शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भांडणे ठरताय विकासाला अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 13:14 IST

जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांमधील बेबनावाचे दुष्परिणाम

ठळक मुद्देविकास कामांच्या नियोजनास विलंबसमान निधी वाटपासाठीच्या ठरावाला मंजुरीसाठी ११ रोजी  विशेष सभा

हितेंद्र काळुंखेजळगाव : जिल्हा परिषदेत सत्ताधारी गटात पदाधिकारी आणि सदस्य यांच्यातील बेबनावामुळे विकास कामांना ब्रेक लागत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे काही वेळेस पदाधिकारी एकमेकांवर कुरघोडी करायला पाहतात तर दुसरीकडे सदस्यही पदाधिकाºयांवर विश्वास ठेवयला तयार नाहीत. अशा भांडणातच अधिक वेळ जात असल्याने कामांच्या नियोजनालाही खोडा बसत आहे.सुमारे दोन वर्षे झालीत जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा मिळविणाºया भाजपाने काँग्रेसच्या चार सदस्यांचा टेकू मिळवत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या दोन्ही गटाचे सदस्यही यात आहेतच. यामुळेच अध्यक्ष निवडीपासून गटबाजीमुळे स्थानिक पातळीवर एकमत न झाल्याने थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत विषय जावून उज्ज्वला पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले. उज्वला पाटील यांचे पती तथा जि. प. चे माजी उपाध्यक्ष मच्छिद्र पाटील हे शिवसनेतून भाजपात आले असल्याने त्यांच्यावर कोणत्याही गटाचा तसा शिक्का पडला नसल्याने ते जिल्ह्याच्या या दोन्ही नेत्यांशी जुळवून घेण्यात सुरुवातीस यशस्वी झाले असले तरी नंतर हळूहळू त्यांचा कल हा सत्तेत वजन असलेल्या गिरीश महाजन यांच्याकडे झुकत गेल्याने खडसे गटातील पदाधिकारी हे हळूहळू त्यांच्या विरोधात जावू लागले. जि.प. चे उपाध्यक्ष तथा खडसे यांचे कट्टर समर्थक नंदकिशोर महाजन यांनीही अध्यक्षांविरोधात मागे जाहीर विधान केले होते. हे वाद पाहता गिरीश महाजन यांनी एक बैठक घेवून पदाधिकाºयांमध्ये समजोता घडवून आणला होता. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्वकीय सदस्यांनीच बंड पुकारल्याने जिल्हा नियोजनकडून प्राप्त १२० कोटींच्या मंजूर विषयाच्या इतिवृत्तीला विरोध होेऊन हा विषय बारगळला होता. पक्षाचीही यामुळे नामुष्की झाल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पदाधिकारी आणि सर्व सत्ताधारी सदस्यांची बैठक घेवून समजोता घडवून आणला. आणि सदस्यांच्या मागणीनुसार समान निधी वाटपासाठीच्या ठरावाला मंजुरीसाठी ११ रोजी  विशेष सभा घेतली जाणार आहे. आधीच आपसातील मतभेदामुळे नियोजनास विलंब झालेला असताना अशा प्रकारे नवीन ठरावांसाठी पुन्हा निधीच्या विनियोगाच्या प्रक्रियेत आणखीनच विलंबाची भर पडत आहे. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नसून जि.प.च्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी सभा सचिव बी.एस. अकलाडे यांना एक पत्र दिले आहे. यात नमूद केले आहे की, २८ रोजी केवळ इतिवृत्ताला मंजूरीचा विषय होता. त्यापूर्वी झालेल्या सभेत १२० कोटीच्या विकास निधी वाटपाच्या विषयाला बहुमताने मंजूरी मिळाली होती. मग मंजूर झालेला विषय नामंजूर होऊ शकतो काय? अशी विचारणा त्यांनी केली असून याचे लेखी उत्तर सादर करावे अशा सूचना केल्या आहेत.जि.प. अध्यक्षांच्या या पत्रावरुन असे दिसून येते की, पक्ष बैठकीत ठरलेला समाननिधी वाटपाचा निर्णय त्यांनी मनापासून स्विकारला नसून नियमांचा आधार शोधून समान निधी वाटपाचा विषय पुन्हा ठेवण्याची गरज पडू नये हा त्यांचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे पदाधिकारी आणि सदस्य यांचे एकमेकांविरुद्धचे प्रयत्न थांबायला तयार नाही. नेहमीच्या या प्रकारामुळे कामांचे नियोजन वेळेवर होत नाही. याच कारणामुळे जिल्हा विकास यंत्रणेचा यंदाचा निधीही खर्च होवू शकला नाही. एवढेच नाही तर पदाधिकारी आणि सदस्यांमधील अशा वादामुळे अधिकाºयांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही यामुळे त्यांना फावले असून अधिकाºयांवरही कोणाचा वचक राहिलेला नाही. यामुळे जिल्हा परिषदेचे एकूणच आरोग्य बिघडले आहे. यावर उपचार करण्याची नक्कीच गरज आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव