शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती; युद्धविरामानंतर शरद पवारांचं भाष्य
6
कडक सॅल्यूट! "डॅडी... मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

जळगावात एक लाख नागरिकांचे पाणी दररोज वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 03:11 IST

पाणी असूनही शहराला तीन दिवसांआड पुरवठा; गळती दुरुस्तीची मोहीम हाती घेतली; मात्र वितरण व्यवस्था जुनीच

- अजय पाटील जळगाव : जळगाव शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी दररोज गळती व ‘लॉसेस’मुळे वाया जाते. एकीकडे पाणी दरवाढीबाबत शासनाचा विचार सुरू असताना दुसरीकडे दररोज वाया जाणाऱ्या या हजारो लिटर पाण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.शहराच्या लोकसंख्येनुसार दरडोई १३० लिटरप्रमाणे ७० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. शहराला वाघूर धरणावरून ९६ एमएलडी पाणी दररोज दिले जाते. शुद्धीकरण करून ७६ एमएलडी पाणी गिरणा टाकीत सोडले जाते. शुद्धीकरणादरम्यान २० एमएलडी पाण्याचा लॉस होतो, तसेच शहराला पाणीपुरवठा होत असताना गळत्यांचे प्रमाण प्रचंड आहे. जळगावात पाणी मुबलक असले तरी वितरण व्यवस्था ४० वर्षांपेक्षा जुनी आहे.मनपाच्या आकडेवारीनुसार शहरात ४०० हून अधिक ठिकाणी गळत्या आहेत. त्यामुळे पाणी पुरवठ्यादरम्यान हजारो लिटर पाणी वाया जाते. परिणामी निर्धारित पाणी पोहोचत नाही.मनपाने गळती दुरुस्तीची मोहीम हाती घेतली; मात्र वितरण व्यवस्था जुनी असल्याने गळती दुरुस्त करूनही तीच परिस्थिती आहे.पाण्याची दरवाढ करण्यापेक्षा दररोज वाया जाणाºया पाण्याची बचत करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नागरिकांना पाण्याचे मूल्य कळेल; पण मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाया जाणाºया पाण्याचे मूल्य कोण करील.- बाळकृष्ण देवरे, पर्यावरणप्रेमीशहरातील गळत्यांवर मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा लॉस रोखण्यात यश आले आहे. अमृत योजनेचे काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यावर वाया जाणाºया पाण्यावर पूर्णपणे नियंत्रण येणार आहे.- अरविंद भोसले, प्रभारी मुख्य अभियंता,मनपा पाणीपुरवठा विभाग.5,39,000 जळगाव शहराची लोकसंख्या130 लिटर दरमाणसी पाण्याची गरज400 पेक्षा अधिक गळत्या70 दशलक्ष लिटर पाण्याची गरज96 एमएलडी पाणी वाघूर धरणातून

टॅग्स :water shortageपाणीकपात