शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

खाद्यतेलात दरवाढीचा भडका, सहा महिन्यांतच दुप्पट भाववाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:20 IST

संजय सोनार चाळीसगाव - काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. या ...

संजय सोनार

चाळीसगाव - काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. या कुटुंबांना कसे तरी जीवन जगावे लागत आहे. आधीच हातात पैसे नाहीत. अशातच काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे भाव चांगलेच कडाडले असल्याने महिलांचे स्वयंपाक घरातील नियोजन कोलमडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

विशेष म्हणजे किराणा वस्तूंमध्ये खाद्यतेलाचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. मागीलवर्षी ८० ते ८५ रुपयांना मिळणारे एक लीटर तेलाचे पॅकेट आता १५५ रुपयांपर्यंत पाेहाेचले आहे. म्हणजेच खाद्यतेलाच्या किमतीत सुमारे ७० रुपयांची वाढ झाली. सूर्यफूल तेलाचे भाव गेल्या वर्षाच्या तुलनेत ८० टक्क्यांनी वाढले आहेत. सद्य:स्थितीत बाजारातील भाव सोयाबीन तेल १५६ रुपये प्रति किलो, सूर्यफूल १८० रुपये तर शेंगदाणा तेल १७० रुपये किलो प्रमाणे असा आहे. खाद्यतेल दरवाढीने उच्चांक गाठला आहे. दरवाढीमुळे महिला त्रस्त झाल्या असून, गृहिणींचे स्वयंपाकघरातील आर्थिक गणित बिघडले आहे. डाळींपाठोपाठ खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

दररोजच्या आहारात खाद्यतेलाचा उपयोग केला जातो. वेगवेगळ्या कुटुंबात आवडीनुसार पामतेल, सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा, करडई तेल हे रोज स्वयंपाकात वापरले जाते. तेलाचे भाव वाढल्याने महिलांनी आहारात खाद्यतेलाचा वापर कमी प्रमाणात सुरू केला आहे. यामुळे भाज्यांना तडका देणे महाग झाले आहे. कोरोना संसर्गामुळे आर्थिक चणचण असतानाच खाद्यतेल, डाळी, गॅस सिलिंडर आदींची दरवाढ व महागाई नाकीनऊ आणणारी ठरत आहे. त्यामुळे शासनाने महागाईला आळा घालावा, अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजार, नैसर्गिक आपत्ती, वाढीव कस्टम ड्युटी आणि तेलाचा कृत्रिम साठा अशा वेगवेगळ्या कारणांमुळे तेलाच्या दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचे संकट, ‘लॉकडाऊन’चा बसलेला फटका यातून सावरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची गेल्या काही महिन्यांपासून धडपड सुरू आहे. अनेकांची आर्थिक ओढाताण होत असतानाच स्वयंपाक घरात रोज लागणारे खाद्यतेलाचा दर आलेख मात्र चढताच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याची मोठी झळ बसत आहे.

अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी झाले. त्याचा फटका तेलाच्या दाराला बसला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे.

- नंदू सुराणा, किराणा मॉल मालक, चाळीसगाव

यावर्षी परतीच्या पावसाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आवक होऊ शकली नाही. त्यामुळेच सात-आठ महिन्यात खाद्यतेलात दुप्पटीने वाढ झाली आहे.

-बबलू पंजाबी, किराणा व्यावसायिक, चाळीसगाव

गेल्या वर्षांपासून एकतर कोरोनामुळे व्यवहार ठप्प राहण्यासह अनेकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात तेल दरवाढीमुळे सर्वसामान्याचे बजेट कोलमडले आहे. घरखर्च सांभाळताना महिलांना किती काटकसर करावी, हा प्रश्न पडला आहे.

-सुरेखा राजेंद्र महाजन, गृहिणी, देवकरनगर, चाळीसगाव

महागाईने चिंता वाढवली आहे.गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाबरोबरच गॅस व डाळींचे भावही सतत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे महिलांना अधिक काटकसरीवर भर दिला आहे. महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने प्रयत्न केला पाहिजे.

-राखी विकास विसपुते, लक्ष्मीनगर,चाळीसगाव