शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

जळगावात प्लास्टिकच्या बॉटलपासून पर्यावरण संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2017 19:14 IST

आर.व्ही.ग्रुपद्वारे टाकाऊ प्लास्टिक बॉटलपासून ड्रिप सिस्टीम तयार करीत वृक्षांना पाणी देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

 आर.व्ही.ग्रुपचा उपक्रम : 200 झाडांना टाकाऊ बॉटलद्वारे पाणी

 
जळगाव, दि.27 - वृक्षांची होणारी कत्तल व जमिनीची धूप थांबविण्यासाठी आर.व्ही.ग्रुपद्वारे टाकाऊ प्लास्टिक बॉटलपासून ड्रिप सिस्टीम तयार करीत वृक्षांना पाणी देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. आतार्पयत 200 झाडांना ग्रुपमार्फत पाणी देण्यात येत आहे.
काय आहे संकल्पना..
आर.व्ही.ग्रुपच्या सदस्यांनी टाकाऊ पाण्याच्या बॉटल्स्ला छिद्र पाडून वृक्षाला पाणी देण्यात येईल अशा पद्धतीने ड्रीप सिस्टीम तयार केली आहे. वृक्षाच्या बुंध्याजवळ ही बॉटल ठेवून त्यात रोज पाणी टाकण्यात येत असते. दिवसभर हे पाणी झाडाला मिळणार आहे. शिवाय पाण्याचे बाष्पीभवन न होता संपूर्ण पाणी झाडाला मिळणार आहे.
200 झाडांजवळ ड्रीप सिस्टींम
ग्रुपच्या सदस्यांनी शहरातील काही हॉटेलमधून रिकाम्या प्लास्टिकच्या बॉटल संकलित करून त्या परिसरातील झाडांच्या खोडाजवळ लावल्या आहेत. या झाडांना ग्रुपचे सदस्य स्वत: पाणी टाकत असतात. तर काही झाडांची जबाबदारी ही परिसरातील नागरिकांवर सोपविण्यात आली आहे. ग्रुपने आतार्पयत पिंप्राळा, जुने जळगाव, शिवाजी नगर, मु.जे.महाविद्यालय परिसरातील 200 झाडांजवळ ही ड्रीप सिस्टीम लावली आहे.
वृक्षांची पुजा करून होळी
होळीच्या दिवशी ग्रुपने वृक्षाची कत्तल न करता पुजन केले. तसेच परिसरातील कचरा संकलित करून त्याची होळी केली होती. या  रवी परदेशी, प्रदीप भोई, ऋषीकेश सोनवणे, राहुल सोनवणे, विनय अहिरे, ईश्वर पाटील, अश्विनी जाधव, पूनम परदेशी, दुर्गा ठाकूर, भुवनेश्वरी ठाकूर, रश्मी खैरनार, नेहा शिंदे, कल्याणी शिंपी,सोनाली हिवराळे यांच्यासह 39 विद्यार्थी या ग्रुपच्या माध्यमातून काम करीत आहेत.
काव्यरत्नावली चौकात आज कार्यक्रम
आर.व्ही.आर.ग्रुपमार्फत आता जळगाव शहरातील वृक्षांना ड्रीप सिस्टीम लावण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ मंगळवार 28 रोजी सकाळी 8 वाजता काव्यरत्नावली चौकात महापौर नितीन लढ्ढा यांच्या हस्ते होत आहे. यावेळी नीर फाउंडेशनचे अध्यक्ष सागर महाजन व ग्रुपचे सदस्य उपस्थित राहणार आहे.