शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शासनाच्या दिरंगाईमुळे जि. प. वर नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 12:32 IST

बसला अर्थिक फटका

ठळक मुद्देकेवळ नुकसान आणि मनस्ताप
हितेंद्र काळुंखेजळगाव: शासनाचा कारभार असो की शासकीय कार्यालयांचा. हलगर्जीपणा आणि दिरंगाई यामुळे विविध कामे तसेच योजनांची अंमलबजावणी वेळेवर होवू शकत नाही. याचा फटका मात्र सर्व सामान्यांनाच बसत असतो. अशाच एका प्रकारात शेतकºयांना सुमारे २० वर्षापर्यंत त्यांच्या हक्काचे अर्थात संपादीत केलेल्या जमिनीच्या मोबदल्याचे पैसे न मिळणे म्हणजे हा तर कहरच झाला असे म्हणावे लागेल. ाारंवार पैशांची मागणी करुनही मोबदला न मिळाल्याने या शेतकºयांना कोर्टाच्या पायºया आता न्यायासाठी झिझवाव्या लगात आहे. पाझर तलावांसाठी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागामार्फत सुमारे १५ ते २० वर्षात जवळपास सव्वाशे शेतकºयांचे भूसंपादन करण्यात असून ४ कोटीचे हे देणे हे वेळेत न दिल्याने ही रक्कम व्जाजासह सुमारे १४ कोटीपर्यंत पोहचली आहे. हा मोबदला वेळवर न दिल्याने मोबदल्याच्या रकमेवर व्याज तर प्रचंड वाढलेच आहे परंतु जिल्हा परिषदेच्या खात्यातून परस्पर रक्कम वळती करण्याची नामुष्कीची वेळही यामुळे आली आहे. न्यायालयाने हा निर्णय दिल्याने जिल्हा बँकेने ही रक्कम खात्यातून काढल्यानंतर जिल्हा परिषद अधिकाºयांनी यास आक्षेप घेतला. दरम्यान ही कार्यवाही नियमानुसारच झाली असल्याचे शेतकºयांच्या वकीलांचे म्हणणे आहे. यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्हा परिषदेचे सीईओ व मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांच्या खात्यातून महिनाभरात दोन टप्प्यात ५ कोटी १२ लाख निधी वर्ग केला आहे.वास्तविक ही रक्कम देण्याची शासनाची जबाबदारी असताना जिल्हा परिषदेचे पैसे वळविले गेल्याने जिल्हा परिषदेलाच हा फटका आता बसला आहे. सुमारे १५ ते २० वर्षांपासून लढा देवूनही आता कोठे शेतकºयांना काही प्रमाणात मोबदला मिळू शकला. न्यायालयाने कडक भूमिका घेतल्याने हे शक्य झाले असले तरी ज्यांची मुख्य जबाबदारी आहे त्या शासनाला मात्र याचा काहीही फटका बसला नसून जिल्हा परिषदे मार्फत ही कामे झाल्याने जिल्हा परिषदेलाच हा आर्थिक फटका सध्या तरी सहन करावा लागत आहे. नुकसानच नुकसानशासनाने जर शेतकºयांचा मोबदला वेळेत दिला असता तर त्या मोबदल्यावरील व्याजाची रक्कम वाढली नसती. याचबरोबर जिल्हा परिषदेलाही नामुष्की सहन करावी लागली नसती. तसेच शेतकºयांनाही अनेक वर्षापासून नाहक मनस्तपाला सामोरे जावे लागले नसते. दिरंगाई कितीही झाली तरी पैसे देणे टळणार नाही, तर मग वेळेवरच हे काम का होत नाही? असाही महत्वाचा प्रश्न आहे.
टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव