शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

‘अवकाळी’ मुळे  कोथिंबीर वधारला, किराणा साहित्याचेही दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 19:48 IST

स्थिर असलेल्या भाजीपाल्यात वाढ

जळगाव :  गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्यासह भाजीपाल्याच्या भावात वाढ होऊ लागली आहे. भाजीपाल्यात कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबू, कांदे यांचे भाव वाढले आहे तर टमाटे, भरीताचे वांगे चांगलेच स्वस्त झाले आहे. किराणा साहित्यात शेंगदाणे, तूप, मठ डाळ यांचे भाव वधारले आहे तर साखर स्वस्त झाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून किराणा साहित्यासह भाजीपाल्याचे दर जवळपास स्थिरच होते. यात गेल्या दोन आठवड्यापासून भाजीपाला व किराणा साहित्याचे भाव वाढू लागले होते. ते अद्यापही कायम आहे.   किराणा भावाचा विचार केला तर या आठवड्यात अनेक वस्तूंचे भाव वाढले  आहेत.  शेंगदाण्याचे भाव ११५ ते १२० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. अशाच प्रकारे बेसणपीठदेखील वधारले असून ते ८५ ते ९० रुपये प्रति किलो झाले आहे. रवा ३५ ते ४० रुपये, मैदा ३५ ते ४० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.   गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या तुपाचेही भाव या आठवड्यात वाढून ते ११० रुपयांवरून १२० ते १२५ रुपयांवर पोहचले आहे. 

बटाटे स्वस्त, कांदे वधारले

गेल्या अनेक दिवसांपासून  बटाट्याचे भाव चांगलेच वाढले होते. मात्र आता दोन आठवड्यांपासून नवीन बटाट्याची आवक सुरू झाल्याने बटाटे गेल्या आठवड्यात ३० रुपयांवर आले होते. आता ते २५ रुपयांवर आले आहे. मात्र कांद्याचे भाव ३० रुपयांवरून ५० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. गाजरचे भाव पुन्हा वधारले गाजरचे भाव पुन्हा वाढले आहे. गेल्या आठवड्यात २५  रुपये प्रति किलोवर असलेल्या गाजरचे भाव ३० ते ३५ रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. साखरेचा गोडवागेल्या काही दिवसांपासून साखर ३८ रुपये प्रति किलोवर स्थिर होते. मात्र आता हे भाव ३६ रुपये प्रति किलोवर आले आहेत. तसे पाहता दिवाळीच्या काळात साखरेला मागणी वाढते व भावही वधारतात. मात्र यंदा हे भाव ३८ रुपयांवर कायम होते. आता ते कमी झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला व किराणा साहित्याचे भाव वाढत आहे. कांदा स्वस्त झाल्याने दिलासा होता. मात्र आता तो पुन्हा वधारल्याने व  इतरही भाज्यांचे  भाव वाढल्याने   बोझा वाढत आहे.   - संजय कोळी, ग्राहक गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्याचे भाव सध्या हळूहळू वाढू लागले आहेत. या आठवड्यात मात्र साखर व साबुदाण्याचे भाव कमी झाले आहेत.    - सचिन छाजेड,  व्यापारीअवकाळी पावसामुळे कोथिंबीरच्या आवकवर परिणाम झाल्याने त्याचे भाव चांगलेच वाढले आहेत. सोबतच कांद्याचेही भाव वधारले आहेत. टमाटे मात्र स्वस्त झाले आहे.   - सूर्यकांत चौधरी, भाजीपाला विक्रेते

टॅग्स :Jalgaonजळगाव