शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

बाजारपेठ बंदच्या दुसऱ्या दिवशीही नियम धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 11:57 IST

ठिकठिकाणी लागले दुकान

जळगाव : सम-विषम पद्धत बंद करीत सर्व दुकानांसह व्यापारी संकूलही सुरू करण्यास परवानगी देताना शनिवार व रविवार बाजारपेठ बंद करण्याचे आदेश असले तरी याच्या अंमलबजावणीच्या दुसºया दिवशी रविवार, ६ सप्टेंबर रोजीदेखील शहरात नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे चित्र होते. यामध्ये महात्मा फुले मार्केट समोर तसेच वेगवेगळ््या ठिकाणी कापड, चप्पल विक्रेत्यांनी ठाण मांडले होते. या सोबतच मास्क न वापरता शहरात फिरणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे चित्र आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन असलेल्या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले. यामध्ये शहरातील व्यापारी संकूलही बंद होते. त्यानंतर व्यापारी संकूल वगळता इतर दुकाने सम-विषम विषम पद्धतीने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली व नंतर व्यापारी संकूलही सुरू झाले. त्यात गेल्या आठवड्यात ३१ आॅगस्टपासून सम-विषम पद्धत बंद करीत सोमवार ते शुक्रवार पूर्णवेळ दुकाने उघडण्यास परवानगी दिली. त्यानुसार आता शनिवार व रविवार वगळता इतर दिवस दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यात आली. यात शनिवार व रविवार केवळ जीवनावश्यक वस्तूंच्याच दुकाना सुरू राहणार असल्याचे स्पष्ट निर्देश दिले.असे असतानाही गेल्या दोन दिवसांपासून शहरात हे नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे चित्र आहे. एरव्ही सुरुवातीपासूनच रविवारी शहरातील बहुतांश दुकाने बंदच असतात. त्यामुळे बाजारपेठेत कोणी येत नाही. मात्र सध्या नियम ठरवून दिल्यानंतर आलेल्या रविवारी व्यापारी संकुलांमधील दुकाने व जीवनावश्यक वस्तूंच्या इतर दुकाना बंद असताना महात्मा फुले मार्केट समोर, अजिंठा मार्गावर, शहरातील वेगवेगळ््या परिसरात कापड, चपला, खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी दुकाने थाटून व्यवसाय सुरू ठेवला.शनिवारीदेखील असेच चित्र शहरात विविध भागात होते. दोन दिवसांपासून रस्त्यावर दुकाने थाटली जात असली तरी मनपाच्या पथकाकडून कारवाई का केली जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.बाजारपेठ बंद असताना वर्दळ कायमकोरोनाच्या संसर्गाला आळा बसावा म्हणून दोन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय असला तरी बाहेर फिरणाºयांची गर्दी काही कमी झाली नाही. बाजारपेठ बंद असल्याने काय खरेदीसाठी नागरिक बाहेर पडले, असा सवालही उपस्थित केला जात आहे.मास्कचा वापर करण्यास टाळाटाळमास्कचा वापर सक्तीचा करण्यात आला असून मास्क न वापरणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. असे असले तरी शहरात अनेक जण अजूनही मास्कचा वापर करीत नसल्याचे चित्र आहे. रविवारीदेखील शहरात अनेक वाहनधारक विनामास्क फिरत असल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी पोलिसांनी वाहनधारकांना रोखत कारवाई केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव