शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर तालुक्यावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 21:44 IST

जामनेर तालुक्यात कापुस, मका या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे.

ठळक मुद्देजामनेर तालुक्यात पाणी टंचाईचीही भितीजामनेर तालुक्यात कापूस, मका पिकाला फटकादुष्काळीस्थितीमुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले

जामनेर : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जामनेर तालुक्यात कापुस, मका या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या वर्षी बोंडअळीने शेतकºयांना आर्थिक फटका देत कंबरडे मोडले होते. त्यात यंदा दुष्काळीस्थितीमुळे शेतकºयांचे नियोजन कोलमडले आहे.हवामान विभागाकडून यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली होती. मात्र पेरणीनंतर दडी मारलेल्या पावसाने तब्बल महिन्यानंतर हजेरी लावली. काहींना दुबार पेरणी करावी लागली. नंतर आलेल्या पावसामुळे ८० टक्के पिके जगली. पावसाच्या लहरीपणामुळे यंदा मुग, उडीद, तुर याच्या उत्पन्नात घट आली. गरज असताना पाऊस न झाल्याने कापुस व मक्याच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला. परिणामी उत्पादन घटल्याने शेतकरी हतबल झाला आहे. परतीचा पाऊस तरी साथ देईल ही अपेक्षाही फोल ठरली. दोन वर्षांपूर्वी दुष्काळासोबत सामना करणाºया शेतकºयांना गेल्या वर्षी काही प्रमाणात हंगाम हाताशी आला होता.भारनियमनाने शेतकरी हैराणपावसाअभावी पिके करपत असतांना ज्यांच्या विहीरीत पाणी आहे असे शेतकरी पिके वाचविण्याची धडपड करीत होते. मात्र विज वितरण कंपनीने कृषी पंप धारकांसाठी केलेल्या सक्तीच्या भारनियमनामुळे तेही होवू शकले नाही. सक्तीचे भारनियमन बंद करावे या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.७५ टक्के प्रकल्प रिकामेचजामनेर तालुक्यात असलेल्या सिंचन प्रकल्प, पाझर तलाव, धरणांपैकी फक्त २५ टक्के प्रकल्पातच समाधानकारक पाणी साठा आहे. ७५ टक्के प्रकल्पात शुन्य पाणी साठा आहे. गेल्या वर्षी ४७२ मिमी (६५.४ टक्के) पाऊस झाला होता. यंदा ४६४.६० मिमी पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी ६४.६० टक्के आहे.प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठ्याची टक्केवारीशेवगा -९९, कांग - ७५, महुखेडा - ४४, चिलगांव - ३७, माळपिंप्री - २८, तोंडापुर - २० तर अन्य प्रकल्पात शून्य टक्के साठा आहे.संभाव्य पाणी टंचाईचे नियोजन व्हावेग्रामीण भागात यंदा पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासुनच उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. पंचायत समिती स्तरावर टंचाई कृती आराखडा तयार केला जात आहे. पाटबंधारे विभागाने अवैधपणे होत असलेल्या पाणी उपशावर प्रतिबंध घालणे गरजेचे आहे.

टॅग्स :Jamnerजामनेरdroughtदुष्काळ