शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

गैरसोयीमुळे विद्यार्थ्यांनी रोखली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 21:41 IST

गुढे येथे व्यक्त झाला संताप : जागा मिळत नसल्याने करावा लागतो खाजगी वाहनाने प्रवास

गुढे, ता. भडगाव : सकाळची बस ही नेहमीच भरुन येत असल्याने अनेकदा बसमध्ये चढायलाही मिळत नाही, या कारणाने गुढे येथील विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त करीत बस गुरुवारी रोखून धरली.येथे ४ रोजी सकाळी साडेसहा वाजता चाळीसगाव- भडगाव ही बस नेहमी प्रमाणे बहाळ येथुन भरुन आली. यावेळी गुढे बसस्थानकावर कोळगाव येथे महाविद्यालयात शिक्षण घेणारे चाळीस ते पन्नास पासधारक विद्यार्थी, विद्यार्थिनी बसची वाट पहात उभे होते. परंतु बस बहाळ येथील विद्यार्थ्यांनी आधीच भरली असल्याने जागा न मिळाल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आणी पालकांनी गुढे बसस्टॉपवर सुमारे दोन तास ही बस अडवुन धरली होती.येथील विद्यार्थ्यांना बस मध्ये जागा मिळत नसल्याने बसचा पास काढूनही खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. येथील विद्यार्थी दररोज सकाळी साडेसहा वाजेच्या बसने कोळगावच्या गोपू पाटील विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जात असतात परंतु चाळीसगाव -भडगाव बस बहाळ येथूनच पूर्ण भरुन येत असल्याने गुढे येथील विद्यार्थ्यांना बस मध्ये बसायला जागा मिळत नाही. सर्व विद्यार्थी बहाळ पासूनच उभे राहूनच प्रवास करतात. अनेकदा तर काही विद्यार्थ्यांना उभे राहण्यासाठीही बस मध्ये जागा नसते. यामुळे त्यांना नाईलाजाने खाजगी वाहनाने भाडे खर्च करुन प्रवास करावा लागतो. नेहमीच पदरमोड करून प्रवास करणे सर्वसाधारण विद्यार्थ्यांना न परवडणारे असून येथील विद्यार्थ्यांची संख्या पाहता जादाची बस सोडावी अशी मागणी आहे.दरम्यान काही बस चालक हे विद्यार्थी संख्या पाहून गुढे बस स्टॉप वर बस न थांबवतात पुढे निघून जातात. परंतु गुरुवारी सर्व विद्यार्थी गाडी समोरच उभे राहिले व बस चालकांचा नाईलाज झाला आणि गाडी दोन तास उभी करून ठेवली. जोपर्यंत पर्यार्यी व्यवस्था महामंडळ करत नाही तोपर्यंत बस जाऊ देणार नाहीत असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला तेव्हा बस चालक आणि वाहक वाहकांनी संबंधित आगार व्यवस्थापकांशी संपर्क करुन ही माहिती दिली. परंतु काहीच दखल घेतली नाही.शेवटी दोन तासापर्यंत थांबलेल्या या गाडीतील प्रवाशांचा विचार करून बस भडगावच्या दिशेने सोडण्यात आली.जादाची बस सोडण्याची मागणीबस नेहमीच बहाळ येथून भरुन येत असल्याने गुढे येथील विद्यार्थ्यांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. तसेच काही वेळेस तर बसमध्ये शिरायलाही जागा नसते. यामुळे ही बाब लक्षात घेता गुढे येथील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त बस फेरी सुरू करावी, अशी मागणी असून याबाबत संतप्त विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीमार्फत आमदार किशोर पाटील यांना निवेदन दिले आहे.