शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

सुट्टीच्या दिवशीही वीज बिल वसुली मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:14 AM

महावितरण : ५० टक्के वीजबिल सवलतीची योजना लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासनाने वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला स्थगिती दिली ...

महावितरण : ५० टक्के वीजबिल सवलतीची योजना

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासनाने वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला स्थगिती दिली असली तरी, वसुली मोहिमेला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे महावितरणच्या जळगाव परिमंडळातर्फे शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशीही सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना कामावर बोलावून वसुली मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता फारुख शेख यांनी दिली.

तसेच थकबाकीदार शेतकरी बांधवांना वीजबिलात ५० टक्के सवलत लागू करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही शेख यांनी केले आहे.

कोरोनामुळे शासनाच्या सूचनेनुसार महावितरणने ग्राहकांच्या घरी जाऊन रिडिंग न घेता ग्राहकांना चार महिने सरासरी वीजबिल दिले. मात्र, महावितरणतर्फे देण्यात आलेले वीजबिल हे अवाजवी असल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांनी करून हे वीजबिल भरण्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे सध्या खान्देशात १ हजार कोटींच्या घरात थकबाकीचा आकडा पोहोचला आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणतर्फे थेट थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत होता. पण, या कारवाईला नुकतीच स्थगिती देण्यात आल्यामुळे हजारो कोटींची थकबाकी वसुली करण्याबाबत महावितरणपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे महावितरणतर्फे मार्चपूर्वी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशीही वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना पहिल्यांदाच विजबिलात ५० टक्के सवलत

कोरोना काळात महावितरणच्या विविध प्रकारच्या ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी असून, यातील सर्वाधिक थकबाकी कृषीपंप वीज ग्राहकांकडे आहे. त्यामुळे ही वसुली होण्यासाठी महावितरणने ‘महाकृषी ऊर्जा अभियानां’तर्गत शेतकऱ्यांच्या वीजबिलावर ५० टक्के सवलत दिली आहे.

हे अभियान तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार असून, पहिल्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर ५० टक्के सवलत मिळणार असून, व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. अशा प्रकारे पहिल्या वर्षी संपूर्ण थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना जवळपास ६६ टक्के सवलत मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या थकबाकीवर ३० टक्के तर तिसऱ्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना २० टक्के सवलत मिळणार आहे. या अभियानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार असल्याचे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.