शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याची गळतीमुळे नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 17:12 IST

सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही पूर्णपणे जीर्ण झालेली आहे. यामुळे सुमारे ६० ते ६५ टक्के पाण्याची नासाडी ही जीर्ण पाईपलाईनद्वारे होत आहे.

ठळक मुद्देगळतीमुळे ६० ते ६५ टक्के पाण्याची नासाडीकर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याबद्दल नाराजी

निपाणे, ता.एरंडोल, जि.जळगाव : सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही पूर्णपणे जीर्ण झालेली आहे. यामुळे सुमारे ६० ते ६५ टक्के पाण्याची नासाडी ही जीर्ण पाईपलाईनद्वारे होत आहे.

ही पाईप लाईन गिरणा नदीवरुन जवळपास १५ कि.मी.रोडच्या साइडने आलेली आहे व अंतुर्ली गावाजवळ या पाईप लाईनचा फिल्टर प्लॅन आहे. या पाईप लाईनवर जवळपास २५ ते ३० व्हॉल व नॉनरिटर्न व्हॉल आहेत. त्यापैकी मोजून १० ते १२ व्हॉल हे सुस्थितीत आहेत. त्यापैकी बाकीच्या व्हॉल्सना शेताजवळ, तर नाल्याजवळ गळती लागलेली आहे. याच गळती लागलेल्या व्हॉल्सच्या पाण्यावर काही शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केलेली आहे, तर काहींनी ते पाणी विहिरीत उतरवले आहे. हे सर्व दृश्य सर्वांसमोर दिसते. तरी देखील या योजनेचे कर्मचारी बघ्याची भूमिका घेत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.दरम्यान, यासंदर्भात काही शेतकरी या योजनेच्या कर्मचाऱ्यांना मिळाले आहेत, अशी चर्चा होत आहे.सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर कोणताही अधिकारी येत नाही किंवा पाईपलाईनची स्थिती काय आहे हेसुद्धा पाहत नाही.गळती होणाºया या पाईप लाईनमधून ६० ते ६५ टक्के पाण्याची नासाडी होते. उर्वरित पाणी अंतुर्ली गावाजवळ फिल्टर प्लॅनवर पोहचते. याकडे अधिकारीच बघ्याची भूमिका घेत असल्याचा त्रस्त नागरिकांचा आरोप आहे.एकीकडे पाण्याची नासाडी होत आहे तर दुसरीकडे पाण्याची टंचाई, अशी स्थिती आहे. सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही जीर्ण झालेली आहे. या योजनेवर पूर्वी १५ ते १६ गावांना दर चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जात होता. आता या योजनेवर मोजून चार ते पाच गावे अवलंबून आहेत. तरीदेखील दोन ते तीन दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. तसेच वर्षाची पाणीपट्टी आकारली जाते. ती जवळपास २१०० रुपयांपर्यंत आहे. या योजनेची अधिकाºयांनी स्वत: चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा पाईप लाईन ही काही ठिकाणी जमिनीत आहे अशा ठिकाणी मोकाट कुत्री, गुरेढोरे पाणी पितात व उष्णतेमुळे बसतात. त्याचा पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा केला जातो.अंतुर्ली गावाजवळ पाणी फिल्टर प्लॅन आहे. मात्र तो कित्येक वर्षांपासून बंद आहे. या पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईErandolएरंडोल