शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

स्वातंत्र्य चळवळीत एरंडोल तालुक्याचे मोलाचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 19:58 IST

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात तालुक्यातील आडगाव व एरंडोल या दोन गावांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

बी.एस.चौधरीएरंडोल, जि.जळगाव : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात तालुक्यातील आडगाव व एरंडोल या दोन गावांचे मोलाचे योगदान राहिले आहे. या गावांमध्ये स्वातंत्र्य चळवळ मोठ्या प्रमाणात फोफावली होती. दोन्ही गावे मिळून सुमारे ७० ते ८० स्वातंत्र्यसैनिकांची शासन दप्तरी नोंद झालेली होती. आज एकही स्वातंत्र सैनिक हयात नाही. त्यांच्या विधवा पत्नीची नावे दप्तरी आहेत.स्वातंत्र्यसैनिकांचे एरंडोल तालुका हे केंद्रस्थान होते. स्व.दत्तात्रेय वामन काळकर हे या चळवळीचे प्रमुख नेते होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आडगाव व एरंडोल या गावांनी यथाशक्ती योगदान दिलेले आहे. या गावांमध्ये लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, दादाभाई नौरोजी, यासारखे थोर नेते झाले नसतील परंतु या नेत्यांचे आदेश तंतोतंत पाळणारे, त्यांच्या आवाहनाला सकारात्मक साथ व प्रतिसाद देणारे असे स्थानिक नेते व कार्यकर्ते या गावांमध्ये होऊन गेले.आडगाव येथे झालेल्या स्वातंत्र्य लढ्यात तीन महिन्यापासून ते तीन वर्षापर्यंत तुरुंगवास भोगलेले तीस स्वातंत्र्यसैनिक तसेच स्वातंत्र्य लढ्यातील अनेक भूमिगत कार्यकर्ते या गावांनी दिले. १९४२ च्या लढ्यात स्वातंत्र्यसेनानी ब्रिटिशांच्या बंदुका मोडल्या होत्या. ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारात भगवान भुसारी, शामराव पाटील, त्र्यंबक वाणी हे हतात्मा झाले.या ठिकाणी ब्रिटिशांनी गोळीबार केला. तेथे हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, क्रांतिकारकांचे बलिदान याची माहिती या माध्यमातून मिळत आहे.१९४२ च्या चले जाव चळवळ या आंदोलनात तालुक्यातील सामान्य जणांनी सक्रिय सहभाग घेतला. मोठ्या सत्याग्रहातही कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. जंगल सत्याग्रहामध्ये शहादू चौधरी, नारायण मुसांदे, कौतिक पाटील, सका पुणेकर, बाजीराव पाटील, बुधा महाजन, दशरथ महाजन, हरी पाटील, नामदेव पवार, अमृत वनवे, रामदास कोळी, धनराज पांडे यांनी भाग घेतला. यापैकी आठ सत्याग्रहींना कारावासाची शिक्षा झाली. प्रभात फेऱ्या काढल्या म्हणून १४ जणांना एक वर्ष तीन महिने शिक्षा झाल्या.देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत इंग्रजांच्या बंदुकांच्या गोळ्या छातीवर झेलून हुतात्मा झालेले वीरपुत्र या तालुक्याला लाभल्याचा सर्वांना अभिमान वाटतो. तुरुंगाला घर मानणारे इंग्रजांच्या लाठ्या-काठ्या खाणारे असे कार्यकर्ते एरंडोल तालुक्याच्या मातीतून जन्माला आले. स्वत:चे घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यचळवळीत उडी घेणारे कार्यकर्ते त्यांचे शौर्य व धैर्य नव्या पिढीला प्रेरणादायी ठरू शकते.क्रांतिकारक तालुका म्हणून एरंडोल तालुक्याची ओळख झाली. न्यायासाठी संघर्ष करण्याची तयारी अन्यायाविरुद्ध लढण्याची परंपरा देशाभिमान देशप्रेम देशभक्ती या साºया बाबी तालुक्यातील जनमानसातून उमटून येतात.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनErandolएरंडोल