शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
2
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
3
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
4
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
5
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
6
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
7
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
8
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
9
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
10
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
11
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
12
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
13
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
14
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
15
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
16
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
17
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
18
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
19
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
20
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
Daily Top 2Weekly Top 5

अद्यादेशानंतरही कृउबा बाहेरील कृषीमाल नियमनमुक्त नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 12:25 IST

केंद्र सरकारच्या निर्णयाला हरताळ

विजयकुमार सैतवालजळगाव : कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाला योग्य भाव मिळावा व या व्यवसायास चालना मिळावी म्हणून केंद्र सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेरील कृषी मालाच्या व्यवहारांवर शुल्क वसुली करू नये असे अद्यादेश काढत हे व्यवहार नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी कृषी उत्पन्न बाजार समितींकडून शुल्क वसुली सुरूच असून याचा शेतकऱ्यांना भुर्दंड बसण्यासह केंद्र सरकारच्या निर्णयालाही हरताळ बसत आहे. विशेष म्हणजे या संदर्भात पणन संचालनालयानेदेखील राज्यातील सर्व विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, बाजार समितींना पत्र देऊन याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र असे कोणतेही निर्देश नसल्याचे बाजार समितीचे म्हणणे आहे.कोरोनाच्या संकटात शेती क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे व शेतकºयांना आधार व्हावा म्हणून केंद्र सरकारच्यावतीने ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत विविध घोषणा केल्या. यामध्ये शेतकºयांनी उत्पादीत केलेल्या मालाला व व्यवसायाला चालना मिळण्यासाठी ‘उत्तेजन व सुविधाकरण’ या नावाने अद्यादेश (क्र. १०/२०२०, दि. ५ जून २०२०) जारी केला. यामध्ये राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कार्यक्षेत्र हे बाजार समिती आवार एवढे मर्यादीत ठेवून बाजार समितीबाहेरचे कार्यक्षेत्र सर्व शेतमालासाठी शेतकरी व व्यापारी यांच्यासाठी नियमनमुक्त करण्यात आले. त्यामुळे देशातील कोणत्याही बाजार समितीने बाजार समिती आवाराबाहेरील व्यवसायावर शेतकरी, व्यापारी व अन्य घटकाकडून फी व लेव्हीची आकारणी करू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत.पणन सहसंचाकांनी कार्यवाहीच्या दिल्या सूचनाकेंद्र सरकारच्या या अद्यादेशानंतर पणन सहसंचालकांनीही सर्व विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, बाजार समितींना पत्र देऊन (दि. २४ जून २०२०) याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. असे असले तरी याची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याचे चित्र आहे.वार्षिक दोन ते अडीच कोटींची वसुलीजळगाव जिल्ह्यात १२ कृषी उत्पन्न बाजार समिती असून त्यांच्याकडून बाजार समिती आवार तसेच आवाराबाहेर पूर्वी ठरवून दिलेल्या त्यांच्या कार्यक्षेत्रात होणाºया शेतीमाल व्यवहारासाठी शुल्क वसुली केली जात आहे. १.०५ टक्के या प्रमाणे ही वसुली असून दरवर्षी सुमारे एकेका बाजार समितीकडून दोन ते अडीच कोटी रुपयांची वसुली होते.शेतकºयांना होणार लाभकेंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे थेट शेतकºयांना लाभ होणार आहे. शेती माल खरेदी करताना वसूल करण्यात येणाºया शुल्काचा भार थेट शेतकºयांवरच येतो. मात्र या निर्णयामुळे हे शुल्क वसूल झाले नाही तर वाढीव मोबदला शेतकºयाच्या खिशात जाईल व एकप्रकारे शेती व्यवसायाला चालना मिळण्यासही मदत होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.एकट्या जळगावातील विचार केला तर शहरातील दाणाबाजार, दालमिल परिसर, फ्लोअर मिल या ठिकाणी थेट धान्य, कडधान्य यांचे मोठ्या प्रमाणात व्यवहार होऊन त्याचा लाभ शेतकºयांना होऊ शकले. तसेच जळगाव जिल्हा कापूस, केळी उत्पादनातही आघाडीवर असून या मालाच्या खरेदी ठिकाणीही बाजार समिती शुल्क आकारले जाते. मात्र या अद्यादेशानुसार हे शुल्क वाचणार असून कापूस, केळी उत्पादकांनाही मोठा लाभ होऊ शकेल.शेतीमाल नियमनमुक्तकेंद्र सरकारच्या अद्यादेशानुसार शेतकरी आता त्यांचा माल कृषी उत्पन्न बाजार समिती क्षेत्राबाहेरही इतर ठिकाणी विक्री करू शकणार आहे. तसेच यासाठी शेतकरी व्यापारी अथवा खरेदीदाराशी तसा करार करून माल विकू शकतो. त्यामुळे शेतकºयाला आपला माल बाजार समितीमध्ये न नेता विक्री करता येणार आहे. यात व्यापारी थेट शेताच्या बांधावर जाऊनदेखील माल खरेदी करू शकतील.कृषी माल नियमनमुक्त करण्यासंदर्भात केंद्र सरकारने काढलेल्या अद्यादेशाच्या अंमलबजावणी संदर्भात राज्यातील सर्व विभागीय सहनिबंधक, जिल्हा उप निबंधक, बाजार समिती यांना लेखी सूचना देण्यासह केंद्राचा आदेश पाठविला आहेत. त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे.- सतीश सोनी, संचालक, पणन संचालनालयशेतीमाल नियमनमुक्त करण्यासंदर्भात केंद्र सरकारचे अद्यादेश काढला तरी त्याची अंमलबजावणीझालेली नाही. तसे झाल्यास शेतकºयांना आपला माल बाजार समितीबाहेरही विक्री करता येणार असून शुल्क आकारणी थांबून त्याचा लाभ शेतकºयांना होईल. त्यामुळे याची अंमलबजावणी करावी, अशी व्यापाºयांचीही मागणी आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन, जळगाव.अनेक वर्षांपासून बाजार समितीमधील व्यवस्थेनुसार माल विक्री होतो. त्यामुळे ही व्यवस्था टिकून राहिली पाहिजे व हमाल, मापाडी यांचेही नुकसान होऊ नये, यासाठी बाजार समिती शुल्क रद्द करावे अथवा ते कमी तरी करावे.- संजय शाह, जिल्हाध्यक्ष, कॅट संघटना.शासनाचे जे अद्यादेश आहे, त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. मात्र सध्या तसे आदेश नाही. सरकाने निर्णय घेतला आहे, या विषयी सचिवांशी चर्चा करण्यात येईल.- कैलास चौधरी, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती.

टॅग्स :Jalgaonजळगाव