शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

मेगाब्लॉकमुळे मुंबईकडून येणाऱ्या गाड्या दोन तास लेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:10 IST

गैरसोय : जळगावहुन मुंबईकडे जाणाऱ्या गाड्याही विलंबाने जळगाव : मुंबई विभागातील आटगाव रेल्वे स्टेशनजवळ गर्डर टाकण्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने ...

गैरसोय : जळगावहुन मुंबईकडे जाणाऱ्या गाड्याही विलंबाने

जळगाव : मुंबई विभागातील आटगाव रेल्वे स्टेशनजवळ गर्डर टाकण्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने रविवारी पहाटे घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे अप आणि डाऊन मार्गावरच्या गाड्यांचा चांगलाच खोळंबा झाला. मुंबईवरून येणाऱ्या गाड्या दोन तास आणि जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्याही एक ते दीड तास विलंबाने धावल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.

रेल्वे प्रशासनातर्फे खडवली आणि आटगावदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील मर्यादित उंचीचे सबवे (एलएचएस) च्या आरएच गर्डर टाकण्यासाठी शनिवारी रात्री ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला होता.

शनिवारी मध्यरात्री २.१५ पासून ते रविवारी सकाळी ०७. २५ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला होता. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणारी आदिलाबाद एक्स्प्रेस व सिकंदराबाद एक्स्प्रेस या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच काही गाड्या सुरत मार्गे वळविण्यात आल्या होत्या. दरम्यान, मध्य रात्रीच्या या ब्लॉकमुळे तुरळक गाड्यांवरच परिणाम झाला असला, तरी ऐन कडक उन्हाळ्यात या गाड्या विलंबाने धावल्यामुळे आरोग्यावरही परिणाम झाला असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

इन्फो :

काशी, गीतांजली व कामाख्या एक्स्प्रेस दोन तास लेट

या ब्लॉकमुळे रविवारी सकाळच्या सत्रातील मुंबईकडून जळगावकडे येणाऱ्या गाड्या दोन तासांपर्यंत विलंबाने धावल्या. यामध्ये काशी एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, कामाख्या एक्स्प्रेस या तिन्ही सुपरफास्ट गाड्या दोन तास विलंबाने धावल्या. प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद असलेली गीतांजली एक्स्प्रेस तिच्या निर्धारित वेळेनुसार जळगावला दुपारी १२ वाजता पोहोचण्याऐवजी दुपारी दोन वाजता पोहोचली तर कामाख्या एक्स्प्रेस दुपारी दीड वाजता पोहोचण्याऐवजी जळगावाला सव्वा तीन वाजता तर काशी एक्स्प्रेसही सव्वा तीन वाजता पोहोचली. परिणामी, यामुळे जळगाव रेल्वे स्टेशनवर गाडीची वाट पाहत थांबून असलेल्या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

इन्फो :

मुंबईकडे जाणाऱ्या गाड्याही विलंबाने

रविवारी या ब्लॉकचा परिणाम जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवरही झाला. यामध्ये

जनता एक्स्प्रेस दोन तास लेट, गरीबरथ एक्स्प्रेस एक तास व सेवाग्राम एक्स्प्रेसही एक तास लेट धावली. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचीही गैरसोय झालेली दिसून आली.