शहरं
Join us  
Trending Stories
1
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
2
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
3
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
4
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
5
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
6
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
7
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
9
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
10
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
11
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
13
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
14
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
15
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
16
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
17
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
18
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
19
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
Daily Top 2Weekly Top 5

ई-पास नावालाच; आवो जावो घर तुम्हारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास ई-पास सक्तीचा करण्यात आला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास ई-पास सक्तीचा करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात ई-पास नावालाच असून ‘आओ जाओ घर तुम्हारा’, अशी परिस्थिती आहे.

लोकमत प्रतिनिधीने शनिवारी शहराच्या पाचही प्रवेशाच्या मार्गावर पाहणी केली असता ही परिस्थिती दिसून आली. दिवसा चारही प्रवेशाच्या मार्गावर एकही पोलीस तैनात नव्हता. शहरात ठिकठिकाणी पोलीस होते. मात्र, तिथे कुणाला अडवले जात नव्हते. संध्याकाळी सहा ते आठ मात्र अतिशय कडक तपासणी केली जात होती. स्वत: पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे रस्त्यावर उतरले होते.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यात ई-पासशिवाय कुठल्याही शहरात आता प्रवेश दिला जात नाही. यावेळी ई-पास देण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेकडे सोपविण्यात आली आहे.

पाच प्रमुख मार्ग; एकही कर्मचारी नाही

शहरात प्रवेशाचे चार मार्ग आहेत. भुसावळकडून येणाऱ्या मार्गावर कालिंका माता चौकात शहरात एन्ट्री मिळते. पुढे औरंगाबादकडून अजिंठा चौकात, धुळ्याकडून येताना खोटेनगर, चोपडा- यावलकडून येताना ममुराबाद नाका तर पाचोराकडून येताना डी मार्टजवळ प्रवेश मिळतो. शनिवारी या सर्व ठिकाणी एकही पोलीस नव्हता.

ममुराबाद नाका

ममुराबाद नाक्यावर संध्याकाळी पाहणी केली असता एकही पोलीस नव्हता, त्यामुळे तपासणीचा प्रश्नच नाही. भिलपुरा चौकीजवळ कर्मचारी तैनात होते.

कालिंका माता चौक

भुसावळकडून येणाऱ्या मार्गावर कालिंका माता चौकातून प्रवेश मिळतो या चौकात संध्याकाळी एकही कर्मचारी नव्हता पुढे अजिंठा चौफुलीवर मात्र शहर वाहतूक शाखेचे दोन कर्मचारी तैनात होते. त्यांच्याकडून कोणत्याही वाहनाची तपासणी केली जात नव्हती. याच चौकातून औरंगाबादकडून शहरात प्रवेश होतो.

खोटेनगर थांबा

धुळेकडून येणाऱ्या वाहनांना खोटेनगरातून शहरात प्रवेश मिळतो. दिवसभर या ठिकाणी एकही पोलीस नव्हता. संध्याकाळी काही पोलीस दिसून आले. त्यामुळे ई-पास नावालाच राहिला.

एकाच दिवशी ९०० अर्ज

शासनाने आंतरजिल्हा प्रवेशासाठी ई-पास पद्धत लागू करताच शनिवारी पोलीस दलाकडे परवानगीसाठी ९०० अर्ज प्राप्त झाले. त्यातील निम्म्याहून जास्त पास हे जिल्ह्यातीलच प्रवेशाचे होते, जिल्ह्यात या पासची गरज नाही. बाहेरदेखील विवाह सोहळा, निधन व रुग्ण ने-आणसाठीच पास मिळणार आहे. यासाठी देखील अर्ज करताना पुरावा जोडावा लागणार असून अर्जदार पुरावेच जोडत नसल्याचे दिसून आले.