शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलात दरवाढीचा भडका, सहा महिन्यांतच दुप्पट भाववाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:20 IST

संजय सोनार चाळीसगाव - काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. या ...

संजय सोनार

चाळीसगाव - काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. या कुटुंबांना कसे तरी जीवन जगावे लागत आहे. आधीच हातात पैसे नाहीत. अशातच काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे भाव चांगलेच कडाडले असल्याने महिलांचे स्वयंपाक घरातील नियोजन कोलमडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

विशेष म्हणजे किराणा वस्तूंमध्ये खाद्यतेलाचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. मागीलवर्षी ८० ते ८५ रुपयांना मिळणारे एक लीटर तेलाचे पॅकेट आता १५५ रुपयांपर्यंत पाेहाेचले आहे. म्हणजेच खाद्यतेलाच्या किमतीत सुमारे ७० रुपयांची वाढ झाली. सूर्यफूल तेलाचे भाव गेल्या वर्षाच्या तुलनेत ८० टक्क्यांनी वाढले आहेत. सद्य:स्थितीत बाजारातील भाव सोयाबीन तेल १५६ रुपये प्रति किलो, सूर्यफूल १८० रुपये तर शेंगदाणा तेल १७० रुपये किलो प्रमाणे असा आहे. खाद्यतेल दरवाढीने उच्चांक गाठला आहे. दरवाढीमुळे महिला त्रस्त झाल्या असून, गृहिणींचे स्वयंपाकघरातील आर्थिक गणित बिघडले आहे. डाळींपाठोपाठ खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

दररोजच्या आहारात खाद्यतेलाचा उपयोग केला जातो. वेगवेगळ्या कुटुंबात आवडीनुसार पामतेल, सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा, करडई तेल हे रोज स्वयंपाकात वापरले जाते. तेलाचे भाव वाढल्याने महिलांनी आहारात खाद्यतेलाचा वापर कमी प्रमाणात सुरू केला आहे. यामुळे भाज्यांना तडका देणे महाग झाले आहे. कोरोना संसर्गामुळे आर्थिक चणचण असतानाच खाद्यतेल, डाळी, गॅस सिलिंडर आदींची दरवाढ व महागाई नाकीनऊ आणणारी ठरत आहे. त्यामुळे शासनाने महागाईला आळा घालावा, अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजार, नैसर्गिक आपत्ती, वाढीव कस्टम ड्युटी आणि तेलाचा कृत्रिम साठा अशा वेगवेगळ्या कारणांमुळे तेलाच्या दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचे संकट, ‘लॉकडाऊन’चा बसलेला फटका यातून सावरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची गेल्या काही महिन्यांपासून धडपड सुरू आहे. अनेकांची आर्थिक ओढाताण होत असतानाच स्वयंपाक घरात रोज लागणारे खाद्यतेलाचा दर आलेख मात्र चढताच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याची मोठी झळ बसत आहे.

अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी झाले. त्याचा फटका तेलाच्या दाराला बसला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे.

- नंदू सुराणा, किराणा मॉल मालक, चाळीसगाव

यावर्षी परतीच्या पावसाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आवक होऊ शकली नाही. त्यामुळेच सात-आठ महिन्यात खाद्यतेलात दुप्पटीने वाढ झाली आहे.

-बबलू पंजाबी, किराणा व्यावसायिक, चाळीसगाव

गेल्या वर्षांपासून एकतर कोरोनामुळे व्यवहार ठप्प राहण्यासह अनेकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात तेल दरवाढीमुळे सर्वसामान्याचे बजेट कोलमडले आहे. घरखर्च सांभाळताना महिलांना किती काटकसर करावी, हा प्रश्न पडला आहे.

-सुरेखा राजेंद्र महाजन, गृहिणी, देवकरनगर, चाळीसगाव

महागाईने चिंता वाढवली आहे.गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाबरोबरच गॅस व डाळींचे भावही सतत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे महिलांना अधिक काटकसरीवर भर दिला आहे. महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने प्रयत्न केला पाहिजे.

-राखी विकास विसपुते, लक्ष्मीनगर,चाळीसगाव