शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

११८ पैकी फक्त ३४ ग्रामपंचायतींत ग्राम कृषी विकास समित्या स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST

अमळनेर : ग्रामीण भागातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी व गावामधील नैसर्गिक साधन संपत्तीचा महत्तम विनियोग करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्राम कृषी ...

अमळनेर : ग्रामीण भागातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी व गावामधील नैसर्गिक साधन संपत्तीचा महत्तम विनियोग करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ७० टक्के ग्रामसेवकांनी या शासन निर्णयाकडे पाठ फिरवली आहे.

सर्वच अर्थव्यवस्था शेती व्यवसायाशी निगडित आहे. लहरी पर्जन्यमान, हवामानातील बदल, कीड, रोग, सुधारित जातीचे बियाणे उपलब्ध न होणे, अचानक शेतीमालाच्या दरामध्ये घसरण होणे आदी कारणांमुळे शेतीमध्ये शाश्वत उत्पन्न मिळेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे त्यावर विचार विनिमय करून मार्गदर्शन होण्यासाठी तसेच विविध योजना व प्रकल्प हाती घेण्यासाठी शासनाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ४९ (४) नुसार गावातील कृषी व संलग्न क्षेत्रातील तज्ज्ञ १२ व्यक्तींची ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्याचा निर्णय सप्टेंबर २०२० मध्ये घेतला होता.

अशी अपेक्षित समिती

सरपंच - पदसिद्ध अध्यक्ष

उपसरपंच - पदसिद्ध सदस्य

ग्रामपंचायत सदस्य (ग्रा.प. अधिनियम ४९(४ अ व ब) प्रमाणे)- सदस्य

प्रगतिशील शेतकरी (तीनपैकी एक महिला सदस्य)- सदस्य

विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष (एक) - सदस्य

शेतकरी उत्पादक / शेतकरी गट यांचे प्रतिनिधी (एक) - सदस्य

महिला बचतगट सदस्य (एक) - सदस्य

कृषिपूरक व्यावसायिक शेतकरी (दोन)- सदस्य

तलाठी - सदस्य

कृषी सहायक - सहसचिव

ग्रामसेवक / ग्रामविस्तार अधिकारी - सदस्य सचिव

अशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

समितीचे कार्य

महिन्यातून किमान एक बैठक घेणे, हवामान, पाणी, पाऊस, जमिनीचा पोत याबाबत शेतकऱ्यांना पीक लागवडीचे मार्गदर्शन करणे, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन आदी दुय्यम व्यवसायांबाबत पूरक मार्गदर्शन तसेच आधुनिक तंत्रज्ञान, पीक काढणी, बियाणे खते, एकात्मिक कीड नियंत्रण, इतर कृषी निविष्ठा, पीक कर्ज उपलब्ध करून देणे व परतफेड करणे यात समन्वय साधणे तसेच पोषण व्यवस्थापन, यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, संरक्षित शेती याबाबत मार्गदर्शन करणे आदी कामांतून शेतकऱ्यांची प्रगती होऊन कोणीही शेतकरी आत्महत्या करणार नाही, हा त्यामागचा उद्देश आहे.

तालुक्यात ११८ ग्रामपंचयती आहेत. त्यातील फक्त ३४ गावांनी ग्राम कृषी विकास समित्या स्थापन केल्या आहेत. तेथे ऑनलाइन सभा घेतल्या जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.

- भारत वारे, तालुका कृषी अधिकारी, अमळनेर