिळविणाºया भाजपाने काँग्रेसच्या चार सदस्यांचा टेकू मिळवत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या दोन्ही गटाचे सदस्यही यात आहेतच. यामुळेच अध्यक्ष निवडीपासून गटबाजीमुळे स्थानिक पातळीवर एकमत न झाल्याने थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत विषय जावून उज्ज्वला पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले. उज्वला पाटील यांचे पती तथा जि. प. चे माजी उपाध्यक्ष मच्छिद्र पाटील हे शिवसनेतून भाजपात आले असल्याने त्यांच्यावर कोणत्याही गटाचा तसा शिक्का पडला नसल्याने ते जिल्ह्याच्या या दोन्ही नेत्यांशी जुळवून घेण्यात सुरुवातीस यशस्वी झाले असले तरी नंतर हळूहळू त्यांचा कल हा सत्तेत वजन असलेल्या गिरीश महाजन यांच्याकडे झुकत गेल्याने खडसे गटातील पदाधिकारी हे हळूहळू त्यांच्या विरोधात जावू लागले. जि.प. चे उपाध्यक्ष तथा खडसे यांचे कट्टर समर्थक नंदकिशोर महाजन यांनीही अध्यक्षांविरोधात मागे जाहीर विधान केले होते. हे वाद पाहता गिरीश महाजन यांनी एक बैठक घेवून पदाधिकाºयांमध्ये समजोता घडवून आणला होता. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्वकीय सदस्यांनीच बंड पुकारल्याने जिल्हा नियोजनकडून प्राप्त १२० कोटींच्या मंजूर विषयाच्या इतिवृत्तीला विरोध होेऊन हा विषय बारगळला होता. पक्षाचीही यामुळे नामुष्की झाल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पदाधिकारी आणि सर्व सत्ताधारी सदस्यांची बैठक घेवून समजोता घडवून आणला. आणि सदस्यांच्या मागणीनुसार समान निधी वाटपासाठीच्या ठरावाला मंजुरीसाठी ११ रोजी  विशेष सभा घेतली जाणार आहे. आधीच आपसातील मतभेदामुळे नियोजनास विलंब झालेला असताना अशा प्रकारे नवीन ठरावांसाठी पुन्हा निधीच्या विनियोगाच्या प्रक्रियेत आणखीनच विलंबाची भर पडत आहे. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नसून जि.प.च्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी सभा सचिव बी.एस. अकलाडे यांना एक पत्र दिले आहे. यात नमूद केले आहे की, २८ रोजी केवळ इतिवृत्ताला मंजूरीचा विषय होता. त्यापूर्वी झालेल्या सभेत १२० कोटीच्या विकास निधी वाटपाच्या विषयाला बहुमताने मंजूरी मिळाली होती. मग मंजूर झालेला विषय नामंजूर होऊ शकतो काय? अशी विचारणा त्यांनी केली असून याचे लेखी उत्तर सादर करावे अशा सूचना केल्या आहेत.जि.प. अध्यक्षांच्या या पत्रावरुन असे दिसून येते की, पक्ष बैठकीत ठरलेला समाननिधी वाटपाचा निर्णय त्यांनी मनापासून स्विकारला नसून नियमांचा आधार शोधून समान निधी वाटपाचा विषय पुन्हा ठेवण्याची गरज पडू नये हा त्यांचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे पदाधिकारी आणि सदस्य यांचे एकमेकांविरुद्धचे प्रयत्न थांबायला तयार नाही. नेहमीच्या या प्रकारामुळे कामांचे नियोजन वेळेवर होत नाही. याच कारणामुळे जिल्हा विकास यंत्रणेचा यंदाचा निधीही खर्च होवू शकला नाही. एवढेच नाही तर पदाधिकारी आणि सदस्यांमधील अशा वादामुळे अधिकाºयांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही यामुळे त्यांना फावले असून अधिकाºयांवरही कोणाचा वचक राहिलेला नाही. यामुळे जिल्हा परिषदेचे एकूणच आरोग्य बिघडले आहे. यावर उपचार करण्याची नक्कीच गरज आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव