शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पारोळा तालुक्यात २७ गावांना तीव्र पाणी टंचाईचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 17:44 IST

पारोळा तालुक्यातील सर्वच छोट्या मोठ्या प्रकल्पांनी तळ गाठला असून २७ गावांना पाणी टंचाईचे चटके बसत आहेत. यामुळे १२ गावांना टँकर तर १२ गावांना विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, ३ गावांमधून पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देफक्त बोरी धरणातून टँकर भरण्याची व्यवस्थासहा प्रकल्पांमध्ये केवळ मृतसाठा शिल्लकग्रामस्थांची पाण्यासाठी शेतांकडे धाव

लोकमत आॅनलाईनपारोळा, दि.१८ : तालुक्यातील वडगांव प्र अ, हिवरखेडे, कंकराज, सांगवी, मोंढाळे े(पिंपळभैरव) पोपटनगर, मोहाडी दहिगाव, रत्नापिंप्री, मंगरुळ, खेडीढोक, मेहु, टेहू, या १२ गावांना ४ शासकीय, २ खाजगी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर जोगलखेड तांडा, हनुमंतखेडे, पुनगाव, या तीन गावांमधून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी टँकरची मागणी केली जात आहे, तसा प्रस्ताव उपविभागीय पाणी पुरवठा भाग (अमळनेर) यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.१२ गावांना विहिरी अधिग्रहिततालुक्यात एकूण १२ गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी खाजगी विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यात जिराळी, आंबापिंप्री, शेळावे खुर्द, राजवड, लोणी खुर्द, इंधवे, महाळपूर,कराडी,पळासखेडे, रामनगर, नेरपाट, भिलाली या गावांचा समावेश असून तेथील ग्रामस्थांना तुर्त काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.तालुक्यात अनेक छोट्या- मोठ्या गावांना कमी अधिक प्रमाणात पाणी टंचाईची झळ बसत असून या समस्येवर मात करण्यासाठी शासकीय उपायांची वाट न पाहता ग्रामस्थ दररोज बैलगाडी, लोटगाडी, दुचाकी, सायकलवर ड्रम किंवा टाक्या ठेऊन शेतांमधून पिण्यासाठी पाणी आणत आहेत. यात मुंदाणे प्र अ, पोपटनगर या दोन गावांचा प्रामुख्याने समावेश आहे.एप्रिल आणि मे हे तीव्र उन्हाळ्याचे अजून दोन महिने शिल्लक असून ग्रामीण भागातील जनतेला त्यांना तोंड द्यायचे आहे.प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरजतालुक्यात फक्त बोरी धरणात टँकर भरण्याची तेवढी व्यवस्था आहे . पण उर्वरित भोकरबारी, कंकराज, इंदासी, शिरसमणी, खोलसर, सावरखेडे या सर्व धरणात मृत साठा तेवढा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात पाणी टंचाईची स्थिती कोणते वळण घेते याबाबत सर्वच स्तरावर चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने तातडीने उपाययोजनांबाबत पावले उचलण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Waterपाणी