शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

महाराष्ट्रातील या गावाला ब्रिटिशही घाबरायचे, असं होतं कारण

By अमित महाबळ | Updated: August 15, 2022 02:07 IST

ब्रिटिश काळात नांद्रा बु. जेमतेम २०० ते २५० घरांचे होते. गाव छोटे असूनही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे अनेक जण होते. त्यांनी ब्रिटिशांच्या नाकात दम आणला होता.

अमित महाबळ - 

जळगाव: नांद्रा बु. गाव म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांची शौर्यभूमी. गाव छोटे होते, तरी कार्य मोठे राहिले. देशासाठी लढताना ब्रिटिशांच्या नाकात दम आणायचे काम या गावातून झाले. स्वातंत्र्य चळवळीत सहभाग नोंदवला म्हणून तुरुंगवास भोगणारे ११ जण गावातील आहेत. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ नांद्रा येथे ‘स्वातंत्र्य सैनिक’ भवन बांधलेले आहे.

ब्रिटिश काळात नांद्रा बु. जेमतेम २०० ते २५० घरांचे होते. गाव छोटे असूनही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे अनेक जण होते. त्यांनी ब्रिटिशांच्या नाकात दम आणला होता. १२ सप्टेंबर १९४२ या दिवशी पोळा सण होता. त्या दिवशी त्यांनी बैलांच्या शिंगावर झेंडे बांधून मिरवणूक काढण्यात पुढाकार घेतला. तसेच ब्रिटिश फौजदाराला दोरीने बांधून ठेवले होते. त्यांनी ब्रिटिशांना त्रासून सोडले होते. म्हणूनच जवळ कानळदा गाव असूनही नांद्रा गावातच पोलीस औट पोस्ट स्थापन करण्यात आले होते. त्या अंतर्गत आव्हाणे गावापासून भोकर, पळसोदपर्यंतचा परिसर होता.

असा झाला आझाद चौक -स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ नांद्रा गावात ‘स्वातंत्र्य सैनिक भवन’बांधलेले आहे. चळवळीची सुरुवात जेथून व्हायची त्या चौकास आझाद चौक असे म्हणतात. त्याचे उद्घाटन १९ सप्टेंबर २००९ रोजी झाले. हे भवन बनविण्यासाठी शामसुंदर नवाल यांनी पुढाकार घेतला, अशी माहिती नरेश नवाल यांनी दिली.

हे आहेत स्वातंत्र्य सैनिकभाऊलाल आगीवाल, भगवानदास नवाल, बाबुलाल आगीवाल, कौतिक सोनवणे, भिकारी चौधरी, बाजीराव पाटील, शंकरलाल देपुरा, भाऊलाल देपुरा, शंकरलाल नवाल, शिवनारायण आगीवाल, लालचंद तिलकचंद समदाणी.

टॅग्स :JalgaonजळगावEnglandइंग्लंड