शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

ई-पास नावालाच; आवो जावो घर तुम्हारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास ई-पास सक्तीचा करण्यात आला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास ई-पास सक्तीचा करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात ई-पास नावालाच असून ‘आओ जाओ घर तुम्हारा’, अशी परिस्थिती आहे.

लोकमत प्रतिनिधीने शनिवारी शहराच्या पाचही प्रवेशाच्या मार्गावर पाहणी केली असता ही परिस्थिती दिसून आली. दिवसा चारही प्रवेशाच्या मार्गावर एकही पोलीस तैनात नव्हता. शहरात ठिकठिकाणी पोलीस होते. मात्र, तिथे कुणाला अडवले जात नव्हते. संध्याकाळी सहा ते आठ मात्र अतिशय कडक तपासणी केली जात होती. स्वत: पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे रस्त्यावर उतरले होते.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यात ई-पासशिवाय कुठल्याही शहरात आता प्रवेश दिला जात नाही. यावेळी ई-पास देण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेकडे सोपविण्यात आली आहे.

पाच प्रमुख मार्ग; एकही कर्मचारी नाही

शहरात प्रवेशाचे चार मार्ग आहेत. भुसावळकडून येणाऱ्या मार्गावर कालिंका माता चौकात शहरात एन्ट्री मिळते. पुढे औरंगाबादकडून अजिंठा चौकात, धुळ्याकडून येताना खोटेनगर, चोपडा- यावलकडून येताना ममुराबाद नाका तर पाचोराकडून येताना डी मार्टजवळ प्रवेश मिळतो. शनिवारी या सर्व ठिकाणी एकही पोलीस नव्हता.

ममुराबाद नाका

ममुराबाद नाक्यावर संध्याकाळी पाहणी केली असता एकही पोलीस नव्हता, त्यामुळे तपासणीचा प्रश्नच नाही. भिलपुरा चौकीजवळ कर्मचारी तैनात होते.

कालिंका माता चौक

भुसावळकडून येणाऱ्या मार्गावर कालिंका माता चौकातून प्रवेश मिळतो या चौकात संध्याकाळी एकही कर्मचारी नव्हता पुढे अजिंठा चौफुलीवर मात्र शहर वाहतूक शाखेचे दोन कर्मचारी तैनात होते. त्यांच्याकडून कोणत्याही वाहनाची तपासणी केली जात नव्हती. याच चौकातून औरंगाबादकडून शहरात प्रवेश होतो.

खोटेनगर थांबा

धुळेकडून येणाऱ्या वाहनांना खोटेनगरातून शहरात प्रवेश मिळतो. दिवसभर या ठिकाणी एकही पोलीस नव्हता. संध्याकाळी काही पोलीस दिसून आले. त्यामुळे ई-पास नावालाच राहिला.

एकाच दिवशी ९०० अर्ज

शासनाने आंतरजिल्हा प्रवेशासाठी ई-पास पद्धत लागू करताच शनिवारी पोलीस दलाकडे परवानगीसाठी ९०० अर्ज प्राप्त झाले. त्यातील निम्म्याहून जास्त पास हे जिल्ह्यातीलच प्रवेशाचे होते, जिल्ह्यात या पासची गरज नाही. बाहेरदेखील विवाह सोहळा, निधन व रुग्ण ने-आणसाठीच पास मिळणार आहे. यासाठी देखील अर्ज करताना पुरावा जोडावा लागणार असून अर्जदार पुरावेच जोडत नसल्याचे दिसून आले.