शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

गुन्हा दाखल करण्याच्या धमकीनंतरही ठेवीदार लोकशाही दिनी उपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 22:49 IST

स्वतंत्र बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार : जिल्हाधिकारी

ठळक मुद्दे कर्जमाफीच्या कामानंतर ठेवीदारांना प्राधान्यरक्कमा परत देण्यासाठी निश्चित धोरण ठरविणारदीपककुमार गुप्ता यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

आॅनलाईन लोकमत,जळगाव, दि.६ - ‘लोकशाही दिनी’ तक्रार आणल्यास अटक करू अशी धमकी निवासी उपजिल्हाधिकाºयांमार्फत जिल्हाधिकाºयांनी दिल्याचा आरोप विवेक ठाकरे यांनी केला होता. या धमकीनंतरही ठेवीदार जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. जिल्हाधिकाºयांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व महिनाभरात ठेवीदार व सहकार अधिकाºयांच्या अधिकाºयांसोबत संयुक्त बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. ठाकरे यांनी स्वत:च्या नावाने सर्व १७२ ठेवीदारांच्यावतीने ४ मुद्यांची एक स्वतंत्र तक्रार सादर करून जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर यांच्यासमोर यावेळी कैफियत मांडली.कर्जमाफीच्या कामानंतर ठेवीदारांना प्राधान्यजिल्'ातील विविध पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या प्रश्नांबाबत येत्या एक महिन्याच्या आत सहकार विभागाचे अधिकारी व ठेवीदारांचे प्रतिनिधी यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी लोकशाही दिनी ठेवीदारांना दिले. जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना सांगितले की, सध्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचेकडे शेतकरी कर्जमाफीचे काम सुरु आहे, ते काम लवकरच संपेल. त्यानंतर सहकार विभागाचे अधिकारी व ठेवीदारांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. या बैठकीत ठेवीदारांना त्यांच्या रक्कमा परत देण्यासाठी एक निश्चित धोरण ठरविण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले....अन्यथा अधिकाºयांवर कारवाईलोकशाही दिनी प्राप्त झालेल्या तक्रार अर्जांवर संबंधित विभागांच्या अधिकाºयांनी तातडीने कार्यवाही करुन तक्रारदारास न्याय द्यावा, अन्यथा संबधित अधिकाºयांवर कारवाई करावी लागेल. असा इशारा जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिला. या लोकशाही दिनास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उप वनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपविभागीय पोलीस अधिकारी (मुख्यालय) रशीद तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.एकूण ४२३ तक्रार अर्जआजच्या लोकशाही दिनात सहकार विभागाशी संबंधीत ठेवीदारांच्या २३९ तर इतर विविध विभागांविषयी एकूण १८० अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान,ठेवीदारांचे प्रश्नात लक्ष न घालण्याचा यापूर्वीचा पावित्रा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी बदलल्यामुळे सर्व ठेवीदारांनी समाधान व्यक्त केले. लोकशाही दिनातील तक्रारीची कारवाई पार पाडल्यानंतर सभागृहाबाहेर सर्व ठेवीदारांची विवेक ठाकरे यांनी द्वारसभा घेत ठेवीदारांना मार्गदर्शन केले. यावेळी पुढील पाठपुरावा व धोरण निश्चित करण्यात आले.

दीपककुमार गुप्ता यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

लोकशाही दिनी तक्रारी घेऊन आल्यास जेलमध्ये टाकण्याची धमकी जिल्हाधिकाºयांनी निवासी उपजिल्हाधिकाºयांमार्फत दिल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे टष्ट्वीटरद्वारे तक्रार केली आहे. सोबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचे कात्रणही जोडले आहे. धमकी देणाºया जिल्हाधिकाºयांना त्वरित हटविण्याची मागणी गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.तक्रारींचा वाचला पाढा             कु ल शब्द(279)

तक्रारींचा वाचला पाढा

दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनाच्या सभागृहात लोकशाही दिनास सुरूवात झाली. जिल्हाधिकाºयांसह अधिकारी देखील उपस्थित होते. ठेवीदारांना विभाग निहाय बसविण्यात आले होते. जिल्हाधिकाºयांसह त्या-त्या विभागाचे अधिकाररी स्वत: लोकांच्या बाकाजवळ जाऊन तक्रारी जाणून घेत होते. यावेळी तक्रारदारांनी अधिकाºयांकडे तक्रारींचा पाढाच वाचला.

वृद्ध दाम्पत्याला रडू कोसळलेइंद्रप्रस्थ नगरातील पद्माकर व उषा डोल्हारे हे दाम्पत्य मनपाच्याच कामगाराकडून जिविताला धोका असल्याची तक्रार घेऊन आले होते. यापूर्वीही त्यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर स्वत: जिल्हाधिकाºयांनी गणेशोत्सवाच्या काळात त्यांच्या घरी जाऊन पाहणी केली होती. मात्र संबंधीत कर्मचाºयाकडून मनपात खोटे खुलासे सादर केले. त्या कामगारावर कारवाई झालेली नसून त्याच्याकडून जिवाला धोका असल्याची तक्रार घेऊन हे दाम्पत्य सोमवार दि.६ रोजी पुन्हा लोकशाही दिनात आले होते. जिल्हाधिकाºयांनी त्यांची विचारपूस करताच या दाम्पत्याला गहिवरून आले. जिल्हाधिकाºयांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके हे देखील तक्रारदारांपर्यंत जाऊन तक्रारी ऐकून घेत होते. मोकळ्या जागेत खालीच बसलेल्या अपंग युवकाजवळ जाऊन खाली बसून त्यांनी त्याची तक्रार ऐकून घेतली. थोड्यावेळात जिल्हाधिकारीही तेथे आले. त्यांनीही तक्रार ऐकून घेत त्याबाबत सूचना केल्या.

तक्रारी करूनही दखल नाहीकाही तक्रारदारांनी लोकशाही दिनात तसेच विभागीय लोकशाही दिनात दोन-दोन वेया तक्रारी करूनही दखल घेतली जात नसेल तर या ‘लोकशाही दिनाचा’ उपयोग काय? असा सवाल केला. पाचोरा तालुक्यातील सावखेडा बु. व सावखेडा  खुर्द या दोन्ही गावांसाठी बांधलेली स्मशानभूमी पाडून टाकून लोखंड चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखलच्या मागणीसाठी तसेच या सावखेडा बु. येथील गट नं.१२५स.नं.८८ गुरचरण क्षेत्रातील अतिक्रमणाबाबत रामचंद्र पाटील व ग्रामस्थांनी लोकशाही दिनी तक्रार करून व तीन वेळा स्मरणपत्र देऊनही कारवाई झालेली नाही. तसेच विभागीय लोकशाही दिनातही दोन वेळा तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याची व्यथा ‘लोकमत’ प्रतिनिधीजवळ मांडली. तर कंडारी येथे दलित वस्तीत झालेल्या रस्ते व भूमिगत गटारीसाठी प्राप्त निधीत १ लाख २० हजाराचा अपहार झाल्याची तक्रार देवानंद वानखेडे यांनी केली आहे. त्याचीही दखल घेतली जात नसल्याची तक्रार केली.