शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील गतिरोधकांमुळे उद्योजकांसह वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 12:52 IST

दररोज वाहतुकीची कोंडी

ठळक मुद्देवाढत्या अपघातामुळे गतिरोधक टाकल्याचे बाजार समितीचे म्हणणेउद्योग संघटनांचा विरोध

जळगाव : जळगाव-औरंगाबाद मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर टाकण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे या मार्गावर दररोज वाहतुकीची कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. यामुळे वाहनधारकांसह उद्योजक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक टाकण्यास बंदी असतानाही या ठिकाणी हे गतिरोधक टाकण्यात आले आहे. अपघात होत असल्याने व्यापाऱ्यांनी हे गतिरोधक टाकले असल्याचे बाजार समितीच्यावतीने सांगण्यात आले.जळगाव-औरंगाबाद मार्ग अत्यंत वर्दळीचा असून येथे अवजड वाहनांसह लहान-मोठी वाहने नेहमी ये-जा करीत असतात. त्यामुळे येथे पूर्वीपासूनच वाहनांची नेहमी गर्दी असते. असे असताना बाजार समितीसमोर गतिरोधक टाकल्याने वाहन कोंडीत अधिक भर पडली आहे.अपघातामुळे गतिरोधकाचा निर्णयया मार्गावर कृउबातील व्यापारी, आडते व इतर कर्मचारी नेहमी ये जा करीत असतात. या ठिकाणी वारंवार अपघात होऊन अनेकांना दुखापत होण्यासह काही जणांना जीवही गमवावा लागल्याचे सांगत या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी मार्केट यार्ड आडत असोसिएशनने कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लक्ष्मण पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर येथे हे गतिकरोधक टाकण्यात आले. दररोज संध्याकाळी वाहनांच्या रांगा बाजार समितीसमोर गतिरोधक टाकल्याने येथे दररोज वाहनांची मोठी कोंडी होत आहे. त्यात संध्याकाळी तर थेट ‘लोकमत’ कार्यालय ते अजिंठा चौफुली दरम्यान वाहनांच्या दुतर्फा रांगाच्या रांगा लागत आहे. यात बºयाच वेळा रुग्णवाहिकादेखील अडकल्याची माहिती उद्योजकांनी दिली. इतकेच नव्हे तर प्रसूत महिला, इतर रुग्णही ताटकळत आहेत, अशी वाहनधारकांची तक्रार आहे.उद्योग संघटनांचा विरोधऔद्योगिक वसाहत परिसरात ये-जा करणाºया उद्योजकांची संख्याही मोठी असून दररोज संध्याकाळी येताना ते या वाहन कोंडीत सापडत असल्याने या त्रासामुळे ते त्रस्त झाले आहेत. अर्धा ते एक तास वाहन कोंडीत अडकणे आता दररोजचे झाले असून या वर उपाययोजना करण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे. या संदर्भात विविध उद्योग संघटनांनी एकत्र येत या गतिरोधकाच्या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.महामार्गावर गतिरोधक टाकलेच कसे?राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक टाकता येत नाही. असे असले तरी जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ -एफ या महामार्गावर गतिरोधक टाकलेच कसे, असा संतप्त सवालही उद्योजक, वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.रस्ता खराब, वाहने भरधाव जाणार कशी?हा मार्ग मुळातच खराब झाल्याने जागोजागी असलेल्या खड्ड्यामुळे येथे वाहनांचा वेग कमीच असतो. त्यामुळे भरधाव वेगातील वाहनांमुळे अपघात होणे शक्य नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.जनतेला वेठीस का धरतात ?अपघात होत असल्याचे कारण सांगून गतिरोधक टाकले असले तरी बाजार समितीच्या आवारातून येताना वाहनांचा वेग कमी असणे गरजेचे आहे, त्यासाठी बाजार समिती प्रवेशद्वाराजवळ गतिरोधक असावे, असे वाहनधारकांचे म्हणणे आहे. तसे न करता महामार्गावर गतिरोधक टाकून जनतेला वेठीस का धरत आहे, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.प्रशासनाकडून कारवाई नाहीमहामार्गावर गतिरोधक टाकण्यासाठी किमान १० विभागांची परवानही घ्यावी लागते. मात्र गतिरोधक टाकून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असला तरी वाहतूक पोलीस, प्रशासन काहीच कारवाई का करीत नाही, असा सवालही वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.जळगाव-औरंगाबाद महामार्गावर गतिरोधक टाकल्याने दररोज संध्याकाळी वाहनधारकांना वाहन कोंडीत अडकून ताटकळत रहावे लागत आहे. याची दखल घेणे गरजेचे आहे.- जतीन ओझा, उद्योजक.गतिरोधकामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर वाहनांचा वेग कमी झाल्याने व त्यात संध्याकाळी वाहनांची संख्या वाढून रांगा लागत असल्याने सर्वच जण त्रस्त झाले आहेत.- समीर साने, सचिव, लघु उद्योग भारती.सतत अपघात होत असल्याने जळगाव मार्केट यार्ड आडत असोसिएशनने बाजार समितीसमोर गतिरोधक टाकण्याची मागणी केली होती. त्यानुसार व्यापाºयांनी गतिरोधक टाकले.- लक्ष्मण पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती.गतिरोधक टाकण्यासाठी परवनागी घेणे गरजेचे आहे. असे असतानाही बाजार समितीसमोर गतिरोधक टाकताना परवानगी घेतलेली नाही.- देविदास कुनगर, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

टॅग्स :highwayमहामार्गJalgaonजळगाव