शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

मनपाच्या अभय योजनेला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेने मालमत्ता कराच्या थकबाकीदारांसाठी अभय योजनेला सुरुवात केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेने मालमत्ता कराच्या थकबाकीदारांसाठी अभय योजनेला सुरुवात केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत थकबाकीदारांनी आतापर्यंत ५ कोटी ४२ लाख रुपये मालमत्ता कराचा भरणा केला आहे. हा प्रतिसाद पाहता या योजनेला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती मनपा उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

यात आता १५ फेब्रुवारीपर्यंत ७५ टक्के शास्ती माफी देण्यात आली आहे, तर १६ ते २८ फेब्रुवारीपर्यंत ५० टक्के दंड माफ केला जाणार आहे. १ ते १० मार्चदरम्यान २५ टक्के शास्ती माफ केली जाणार आहे.

या अभय योजनेत प्रभाग समिती तीनमध्ये सर्वांत जास्त १ कोटी ७७ लाख ६२ हजार सात रुपयांची वसुली झाली आहे, तर एकूण चारही प्रभागांत मिळून ५ कोटी ४२ लाख ७६ हजार ५३४ रुपये वसूल झाले आहेत. संपूर्ण मिळकतधारकांना थकबाकीचा संपूर्ण भरणा करतील त्यांनाच या शास्ती माफीचा लाभ मिळणार आहे.