शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे ग्रमव्यवस्था कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:57 IST

ग्रामसेवक आंदोलनाचा परिणाम : मुख्याध्यापक करणार वित्त आयोगाची कामे

भुसावळ : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक हे गेल्या महिनाभरापासून संपावर गेले असल्यामुळे गावाचा विकास थांबला आहे. एकंदरीत ग्रामव्यवस्थ्वर या आंदोलनाचा परिणाम दिसून येत आहे.तालुक्यातील ग्र्रामपंचायतींची वसुली थांबल्यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. ग्रामसेवकांचा संप संपत नसल्यामुळे ग्रामपंचायतींचा व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना तात्पुरता कार्यभार सांभाळण्याचे आदेश पंचायत समितीने दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक खडू , फळा व विद्यार्थ्यांचे माध्यान्न भोजन सोडून आता १४व्या वित्त आयोगातील गटारी व रस्त्यांची कामे करवून घेणार आहेत. त्याचप्रमाणे गावातील कर वसुली करून अर्थव्यवस्था सांभाळणार आहेत. ग्रामसेवकांची कामे मुख्याध्यापकांकडे दिल्यामुळे नागरिक चकीत झाले आहेत. याचा परिणाम शाळेवर होणार नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे मुख्याध्यापकांनी शाळाबाह्य कामे करून नयेत व या कामावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन कर्मचारी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत तायडे यांनी केले आहे.९ आॅगस्टपासून ग्रामसेवक विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन पुकारल्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा फटका ग्रामपातळीवर बसला आहे. या आंदोलनाचा विशेष परिणाम गावातील पाणीपुरवठा, आरोग्य, विकास कामे, ग्रामपंचायतींची करवसुली, कर्मचाऱ्यांचे पगार या कामकाजावर झाले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक हा शासनाच्या वतीने प्रमुख समजला जातो. त्यामुळे ग्रामसेवक नाही तर इतर कर्मचारी काय काम करत असतील? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाने ग्रामपंचायतींचे तात्पुरते कामकाज पाहण्यासाठी मुख्याध्यापकांना आदेश दिले. त्यामुळे आता ग्रामसेवकांचे कामकाज मुख्याध्यापक सांभाळणार का? जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गावात वसुली करणार काय? चौदाव्या वित्त आयोगातील गटारी व रस्त्यांची कामे ठेकेदारांकडून करून घेणार काय? सरपंच व मुख्याध्यापकामध्ये समन्वय जुळणार काय?, टक्केवारीचे कसे करणार? आधीच शिक्षक अतिरिक्त कामांमुळे त्रस्त आहेत त्यात आता या जबाबदारीमुळे गाव सांभाळून शाळा सांभाळण्याचे आव्हान स्वीकारणार काय? असे विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत...