शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - आठाई एक अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:10 IST

आज जैन संप्रदायाच्या पर्युषण पर्वाची सांगता होत आहे. आजचा दिवस म्हणजेच संवत्सरी. वेदानुसार संवत्सर म्हणजे वर्ष. संवत्सरी त्या अर्थाने वर्षातून एकदा येणारा दिवस. जैन संप्रदायात या दिवसाचे खूप महत्व आहे. पर्युषण पर्वात आठ दिवसांच्या कालावधीमध्ये अध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी अन्नत्याग करून केवळ पाणी पिऊन उपवास करण्याची प्रथा आहे. यास आठाई असे ...

आज जैन संप्रदायाच्या पर्युषण पर्वाची सांगता होत आहे. आजचा दिवस म्हणजेच संवत्सरी. वेदानुसार संवत्सर म्हणजे वर्ष. संवत्सरी त्या अर्थाने वर्षातून एकदा येणारा दिवस. जैन संप्रदायात या दिवसाचे खूप महत्व आहे. पर्युषण पर्वात आठ दिवसांच्या कालावधीमध्ये अध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी अन्नत्याग करून केवळ पाणी पिऊन उपवास करण्याची प्रथा आहे. यास आठाई असे म्हणतात. आतापर्यंत १९९९, २००८, २०११ व २०१८ मध्ये आठाई केली. प्रत्येक वेळेचा अनुभव वेगळा आहे. तत्पूर्वी १९९२ साली मला माझ्या पूज्य सत्यनारायण गोयंका यांच्याकडून अंतर्मुख होण्याची कला, विपश्यना साधना प्राप्त झाली. १९९९ साली पहिली आठाई अनुभवली. ६ किलो वजन कमी झाले. केवळ दोनच दिवस कसे तरी काम करून पुढील ६ दिवस घरी आराम करूनच व्रताची सांगता झाली. २००८ मध्ये व्रतात माझी काम करण्याची क्षमता वाढली. यावेळी ४ दिवस काम करू शकलो. २०११ साली गांधी रिसर्च फाउंडेशन म्युझियमच्या निर्मितीचे काम करीत असताना तिसरी आठाई केली. माझे गुरुजैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलाल जैन यांच्यामते आपल्या कामात मन लावून व्यग्र असणे हाच अध्यात्मिक प्रगती साधण्याचा मार्ग असल्यामुळे ते काम करणाऱ्या माणसाला इतके कठीण व्रत करण्यास कधीच उत्तेजना देत नसते. त्यामुळे त्यांना कळू न देताच मी आठ दिवसांची पचकावणी केली. माझी आठाई सुरु आहे, हे भवरलाल जैन यांना कळल्यावर पुढचे दोन दिवस घरीच रहावे लागले. यावेळी शरीरातील वेदनांकडे सातत्याने बघू शकलो हीच मी या व्रताची उपलब्धी मानतो. मन बºयापैकी शांत होते, काम करताना मन विचलित होत नव्हते. व्रत करूनही काम करण्याची क्षमता वाढल्याने एक वेगळा आत्मविश्वास आला. वय वाढत होते आणि त्याच्यासोबत येणाºया व्याधीही टाळता येणाºया नव्हत्या. २०१४ मध्ये हृदयाची समस्या होती. औषधोपचार सुरु होते. असे असतानाही सकल जैन संघाचे संघपती दलुभाऊ जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आठही दिवस सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत नेहमी प्रमाणे काम करून हे व्रत पूर्ण केले. तेही एकही औषधाची गोळी न घेता. रक्तदाबही वाढला नाही. ही एक वेगळीच अनुभूती होती.- शिरीष बर्वे

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव