शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाचा नवा अर्थ उलगडणारी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 22:04 IST

सत्ताधारी भाजपला प्रथमच आव्हानात्मक आणि संघर्षमय घडामोडींना जावे लागले सामोरे; विरोधक आक्रमक, समाजमाध्यमांमुळे राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या आश्वासनांना लगाम ; अवास्तव घोषणांचा पर्दाफाश

मिलिंद कुलकर्णीजळगाव : भारतीय लोकशाही आणि निवडणूक प्रणालीचा विचार केला असता भारतीय मतदाराने नेहमीच प्रगल्भतेने, समंजसपणे मतदान केलेले आहे. विविध जाती, पंथ, धर्म, भाषा, प्रदेश असे वैविध्य असतानाही विचार करण्याची मानसिकता एकच आहे. १९७७ आणि २०१४ या दोन निवडणुकांचा विचार केला तर त्या एका लाटेवर आरुढ होत्या. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुका या सहानुभूतीच्या भावनेवर आरुढ होत्या. यंदाची निवडणूक ही राजकारणाचा नवा अर्थ उलगडून दाखविणारी निवडणूक आहे.यंदाची लोकसभा निवडणूक वैशिष्टयपूर्ण राहील, असे जे भाकीत वर्तविले जात होते, ते सत्यात उतरत आहे. समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावाने राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या बेफाम आश्वासने आणि बेताल विधानांची पोलखोल होत आहे. सुदृढ आणि निकोप लोकशाहीच्यादृष्टीने हे सुचिन्ह आहे. मतदारांना फार काळ मूर्ख बनवता येणार नाही, असा संदेश यातून जात आहे.खान्देशातील नंदुरबार वगळता तिन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपने यापूर्वी यश मिळविले होतेच. जळगाव जिल्हा तर बालेकिल्ला म्हटला जातो. परंतु, २०१४ च्या लाटेचा प्रभाव आणि नंतरच्या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेले यश नेते आणि कार्यकर्त्यांच्या डोक्यात गेले. पक्षविस्ताराच्या नावाखाली मित्रपक्षाला दुखावण्यात आले. याचा परिणाम भाजपला या निवडणुकीत भोगावा लागत आहे.नंदुरबारात निष्ठावंत गटाच्या डॉ.सुहास नटावदकर यांनी बंडखोरी केली. पक्षाला उमेदवार मिळत नसे, त्या काळात पक्ष वाढविण्याचे, प्रसंगी पदरमोड करुन निवडणुका लढणाऱ्या प्रामाणिक आणि निस्पृह फळीतील नटावदकर हे कार्यकर्ते होते. पर्यायी उमेदवार मिळाल्यावर निष्ठावंतांना दूर लोटले जात असल्याचा संदेश त्यांच्या हकालपट्टीतून गेला आहे. धुळ्यात चित्र वेगळे आहे. मुळात अनिल गोटे यांचे भाजपशी फारसे काही सख्य नव्हते. पूर्वीची जनसंघाची पार्श्वभूमी, भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्याशी असलेली मैत्री यामुळे गोटे यांना २०१४ मध्ये भाजपचे तिकीट मिळाले. त्यापूर्वी दोनदा ते स्वबळावर आमदार म्हणून निवडून आले होतेच. महापालिका निवडणुकीतील वर्चस्वाच्या वादावरुन गोटेंची बंडखोरी घडून आली आहे. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाने त्यांची केलेली हकालपट्टी ही औपचारिकता ठरली होती.जळगाव मतदारसंघात भाजपमधील उमेदवारीचा घोळ म्हणजे कळस आहे. ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘राजकारण हे सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्तींचे काम नव्हे’ या वचनांना सार्थ ठरविणारे प्रकार घडले.रावेर मतदारसंघात भाजपला शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले तर राष्टÑवादीने सक्षम उमेदवार नसतानाही जागा सोडण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत ताणून धरत ‘आघाडीधर्म’ व्यवस्थित निभावला.लोकसभा निवडणुकीचे निकाल महिन्याने लागतील, त्या निकालाचे परिणाम हे चार महिन्यानंतर होणाºया विधानसभा निवडणुकीवर निश्चित पडतील. यंदा उमेदवारीसाठी जेवढी रस्सीखेच, संघर्ष आणि स्पर्धा दिसून आली, त्याच्या कितीतरी पट स्पर्धा विधानसभा निवडणुकीत दिसून येईल. त्या निवडणुकीचे बिजारोपण मुळात यावेळी केले जात असल्याचे निकालातून स्पष्ट होणार आहे.अवघ्या पाच वर्षात भाजप हा पक्ष भारतीय राजकारणातील शक्तिशाली, प्रबळ पक्ष म्हणून समोर आला. परंतु, यंदाच्या निवडणुकीत या पक्षाला आव्हानात्मक गोष्टींचा सामना करावा लागला. राष्टÑीय पातळीवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघेच टीकेचे प्रमुख लक्ष्य आहेत. खान्देशचा विचार केला तर बालेकिल्ला किती ठिसूळ आहे हे अवघ्या दीड महिन्यात दिसून आले. कोणत्याही मतदारसंघात विनासायास प्रक्रिया झालेली नाही. संघर्ष झालाच.अर्थात याला अंतर्गत धोरणे कारणीभूत आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव