शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 11:41 IST

प्राथमिक अंदाज : अहवाल सादर; जामनेर, चाळीसगाव, चोपड्यात सर्वाधिक फटका

जळगाव : जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे १४६८ गावांमधील ५ लाख ५ हजार ८७७ शेतकऱ्यांचे ५ लाख ९९ हजार ८३० हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकारी व शासनास सादर केला आहे. सर्वाधिक फटका जामनेर, चाळीसगाव व चोपडा तालुक्याला बसला आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षाही अधिक म्हणजेच सरासरीच्या १४० टक्के पाऊस झाला आहे. २१ ते २९आॅक्टोबर या कालावधीत तर संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.शासनाने याबाबत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र दिवाळीच्या सुट््यांमुळे त्यात अडचण निर्माण झाली होती.अखेर बुधवारपासून पंचनामे सुरू झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक अहवालही कृषी विभागाने सादर केला आहे.सर्वात कमी नुकसान रावेरमध्येतर सर्वात कमी नुकसान रावेर व बोदवड तालुक्यात झाले आहे. रावेर तालुक्यातील १२० गावांमधील १६ हजार ८३७ शेतकºयांचे १५ हजार ८२० हेक्टरचे नुकसान झाले आहे. तर बोदवड तालुक्यात ५२ गावांमधील १७ हजार ४५६ शेतकºयांचे १८ हजार ३७१ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

कोरडवाहूचे ४ लाख ६१ हजार हेक्टरचे नुकसान४जिल्ह्यातील कोरडवाहू पिकांचे ४ लाख ६१ हजार १५९ हेक्टरचे तर बागायतीचे १ लाख ३६ हजार ८०४ हेक्टरचे व बहुवार्षिक पिकांचे १८६७ हेक्टरचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये कोरडवाहू मध्ये खरीप ज्वारी ३८ हजार २८८ हेक्टर, कापूस ३ लाख १७ हजार ८९३ हेक्टर, मका ७७ हजार ३५६ हेक्टर, बाजरी ८ हजार ७६९ हेक्टर, सोयाबीन १७ हजार १०१ हेक्टर, तूर १११४ हेक्टर, तीळ ३ हेक्टर, भुईमूग ३०५ हेक्टर तर इतर पिके ३३० हेक्टर, बागायती पिकांपैकी चार पिके २३० हेक्टर, कापूस १ लाख २३ हजार ९८६ हेक्टर, ऊस ११७६ हेक्टर, भाजीपाला २२३३ हेक्टर, पपई २९९ हेक्टर, कांदा ३२८५ हेक्टर, केळी ५५९५ हेक्टर तर बहुवार्षिक पिके- १८६७ हेक्टरचा समावेश असल्याची माहिती मिळाली.जामनेर तालुक्यात सर्वाधिक नुकसानजिल्ह्यातील एकूण ५ लाख ९९ हजार ८३० हेक्टरवरील शेतीचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक ८५ हजार १६६ हेक्टरचे नुकसान जामनेर तालुक्यात झाले आहे. त्यापाठोपाठ चाळीसगाव तालुक्यात ७७ हजार ८२० हेक्टरचे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव