शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

गैरसोयीमुळे विद्यार्थ्यांनी रोखली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 21:41 IST

गुढे येथे व्यक्त झाला संताप : जागा मिळत नसल्याने करावा लागतो खाजगी वाहनाने प्रवास

गुढे, ता. भडगाव : सकाळची बस ही नेहमीच भरुन येत असल्याने अनेकदा बसमध्ये चढायलाही मिळत नाही, या कारणाने गुढे येथील विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त करीत बस गुरुवारी रोखून धरली.येथे ४ रोजी सकाळी साडेसहा वाजता चाळीसगाव- भडगाव ही बस नेहमी प्रमाणे बहाळ येथुन भरुन आली. यावेळी गुढे बसस्थानकावर कोळगाव येथे महाविद्यालयात शिक्षण घेणारे चाळीस ते पन्नास पासधारक विद्यार्थी, विद्यार्थिनी बसची वाट पहात उभे होते. परंतु बस बहाळ येथील विद्यार्थ्यांनी आधीच भरली असल्याने जागा न मिळाल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आणी पालकांनी गुढे बसस्टॉपवर सुमारे दोन तास ही बस अडवुन धरली होती.येथील विद्यार्थ्यांना बस मध्ये जागा मिळत नसल्याने बसचा पास काढूनही खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. येथील विद्यार्थी दररोज सकाळी साडेसहा वाजेच्या बसने कोळगावच्या गोपू पाटील विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जात असतात परंतु चाळीसगाव -भडगाव बस बहाळ येथूनच पूर्ण भरुन येत असल्याने गुढे येथील विद्यार्थ्यांना बस मध्ये बसायला जागा मिळत नाही. सर्व विद्यार्थी बहाळ पासूनच उभे राहूनच प्रवास करतात. अनेकदा तर काही विद्यार्थ्यांना उभे राहण्यासाठीही बस मध्ये जागा नसते. यामुळे त्यांना नाईलाजाने खाजगी वाहनाने भाडे खर्च करुन प्रवास करावा लागतो. नेहमीच पदरमोड करून प्रवास करणे सर्वसाधारण विद्यार्थ्यांना न परवडणारे असून येथील विद्यार्थ्यांची संख्या पाहता जादाची बस सोडावी अशी मागणी आहे.दरम्यान काही बस चालक हे विद्यार्थी संख्या पाहून गुढे बस स्टॉप वर बस न थांबवतात पुढे निघून जातात. परंतु गुरुवारी सर्व विद्यार्थी गाडी समोरच उभे राहिले व बस चालकांचा नाईलाज झाला आणि गाडी दोन तास उभी करून ठेवली. जोपर्यंत पर्यार्यी व्यवस्था महामंडळ करत नाही तोपर्यंत बस जाऊ देणार नाहीत असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला तेव्हा बस चालक आणि वाहक वाहकांनी संबंधित आगार व्यवस्थापकांशी संपर्क करुन ही माहिती दिली. परंतु काहीच दखल घेतली नाही.शेवटी दोन तासापर्यंत थांबलेल्या या गाडीतील प्रवाशांचा विचार करून बस भडगावच्या दिशेने सोडण्यात आली.जादाची बस सोडण्याची मागणीबस नेहमीच बहाळ येथून भरुन येत असल्याने गुढे येथील विद्यार्थ्यांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. तसेच काही वेळेस तर बसमध्ये शिरायलाही जागा नसते. यामुळे ही बाब लक्षात घेता गुढे येथील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त बस फेरी सुरू करावी, अशी मागणी असून याबाबत संतप्त विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीमार्फत आमदार किशोर पाटील यांना निवेदन दिले आहे.