शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

गिरणेच्या पाणीसाठ्यामुळे एरंडोलचा पाणीप्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 21:06 IST

एरंडोल : गिरणा धरणात ७८ टक्के पाणीसाठा झाला असून अंजनी धरण मृत साठ्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्यामुळे एरंडोल तालुक्याचा ...

एरंडोल : गिरणा धरणात ७८ टक्के पाणीसाठा झाला असून अंजनी धरण मृत साठ्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्यामुळे एरंडोल तालुक्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न व काही प्रमाणात शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.गिरणा धरणात मुबलक पाणीसाठा झाल्यामुळे एरंडोल तालुक्यातील कासोदा व सोळा गाव सामूहिक पाणीपुरवठा योजनेला जीवनदान मिळाले आहे. त्यामुळे कासोदा, आडगाव, तळई परिसरातील पिण्याचा प्रश्न सुटलेला आहे. तसेच गिरणा निम्म कालवा व जामदा कालवा यांना आवर्तनाचे पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे कालवा क्षेत्रात भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. याशिवाय रब्बी हंगामासाठी गिरणा चे पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.पारोळ्यातील शिरसमणी, टिटवी, व चोरवड या अंजनी नदीच्या उगम परिसरात मुसळधार पाऊन झाल्यामुळे अंजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन ९५ टक्के मृत साठा निर्माण झाला आहे. अजून पाण्याची आवक सुरू असल्यामुळे अंजनी धरण आता मृत साठ्यातून बाहेर पडून जिवंत साठ्यात पदार्पण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.एरंडोल शहराचा देखील पाणीप्रश्न मिटत आहे. गिरणा व अंजनी या एरंडोल तालुक्यात धावून आल्यामुळे सर्वत्र आबादानी आणि पसरली आहे.