शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’ पाणी योजनेची संपली मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:33 IST

फक्त ४० टक्के काम पूर्र्ण : मनपाकडून होणार दंडात्मक कारवाई

जळगाव : ‘अमृत’ अंतर्गत शहरात सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची दोन वर्षाची मुदत १६ नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी संपुष्टात आली आहे. दोन वर्षात या योजेनेचे संपूर्ण काम होणे अपेक्षित होते. मात्र, केवळ ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. संथ कामामुळे मनपाकडून मक्तेदारावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी दिली.अमृत अंतर्गत शहरासाठी पाणी पुरवठा व मलनिस्सारण योजना मंजूर आहे. त्यापैकी पाणी पुरवठा योजनेला २३ जून २०१६ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर १७ नोव्हेंबर २०१७ पासून अमृतच्या कामाला सुरुवात झाली होती. १६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. हे काम अत्यंत संथ गतीने सुरु असल्याने मनपा प्रशासनाकडून मक्तेदाराला नोटीस देखील बजावण्यात आली होती. मात्र, कामात कोणतीही गती मिळाली नसल्याने आता पुन्हा वर्षभराची मुदतवाढ मनपा प्रशासनाकडून मक्तेदाराला देण्याची शक्यता आहे.जलवाहिन्यांचे काम ६० टक्केपाणी पुरवठा योजनेतंर्गत ६४४.३६ किमीच्या ११० मीमी ते ६०० मीमीच्या पाईपांव्दारे जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. आतापर्यंत डीआय प्रकारात एकूण ५७.९४ किमी पैकी २५.५० किमीचे काम पूर्ण झाले आहे. एच.डी.पी.आई प्रकारात ५८६ किमी पैकी ३६० किमीचे काम पूर्णअमृत पाणी पुरवठा योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. हे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र ते होवू शकलेले नाही. त्यामुळे संबधित मक्तेदारावर दंडात्मक कारवाई करून त्यांना मुदतवाढ दिली जाणार आहे. -डॉ.उदय टेकाळे, आयुक्त, मनपाआतापर्यंत पाणी पुरवठा योजनेचे काम ४० टक्के झाले आहे. कामात गती आणण्याची गरज आहे. दरम्यान, कामाची मुदत संपली असली तरी आता मुदतवाढ दिली जाणार आहे. कारवाईबाबत मनपा प्रशासन निर्णय घेवू शकते. -एस.व्ही.निकम, कार्यकारी अभियंता, मजिप्रा

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव