शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

तिकिटाची इच्छा व्यक्त गैर नाही, पण अंतिम निर्णय पक्षच घेईल- विजय चौधरी

By सुनील पाटील | Updated: October 19, 2023 15:38 IST

प्रदेशाध्यक्ष रावेर, जळगाव दौऱ्यावर येणार

जळगाव : आपल्यालाच तिकिट मिळावे ही प्रत्येकाची इच्छा असते, ती व्यक्त करणे गैरही नाही, परंतु अंतिम निर्णय पक्षच घेतो. आगामी निवडणूकांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय हा राज्य व केंद्रीय समितीचा असेल. त्यामुळे याबाबत कोणी कितीही चर्चा करत असेल त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य होईल, असे मत भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांची माहिती, शासकीय योजनाचा लाभ कसा घ्यावा याची यासाठी विधानसभानिहाय १०० सुपर वॉरीअर्स नियुक्त केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर चौधरी जळगाव दौऱ्यावर आले असता गुरुवारी त्यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी आमदार स्मिता वाघ, संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेर, अमोल जावळे, महानगराध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यश चंद्रशेखर बावनकुळे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. ५  नोव्हेंबरला रावेर, ६ ला जळगाव, ७ ला धुळे, ८ ला नंदुरबार व ९ ला इंदौर असा त्यांचा दौरा आहे.

विधानसभा, लोकसभा निवडणूकीत कोणता उमेदवार द्यावा, किती जागा लढवाव्यात याचा अंतिम निर्णय हा राज्य व केंद्रीय कोअर समिती घेते. राज्यात तीन पक्षाची युती आहे. त्यामुळे कोणाला किती जागांचे वाटप होईल हे वरिष्ठ नेतेच ठरवितील. तो निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल.पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी सुरु केलेल्या विविध योजनाच्या माहितीसाठी सरल ॲप सुरू केले आहे. त्याचीही माहिती या वॉरीअर्सकडून देण्यात येणार आहे. या योजना नागरीकांपर्यत कश्या पोहचतील, त्यांचा लाभ कसा घ्यावा याची माहितीही यातून देण्यात येणार आहे.

राजकीय लुटीची दुकाने बंदचा धोकामोंदींची लोकप्रियता वाढत असल्याने सर्व विरोधक एकत्र होत आहेत. कारण २०२४ मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. याचा त्यांना अंदाज आला आहे. त्यामुळे आपली राजकीय लुटीची दुकाने बंद होऊ नये म्हणून ते एकत्र येत भिंग लावून चुका शोधत आहेत. 

टॅग्स :BJPभाजपा