शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याची गळतीमुळे नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 17:12 IST

सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही पूर्णपणे जीर्ण झालेली आहे. यामुळे सुमारे ६० ते ६५ टक्के पाण्याची नासाडी ही जीर्ण पाईपलाईनद्वारे होत आहे.

ठळक मुद्देगळतीमुळे ६० ते ६५ टक्के पाण्याची नासाडीकर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याबद्दल नाराजी

निपाणे, ता.एरंडोल, जि.जळगाव : सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही पूर्णपणे जीर्ण झालेली आहे. यामुळे सुमारे ६० ते ६५ टक्के पाण्याची नासाडी ही जीर्ण पाईपलाईनद्वारे होत आहे.

ही पाईप लाईन गिरणा नदीवरुन जवळपास १५ कि.मी.रोडच्या साइडने आलेली आहे व अंतुर्ली गावाजवळ या पाईप लाईनचा फिल्टर प्लॅन आहे. या पाईप लाईनवर जवळपास २५ ते ३० व्हॉल व नॉनरिटर्न व्हॉल आहेत. त्यापैकी मोजून १० ते १२ व्हॉल हे सुस्थितीत आहेत. त्यापैकी बाकीच्या व्हॉल्सना शेताजवळ, तर नाल्याजवळ गळती लागलेली आहे. याच गळती लागलेल्या व्हॉल्सच्या पाण्यावर काही शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केलेली आहे, तर काहींनी ते पाणी विहिरीत उतरवले आहे. हे सर्व दृश्य सर्वांसमोर दिसते. तरी देखील या योजनेचे कर्मचारी बघ्याची भूमिका घेत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.दरम्यान, यासंदर्भात काही शेतकरी या योजनेच्या कर्मचाऱ्यांना मिळाले आहेत, अशी चर्चा होत आहे.सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर कोणताही अधिकारी येत नाही किंवा पाईपलाईनची स्थिती काय आहे हेसुद्धा पाहत नाही.गळती होणाºया या पाईप लाईनमधून ६० ते ६५ टक्के पाण्याची नासाडी होते. उर्वरित पाणी अंतुर्ली गावाजवळ फिल्टर प्लॅनवर पोहचते. याकडे अधिकारीच बघ्याची भूमिका घेत असल्याचा त्रस्त नागरिकांचा आरोप आहे.एकीकडे पाण्याची नासाडी होत आहे तर दुसरीकडे पाण्याची टंचाई, अशी स्थिती आहे. सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही जीर्ण झालेली आहे. या योजनेवर पूर्वी १५ ते १६ गावांना दर चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जात होता. आता या योजनेवर मोजून चार ते पाच गावे अवलंबून आहेत. तरीदेखील दोन ते तीन दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. तसेच वर्षाची पाणीपट्टी आकारली जाते. ती जवळपास २१०० रुपयांपर्यंत आहे. या योजनेची अधिकाºयांनी स्वत: चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा पाईप लाईन ही काही ठिकाणी जमिनीत आहे अशा ठिकाणी मोकाट कुत्री, गुरेढोरे पाणी पितात व उष्णतेमुळे बसतात. त्याचा पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा केला जातो.अंतुर्ली गावाजवळ पाणी फिल्टर प्लॅन आहे. मात्र तो कित्येक वर्षांपासून बंद आहे. या पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईErandolएरंडोल