शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

जात वैधता नसतांनाही भरता येणार सरपंचपदासाठी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 18:56 IST

सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार भरून

ठळक मुद्देसरपंचपदासाठी सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार भरूनअध्यादेशाला फक्त सरपंचपदासाठी फेब्रुवारी २०१८ पर्यंत मुदतवाढसदस्यांसाठी मात्र अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव: दि.६ : लोकनियुक्त सरपंचपदासाठी आरक्षित जागांवर निवडणुक लढवू इच्छिणा-या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी आखाड्यात उतरता येणार आहे. सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र भरुन दिल्यानंतर आरक्षित जागांवर निवडणुक लढविता येईल. ग्रामविकास विभागाने ३१ डिसेंबर २०१७ च्या अध्यादेशाला २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सदस्यांसाठीचा निर्णय मात्र मंत्रीमंडळाच्या विचाराधीन असल्याचे ग्रामविकास विभागाच्या ५ फेब्रुवारी रोजीच्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.फेब्रुवारी महिन्यात ग्रा.पं. निवडणुका होत आहे. चाळीसगाव तालुक्यातील पाच ग्रा.पं.तर चार ठिकाणी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सोमवार पासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता.राज्य निवडणुक आयोगाने २२ जानेवारी रोजी नविन अध्यादेश जाहीर केला आहे. आरक्षित जागांवर निवडणुक लढविणा-या उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र घेण्याच्या सवलतीस शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून ३१ डिसेंबर नंतर मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आरक्षित जागांवर निवडणुक लढविणा-या उमेदवारांपुढे प्रश्ननिर्माण झाले होते. बहुतांशी उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने त्यांची अडचण झाली होती.यावर ग्रामविकास विभागाने ५ फेब्रुवारी रोजी पुन्हा हमीपत्र भरुन घेऊन नामनिर्देशन स्विकारण्याच्या ३१ डिसेंबर २०१७ च्या अध्यादेशाला फक्त सरपंचपदासाठी फेब्रुवारी २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे सरपंचपदासाठी निवडणुक लढवू इच्छिणा-या उमेदवारांचा अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना हमीपत्र जोडून अर्ज भरता येणार आहे.सदस्यांसाठी मात्र अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. सदस्यांचे अर्ज देखील हमीपत्र भरुन स्विकारावे, यासाठीचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात आला असून त्यावर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.

टॅग्स :JalgaonजळगावElectionनिवडणूक