शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या दिरंगाईमुळे जि. प. वर नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 12:32 IST

बसला अर्थिक फटका

ठळक मुद्देकेवळ नुकसान आणि मनस्ताप
हितेंद्र काळुंखेजळगाव: शासनाचा कारभार असो की शासकीय कार्यालयांचा. हलगर्जीपणा आणि दिरंगाई यामुळे विविध कामे तसेच योजनांची अंमलबजावणी वेळेवर होवू शकत नाही. याचा फटका मात्र सर्व सामान्यांनाच बसत असतो. अशाच एका प्रकारात शेतकºयांना सुमारे २० वर्षापर्यंत त्यांच्या हक्काचे अर्थात संपादीत केलेल्या जमिनीच्या मोबदल्याचे पैसे न मिळणे म्हणजे हा तर कहरच झाला असे म्हणावे लागेल. ाारंवार पैशांची मागणी करुनही मोबदला न मिळाल्याने या शेतकºयांना कोर्टाच्या पायºया आता न्यायासाठी झिझवाव्या लगात आहे. पाझर तलावांसाठी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागामार्फत सुमारे १५ ते २० वर्षात जवळपास सव्वाशे शेतकºयांचे भूसंपादन करण्यात असून ४ कोटीचे हे देणे हे वेळेत न दिल्याने ही रक्कम व्जाजासह सुमारे १४ कोटीपर्यंत पोहचली आहे. हा मोबदला वेळवर न दिल्याने मोबदल्याच्या रकमेवर व्याज तर प्रचंड वाढलेच आहे परंतु जिल्हा परिषदेच्या खात्यातून परस्पर रक्कम वळती करण्याची नामुष्कीची वेळही यामुळे आली आहे. न्यायालयाने हा निर्णय दिल्याने जिल्हा बँकेने ही रक्कम खात्यातून काढल्यानंतर जिल्हा परिषद अधिकाºयांनी यास आक्षेप घेतला. दरम्यान ही कार्यवाही नियमानुसारच झाली असल्याचे शेतकºयांच्या वकीलांचे म्हणणे आहे. यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्हा परिषदेचे सीईओ व मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांच्या खात्यातून महिनाभरात दोन टप्प्यात ५ कोटी १२ लाख निधी वर्ग केला आहे.वास्तविक ही रक्कम देण्याची शासनाची जबाबदारी असताना जिल्हा परिषदेचे पैसे वळविले गेल्याने जिल्हा परिषदेलाच हा फटका आता बसला आहे. सुमारे १५ ते २० वर्षांपासून लढा देवूनही आता कोठे शेतकºयांना काही प्रमाणात मोबदला मिळू शकला. न्यायालयाने कडक भूमिका घेतल्याने हे शक्य झाले असले तरी ज्यांची मुख्य जबाबदारी आहे त्या शासनाला मात्र याचा काहीही फटका बसला नसून जिल्हा परिषदे मार्फत ही कामे झाल्याने जिल्हा परिषदेलाच हा आर्थिक फटका सध्या तरी सहन करावा लागत आहे. नुकसानच नुकसानशासनाने जर शेतकºयांचा मोबदला वेळेत दिला असता तर त्या मोबदल्यावरील व्याजाची रक्कम वाढली नसती. याचबरोबर जिल्हा परिषदेलाही नामुष्की सहन करावी लागली नसती. तसेच शेतकºयांनाही अनेक वर्षापासून नाहक मनस्तपाला सामोरे जावे लागले नसते. दिरंगाई कितीही झाली तरी पैसे देणे टळणार नाही, तर मग वेळेवरच हे काम का होत नाही? असाही महत्वाचा प्रश्न आहे.
टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव