शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

सुवासिनींनी मागितले सौभाग्यासह पर्यावरणपूरक जीवनाचे दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 2:59 PM

निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल, ठिकठिकाणी उजाड झालेली माळराने, बिघडलेले पर्जन्यचक्र या सजीवसृष्टीला आवश्यक असणाऱ्या घटकांवर मानवी वस्त्यांचे होणारे अतिक्रमण आदींचा आज जगाला सामना करावा लागत आहे. याच औचित्यपर वटसावित्री पौर्णिमेला रविवारी चाळीसगाव शहरातील विद्युल्लता कॉलनी परिसरातील महिला भगिनींनी पंचतत्वांची वटपूजा बांधून निरामय जीवनाचे मनोभावे दान वट वृक्षाकडे मागितले.

चाळीसगाव, जि.जळगाव : निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल, ठिकठिकाणी उजाड झालेली माळराने, बिघडलेले पर्जन्यचक्र या सजीवसृष्टीला आवश्यक असणाऱ्या घटकांवर मानवी वस्त्यांचे होणारे अतिक्रमण आदींचा आज जगाला सामना करावा लागत आहे. याच औचित्यपर वटसावित्री पौर्णिमेला रविवारी चाळीसगाव शहरातील विद्युल्लता कॉलनी परिसरातील महिला भगिनींनी पंचतत्वांची वटपूजा बांधून निरामय जीवनाचे मनोभावे दान वटवृक्षाकडे मागितले.दरवर्षी मान्सूनपूर्व सरींनी वटपूजेचा सण आनंदात होत असतो. पूर्वीच्या काळी मातीचा ओला गंध, अंकुरलेले कोवळे तृणांकुर, पसरलेली हिरवाई आणि थंड हवेच्या झोक्यात वटपूजा साजरी व्हायची. पण गेली अनेक वर्षे वटपूजा कडक उन्हात साजरी होत आहे. प्रकृतीच्या सृजनशीलतेचा व नवनिर्मितीच्या प्रारंभी येणाºया वटवृक्ष पूजेतून सन्मानित व्हावे आणि निसर्ग सर्वार्थाने बहरावा आणि धरती सृजनशील व्हावी म्हणून आज महिलांच्या वतीने दान मागितले गेले.निसर्ग प्रफुल्लीत राहिला तर मानवी जीवन समाधानी राहिल म्हणून आज गृहिणीनी नवनिर्मितीचा प्रणेता असलेल्या सजीव वरुणदेवाची व वर्षाॠतुची वटपूजा बांधून मनोभावे प्रार्थना केली. सर्व चराचर सृष्टीची भरभराट होवो, पाऊस चांगला पडो, शिवारात धनधान्य उपजो अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली. यावेळी शोभा कोतकर, सुनंदा ब्राह्मणकर, अलका शाह, कविता साळुंखे, जयश्री भोकरे, योगिनी ब्राह्मणकर, निर्मला महाजन, छाया महाजन आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.

टॅग्स :environmentवातावरणChalisgaonचाळीसगाव