शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

जामनेर तालुक्यावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 21:44 IST

जामनेर तालुक्यात कापुस, मका या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे.

ठळक मुद्देजामनेर तालुक्यात पाणी टंचाईचीही भितीजामनेर तालुक्यात कापूस, मका पिकाला फटकादुष्काळीस्थितीमुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले

जामनेर : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जामनेर तालुक्यात कापुस, मका या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या वर्षी बोंडअळीने शेतकºयांना आर्थिक फटका देत कंबरडे मोडले होते. त्यात यंदा दुष्काळीस्थितीमुळे शेतकºयांचे नियोजन कोलमडले आहे.हवामान विभागाकडून यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली होती. मात्र पेरणीनंतर दडी मारलेल्या पावसाने तब्बल महिन्यानंतर हजेरी लावली. काहींना दुबार पेरणी करावी लागली. नंतर आलेल्या पावसामुळे ८० टक्के पिके जगली. पावसाच्या लहरीपणामुळे यंदा मुग, उडीद, तुर याच्या उत्पन्नात घट आली. गरज असताना पाऊस न झाल्याने कापुस व मक्याच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला. परिणामी उत्पादन घटल्याने शेतकरी हतबल झाला आहे. परतीचा पाऊस तरी साथ देईल ही अपेक्षाही फोल ठरली. दोन वर्षांपूर्वी दुष्काळासोबत सामना करणाºया शेतकºयांना गेल्या वर्षी काही प्रमाणात हंगाम हाताशी आला होता.भारनियमनाने शेतकरी हैराणपावसाअभावी पिके करपत असतांना ज्यांच्या विहीरीत पाणी आहे असे शेतकरी पिके वाचविण्याची धडपड करीत होते. मात्र विज वितरण कंपनीने कृषी पंप धारकांसाठी केलेल्या सक्तीच्या भारनियमनामुळे तेही होवू शकले नाही. सक्तीचे भारनियमन बंद करावे या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.७५ टक्के प्रकल्प रिकामेचजामनेर तालुक्यात असलेल्या सिंचन प्रकल्प, पाझर तलाव, धरणांपैकी फक्त २५ टक्के प्रकल्पातच समाधानकारक पाणी साठा आहे. ७५ टक्के प्रकल्पात शुन्य पाणी साठा आहे. गेल्या वर्षी ४७२ मिमी (६५.४ टक्के) पाऊस झाला होता. यंदा ४६४.६० मिमी पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी ६४.६० टक्के आहे.प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठ्याची टक्केवारीशेवगा -९९, कांग - ७५, महुखेडा - ४४, चिलगांव - ३७, माळपिंप्री - २८, तोंडापुर - २० तर अन्य प्रकल्पात शून्य टक्के साठा आहे.संभाव्य पाणी टंचाईचे नियोजन व्हावेग्रामीण भागात यंदा पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासुनच उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. पंचायत समिती स्तरावर टंचाई कृती आराखडा तयार केला जात आहे. पाटबंधारे विभागाने अवैधपणे होत असलेल्या पाणी उपशावर प्रतिबंध घालणे गरजेचे आहे.

टॅग्स :Jamnerजामनेरdroughtदुष्काळ