शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याची गळतीमुळे नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 17:12 IST

सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही पूर्णपणे जीर्ण झालेली आहे. यामुळे सुमारे ६० ते ६५ टक्के पाण्याची नासाडी ही जीर्ण पाईपलाईनद्वारे होत आहे.

ठळक मुद्देगळतीमुळे ६० ते ६५ टक्के पाण्याची नासाडीकर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याबद्दल नाराजी

निपाणे, ता.एरंडोल, जि.जळगाव : सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही पूर्णपणे जीर्ण झालेली आहे. यामुळे सुमारे ६० ते ६५ टक्के पाण्याची नासाडी ही जीर्ण पाईपलाईनद्वारे होत आहे.

ही पाईप लाईन गिरणा नदीवरुन जवळपास १५ कि.मी.रोडच्या साइडने आलेली आहे व अंतुर्ली गावाजवळ या पाईप लाईनचा फिल्टर प्लॅन आहे. या पाईप लाईनवर जवळपास २५ ते ३० व्हॉल व नॉनरिटर्न व्हॉल आहेत. त्यापैकी मोजून १० ते १२ व्हॉल हे सुस्थितीत आहेत. त्यापैकी बाकीच्या व्हॉल्सना शेताजवळ, तर नाल्याजवळ गळती लागलेली आहे. याच गळती लागलेल्या व्हॉल्सच्या पाण्यावर काही शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केलेली आहे, तर काहींनी ते पाणी विहिरीत उतरवले आहे. हे सर्व दृश्य सर्वांसमोर दिसते. तरी देखील या योजनेचे कर्मचारी बघ्याची भूमिका घेत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.दरम्यान, यासंदर्भात काही शेतकरी या योजनेच्या कर्मचाऱ्यांना मिळाले आहेत, अशी चर्चा होत आहे.सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर कोणताही अधिकारी येत नाही किंवा पाईपलाईनची स्थिती काय आहे हेसुद्धा पाहत नाही.गळती होणाºया या पाईप लाईनमधून ६० ते ६५ टक्के पाण्याची नासाडी होते. उर्वरित पाणी अंतुर्ली गावाजवळ फिल्टर प्लॅनवर पोहचते. याकडे अधिकारीच बघ्याची भूमिका घेत असल्याचा त्रस्त नागरिकांचा आरोप आहे.एकीकडे पाण्याची नासाडी होत आहे तर दुसरीकडे पाण्याची टंचाई, अशी स्थिती आहे. सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही जीर्ण झालेली आहे. या योजनेवर पूर्वी १५ ते १६ गावांना दर चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जात होता. आता या योजनेवर मोजून चार ते पाच गावे अवलंबून आहेत. तरीदेखील दोन ते तीन दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. तसेच वर्षाची पाणीपट्टी आकारली जाते. ती जवळपास २१०० रुपयांपर्यंत आहे. या योजनेची अधिकाºयांनी स्वत: चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.सोळागाव प्रादेशिक पाणीपुरवठा पाईप लाईन ही काही ठिकाणी जमिनीत आहे अशा ठिकाणी मोकाट कुत्री, गुरेढोरे पाणी पितात व उष्णतेमुळे बसतात. त्याचा पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा केला जातो.अंतुर्ली गावाजवळ पाणी फिल्टर प्लॅन आहे. मात्र तो कित्येक वर्षांपासून बंद आहे. या पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईErandolएरंडोल