शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

बाजारपेठ बंदच्या दुसऱ्या दिवशीही नियम धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 11:57 IST

ठिकठिकाणी लागले दुकान

जळगाव : सम-विषम पद्धत बंद करीत सर्व दुकानांसह व्यापारी संकूलही सुरू करण्यास परवानगी देताना शनिवार व रविवार बाजारपेठ बंद करण्याचे आदेश असले तरी याच्या अंमलबजावणीच्या दुसºया दिवशी रविवार, ६ सप्टेंबर रोजीदेखील शहरात नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे चित्र होते. यामध्ये महात्मा फुले मार्केट समोर तसेच वेगवेगळ््या ठिकाणी कापड, चप्पल विक्रेत्यांनी ठाण मांडले होते. या सोबतच मास्क न वापरता शहरात फिरणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे चित्र आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन असलेल्या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले. यामध्ये शहरातील व्यापारी संकूलही बंद होते. त्यानंतर व्यापारी संकूल वगळता इतर दुकाने सम-विषम विषम पद्धतीने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली व नंतर व्यापारी संकूलही सुरू झाले. त्यात गेल्या आठवड्यात ३१ आॅगस्टपासून सम-विषम पद्धत बंद करीत सोमवार ते शुक्रवार पूर्णवेळ दुकाने उघडण्यास परवानगी दिली. त्यानुसार आता शनिवार व रविवार वगळता इतर दिवस दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यात आली. यात शनिवार व रविवार केवळ जीवनावश्यक वस्तूंच्याच दुकाना सुरू राहणार असल्याचे स्पष्ट निर्देश दिले.असे असतानाही गेल्या दोन दिवसांपासून शहरात हे नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे चित्र आहे. एरव्ही सुरुवातीपासूनच रविवारी शहरातील बहुतांश दुकाने बंदच असतात. त्यामुळे बाजारपेठेत कोणी येत नाही. मात्र सध्या नियम ठरवून दिल्यानंतर आलेल्या रविवारी व्यापारी संकुलांमधील दुकाने व जीवनावश्यक वस्तूंच्या इतर दुकाना बंद असताना महात्मा फुले मार्केट समोर, अजिंठा मार्गावर, शहरातील वेगवेगळ््या परिसरात कापड, चपला, खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी दुकाने थाटून व्यवसाय सुरू ठेवला.शनिवारीदेखील असेच चित्र शहरात विविध भागात होते. दोन दिवसांपासून रस्त्यावर दुकाने थाटली जात असली तरी मनपाच्या पथकाकडून कारवाई का केली जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.बाजारपेठ बंद असताना वर्दळ कायमकोरोनाच्या संसर्गाला आळा बसावा म्हणून दोन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय असला तरी बाहेर फिरणाºयांची गर्दी काही कमी झाली नाही. बाजारपेठ बंद असल्याने काय खरेदीसाठी नागरिक बाहेर पडले, असा सवालही उपस्थित केला जात आहे.मास्कचा वापर करण्यास टाळाटाळमास्कचा वापर सक्तीचा करण्यात आला असून मास्क न वापरणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. असे असले तरी शहरात अनेक जण अजूनही मास्कचा वापर करीत नसल्याचे चित्र आहे. रविवारीदेखील शहरात अनेक वाहनधारक विनामास्क फिरत असल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी पोलिसांनी वाहनधारकांना रोखत कारवाई केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव