शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

११८ पैकी फक्त ३४ ग्रामपंचायतींत ग्राम कृषी विकास समित्या स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST

अमळनेर : ग्रामीण भागातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी व गावामधील नैसर्गिक साधन संपत्तीचा महत्तम विनियोग करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्राम कृषी ...

अमळनेर : ग्रामीण भागातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी व गावामधील नैसर्गिक साधन संपत्तीचा महत्तम विनियोग करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ७० टक्के ग्रामसेवकांनी या शासन निर्णयाकडे पाठ फिरवली आहे.

सर्वच अर्थव्यवस्था शेती व्यवसायाशी निगडित आहे. लहरी पर्जन्यमान, हवामानातील बदल, कीड, रोग, सुधारित जातीचे बियाणे उपलब्ध न होणे, अचानक शेतीमालाच्या दरामध्ये घसरण होणे आदी कारणांमुळे शेतीमध्ये शाश्वत उत्पन्न मिळेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे त्यावर विचार विनिमय करून मार्गदर्शन होण्यासाठी तसेच विविध योजना व प्रकल्प हाती घेण्यासाठी शासनाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ४९ (४) नुसार गावातील कृषी व संलग्न क्षेत्रातील तज्ज्ञ १२ व्यक्तींची ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्याचा निर्णय सप्टेंबर २०२० मध्ये घेतला होता.

अशी अपेक्षित समिती

सरपंच - पदसिद्ध अध्यक्ष

उपसरपंच - पदसिद्ध सदस्य

ग्रामपंचायत सदस्य (ग्रा.प. अधिनियम ४९(४ अ व ब) प्रमाणे)- सदस्य

प्रगतिशील शेतकरी (तीनपैकी एक महिला सदस्य)- सदस्य

विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष (एक) - सदस्य

शेतकरी उत्पादक / शेतकरी गट यांचे प्रतिनिधी (एक) - सदस्य

महिला बचतगट सदस्य (एक) - सदस्य

कृषिपूरक व्यावसायिक शेतकरी (दोन)- सदस्य

तलाठी - सदस्य

कृषी सहायक - सहसचिव

ग्रामसेवक / ग्रामविस्तार अधिकारी - सदस्य सचिव

अशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

समितीचे कार्य

महिन्यातून किमान एक बैठक घेणे, हवामान, पाणी, पाऊस, जमिनीचा पोत याबाबत शेतकऱ्यांना पीक लागवडीचे मार्गदर्शन करणे, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन आदी दुय्यम व्यवसायांबाबत पूरक मार्गदर्शन तसेच आधुनिक तंत्रज्ञान, पीक काढणी, बियाणे खते, एकात्मिक कीड नियंत्रण, इतर कृषी निविष्ठा, पीक कर्ज उपलब्ध करून देणे व परतफेड करणे यात समन्वय साधणे तसेच पोषण व्यवस्थापन, यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, संरक्षित शेती याबाबत मार्गदर्शन करणे आदी कामांतून शेतकऱ्यांची प्रगती होऊन कोणीही शेतकरी आत्महत्या करणार नाही, हा त्यामागचा उद्देश आहे.

तालुक्यात ११८ ग्रामपंचयती आहेत. त्यातील फक्त ३४ गावांनी ग्राम कृषी विकास समित्या स्थापन केल्या आहेत. तेथे ऑनलाइन सभा घेतल्या जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.

- भारत वारे, तालुका कृषी अधिकारी, अमळनेर