शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

गिरणेच्या पाणीसाठ्यामुळे एरंडोलचा पाणीप्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 21:06 IST

एरंडोल : गिरणा धरणात ७८ टक्के पाणीसाठा झाला असून अंजनी धरण मृत साठ्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्यामुळे एरंडोल तालुक्याचा ...

एरंडोल : गिरणा धरणात ७८ टक्के पाणीसाठा झाला असून अंजनी धरण मृत साठ्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्यामुळे एरंडोल तालुक्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न व काही प्रमाणात शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.गिरणा धरणात मुबलक पाणीसाठा झाल्यामुळे एरंडोल तालुक्यातील कासोदा व सोळा गाव सामूहिक पाणीपुरवठा योजनेला जीवनदान मिळाले आहे. त्यामुळे कासोदा, आडगाव, तळई परिसरातील पिण्याचा प्रश्न सुटलेला आहे. तसेच गिरणा निम्म कालवा व जामदा कालवा यांना आवर्तनाचे पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे कालवा क्षेत्रात भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. याशिवाय रब्बी हंगामासाठी गिरणा चे पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.पारोळ्यातील शिरसमणी, टिटवी, व चोरवड या अंजनी नदीच्या उगम परिसरात मुसळधार पाऊन झाल्यामुळे अंजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन ९५ टक्के मृत साठा निर्माण झाला आहे. अजून पाण्याची आवक सुरू असल्यामुळे अंजनी धरण आता मृत साठ्यातून बाहेर पडून जिवंत साठ्यात पदार्पण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.एरंडोल शहराचा देखील पाणीप्रश्न मिटत आहे. गिरणा व अंजनी या एरंडोल तालुक्यात धावून आल्यामुळे सर्वत्र आबादानी आणि पसरली आहे.