शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील गतिरोधकांमुळे उद्योजकांसह वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 12:52 IST

दररोज वाहतुकीची कोंडी

ठळक मुद्देवाढत्या अपघातामुळे गतिरोधक टाकल्याचे बाजार समितीचे म्हणणेउद्योग संघटनांचा विरोध

जळगाव : जळगाव-औरंगाबाद मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर टाकण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे या मार्गावर दररोज वाहतुकीची कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. यामुळे वाहनधारकांसह उद्योजक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक टाकण्यास बंदी असतानाही या ठिकाणी हे गतिरोधक टाकण्यात आले आहे. अपघात होत असल्याने व्यापाऱ्यांनी हे गतिरोधक टाकले असल्याचे बाजार समितीच्यावतीने सांगण्यात आले.जळगाव-औरंगाबाद मार्ग अत्यंत वर्दळीचा असून येथे अवजड वाहनांसह लहान-मोठी वाहने नेहमी ये-जा करीत असतात. त्यामुळे येथे पूर्वीपासूनच वाहनांची नेहमी गर्दी असते. असे असताना बाजार समितीसमोर गतिरोधक टाकल्याने वाहन कोंडीत अधिक भर पडली आहे.अपघातामुळे गतिरोधकाचा निर्णयया मार्गावर कृउबातील व्यापारी, आडते व इतर कर्मचारी नेहमी ये जा करीत असतात. या ठिकाणी वारंवार अपघात होऊन अनेकांना दुखापत होण्यासह काही जणांना जीवही गमवावा लागल्याचे सांगत या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी मार्केट यार्ड आडत असोसिएशनने कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लक्ष्मण पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर येथे हे गतिकरोधक टाकण्यात आले. दररोज संध्याकाळी वाहनांच्या रांगा बाजार समितीसमोर गतिरोधक टाकल्याने येथे दररोज वाहनांची मोठी कोंडी होत आहे. त्यात संध्याकाळी तर थेट ‘लोकमत’ कार्यालय ते अजिंठा चौफुली दरम्यान वाहनांच्या दुतर्फा रांगाच्या रांगा लागत आहे. यात बºयाच वेळा रुग्णवाहिकादेखील अडकल्याची माहिती उद्योजकांनी दिली. इतकेच नव्हे तर प्रसूत महिला, इतर रुग्णही ताटकळत आहेत, अशी वाहनधारकांची तक्रार आहे.उद्योग संघटनांचा विरोधऔद्योगिक वसाहत परिसरात ये-जा करणाºया उद्योजकांची संख्याही मोठी असून दररोज संध्याकाळी येताना ते या वाहन कोंडीत सापडत असल्याने या त्रासामुळे ते त्रस्त झाले आहेत. अर्धा ते एक तास वाहन कोंडीत अडकणे आता दररोजचे झाले असून या वर उपाययोजना करण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे. या संदर्भात विविध उद्योग संघटनांनी एकत्र येत या गतिरोधकाच्या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.महामार्गावर गतिरोधक टाकलेच कसे?राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक टाकता येत नाही. असे असले तरी जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ -एफ या महामार्गावर गतिरोधक टाकलेच कसे, असा संतप्त सवालही उद्योजक, वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.रस्ता खराब, वाहने भरधाव जाणार कशी?हा मार्ग मुळातच खराब झाल्याने जागोजागी असलेल्या खड्ड्यामुळे येथे वाहनांचा वेग कमीच असतो. त्यामुळे भरधाव वेगातील वाहनांमुळे अपघात होणे शक्य नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.जनतेला वेठीस का धरतात ?अपघात होत असल्याचे कारण सांगून गतिरोधक टाकले असले तरी बाजार समितीच्या आवारातून येताना वाहनांचा वेग कमी असणे गरजेचे आहे, त्यासाठी बाजार समिती प्रवेशद्वाराजवळ गतिरोधक असावे, असे वाहनधारकांचे म्हणणे आहे. तसे न करता महामार्गावर गतिरोधक टाकून जनतेला वेठीस का धरत आहे, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.प्रशासनाकडून कारवाई नाहीमहामार्गावर गतिरोधक टाकण्यासाठी किमान १० विभागांची परवानही घ्यावी लागते. मात्र गतिरोधक टाकून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असला तरी वाहतूक पोलीस, प्रशासन काहीच कारवाई का करीत नाही, असा सवालही वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.जळगाव-औरंगाबाद महामार्गावर गतिरोधक टाकल्याने दररोज संध्याकाळी वाहनधारकांना वाहन कोंडीत अडकून ताटकळत रहावे लागत आहे. याची दखल घेणे गरजेचे आहे.- जतीन ओझा, उद्योजक.गतिरोधकामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर वाहनांचा वेग कमी झाल्याने व त्यात संध्याकाळी वाहनांची संख्या वाढून रांगा लागत असल्याने सर्वच जण त्रस्त झाले आहेत.- समीर साने, सचिव, लघु उद्योग भारती.सतत अपघात होत असल्याने जळगाव मार्केट यार्ड आडत असोसिएशनने बाजार समितीसमोर गतिरोधक टाकण्याची मागणी केली होती. त्यानुसार व्यापाºयांनी गतिरोधक टाकले.- लक्ष्मण पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती.गतिरोधक टाकण्यासाठी परवनागी घेणे गरजेचे आहे. असे असतानाही बाजार समितीसमोर गतिरोधक टाकताना परवानगी घेतलेली नाही.- देविदास कुनगर, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

टॅग्स :highwayमहामार्गJalgaonजळगाव