शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

अमळनेर तालुक्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तापीचे वाहून जाणारे पाणी नदी-नाल्यात टाकावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 11:58 IST

नव्या संकल्पनेसाठी तालुक्यात जनजागृती सुरू

ठळक मुद्देपाणी टंचाई कायमस्वरुपी दूर होण्यास मदत होणार

चुडामण बोरसे / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २४ - अमळनेर तालुक्यातील पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी तापी नदीवरुन वाहून जाणारे पावसाचे पाणी प्रत्येक नाल्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये उपसा सिंचनाद्वारे टाकून सर्व नदी- नाले पावसाच्या पाण्याने रिचार्ज करावेत, अशी संकल्पना पुढे येत आहे. यासाठी गडखांब ता. अमळनेर येथील जय किसान शेतकरी मंडळाचे अध्यक्ष रमेश व्यंकट पाटील यांनी जनजागृती सुरु केली आहे़हा नवा प्रकल्प झाल्यास तालुक्यात दरवर्षी येणाºया दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे एवढेच नाही तर तालुक्याचा पिण्याचा व शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे. अमळनेर हा कायमस्वरुपी अवर्षण प्रवण आणि पर्जन्यछायेत असणारा तालुका आहे. गेल्या वर्षी पावसाळा अत्यल्प झालेला आहे. अमळनेर तालुक्याला नेहमीच दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. तापी नदी अमळनेर तालुक्यातून वाहत असली तरी ती फक्त जुलै ते जानेवारी या दरम्यान वाहत असते.काय आहे योजनातालुक्याचा दुष्काळ आणि पाणी प्रश्न कायम सोडविण्यासाठी तापी नदीवरुन निम्न बंधाºयातून नियोजित उपसा सिंचन योजना तयार करण्यात याव्यात, तापी नदीचे पाणी तालुक्यातील प्रत्येक नाल्याच्या सुरुवातीला पुनर्भरणासाठी टाकले तर तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटू शकेल. अमळनेर तालुक्यातील तापी नदी ते सूरत रेल्वे मार्ग एवढे ४० टक्के क्षेत्र मंजूर व अस्तित्वात असलेल्या उपसा सिंचन योजनांमध्ये समावेश केल्यास हे सर्व शक्य असल्याची माहिती पाटील यांनी दिली़या शिवारातील नदी नाल्यावर तापी नदीवरुन उपसा सिंचनाद्वारे जुलै ते जानेवारी महिन्यापर्यंत सात महिने पावसाचे पाणी टाकल्यास पाणी टंचाई कायमस्वरुपी दूर होण्यास मदत होणार आहे.राज्यात उपसा सिंचन योजनांना सध्या भरमसाठ वीजबिलांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. चांगल्या योजनांना यामुळे खीळ बसत आहे. तसे होऊ नये, म्हणून सौर उर्जा व वीज अशा हायब्रीङ पद्धतीने वीज बिलाची समस्या सोडविता येईल. या विषयावर ग्रामसभा घेऊन लोकांना याचे महत्व पटावे, यासाठी लोकचळवळ उभी करण्याचा मानस आहे.- रमेश पाटील, अध्यक्ष, जयकिसान शेतकरी मंडळ, गडखांब, अमळनेर.

टॅग्स :AmalnerअमळनेरWaterपाणी