शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

११८ पैकी फक्त ३४ ग्रामपंचायतींत ग्राम कृषी विकास समित्या स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST

अमळनेर : ग्रामीण भागातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी व गावामधील नैसर्गिक साधन संपत्तीचा महत्तम विनियोग करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्राम कृषी ...

अमळनेर : ग्रामीण भागातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी व गावामधील नैसर्गिक साधन संपत्तीचा महत्तम विनियोग करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ७० टक्के ग्रामसेवकांनी या शासन निर्णयाकडे पाठ फिरवली आहे.

सर्वच अर्थव्यवस्था शेती व्यवसायाशी निगडित आहे. लहरी पर्जन्यमान, हवामानातील बदल, कीड, रोग, सुधारित जातीचे बियाणे उपलब्ध न होणे, अचानक शेतीमालाच्या दरामध्ये घसरण होणे आदी कारणांमुळे शेतीमध्ये शाश्वत उत्पन्न मिळेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे त्यावर विचार विनिमय करून मार्गदर्शन होण्यासाठी तसेच विविध योजना व प्रकल्प हाती घेण्यासाठी शासनाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ४९ (४) नुसार गावातील कृषी व संलग्न क्षेत्रातील तज्ज्ञ १२ व्यक्तींची ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्याचा निर्णय सप्टेंबर २०२० मध्ये घेतला होता.

अशी अपेक्षित समिती

सरपंच - पदसिद्ध अध्यक्ष

उपसरपंच - पदसिद्ध सदस्य

ग्रामपंचायत सदस्य (ग्रा.प. अधिनियम ४९(४ अ व ब) प्रमाणे)- सदस्य

प्रगतिशील शेतकरी (तीनपैकी एक महिला सदस्य)- सदस्य

विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष (एक) - सदस्य

शेतकरी उत्पादक / शेतकरी गट यांचे प्रतिनिधी (एक) - सदस्य

महिला बचतगट सदस्य (एक) - सदस्य

कृषिपूरक व्यावसायिक शेतकरी (दोन)- सदस्य

तलाठी - सदस्य

कृषी सहायक - सहसचिव

ग्रामसेवक / ग्रामविस्तार अधिकारी - सदस्य सचिव

अशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

समितीचे कार्य

महिन्यातून किमान एक बैठक घेणे, हवामान, पाणी, पाऊस, जमिनीचा पोत याबाबत शेतकऱ्यांना पीक लागवडीचे मार्गदर्शन करणे, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन आदी दुय्यम व्यवसायांबाबत पूरक मार्गदर्शन तसेच आधुनिक तंत्रज्ञान, पीक काढणी, बियाणे खते, एकात्मिक कीड नियंत्रण, इतर कृषी निविष्ठा, पीक कर्ज उपलब्ध करून देणे व परतफेड करणे यात समन्वय साधणे तसेच पोषण व्यवस्थापन, यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, संरक्षित शेती याबाबत मार्गदर्शन करणे आदी कामांतून शेतकऱ्यांची प्रगती होऊन कोणीही शेतकरी आत्महत्या करणार नाही, हा त्यामागचा उद्देश आहे.

तालुक्यात ११८ ग्रामपंचयती आहेत. त्यातील फक्त ३४ गावांनी ग्राम कृषी विकास समित्या स्थापन केल्या आहेत. तेथे ऑनलाइन सभा घेतल्या जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.

- भारत वारे, तालुका कृषी अधिकारी, अमळनेर