शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर तालुक्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तापीचे वाहून जाणारे पाणी नदी-नाल्यात टाकावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 11:58 IST

नव्या संकल्पनेसाठी तालुक्यात जनजागृती सुरू

ठळक मुद्देपाणी टंचाई कायमस्वरुपी दूर होण्यास मदत होणार

चुडामण बोरसे / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २४ - अमळनेर तालुक्यातील पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी तापी नदीवरुन वाहून जाणारे पावसाचे पाणी प्रत्येक नाल्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये उपसा सिंचनाद्वारे टाकून सर्व नदी- नाले पावसाच्या पाण्याने रिचार्ज करावेत, अशी संकल्पना पुढे येत आहे. यासाठी गडखांब ता. अमळनेर येथील जय किसान शेतकरी मंडळाचे अध्यक्ष रमेश व्यंकट पाटील यांनी जनजागृती सुरु केली आहे़हा नवा प्रकल्प झाल्यास तालुक्यात दरवर्षी येणाºया दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे एवढेच नाही तर तालुक्याचा पिण्याचा व शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे. अमळनेर हा कायमस्वरुपी अवर्षण प्रवण आणि पर्जन्यछायेत असणारा तालुका आहे. गेल्या वर्षी पावसाळा अत्यल्प झालेला आहे. अमळनेर तालुक्याला नेहमीच दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. तापी नदी अमळनेर तालुक्यातून वाहत असली तरी ती फक्त जुलै ते जानेवारी या दरम्यान वाहत असते.काय आहे योजनातालुक्याचा दुष्काळ आणि पाणी प्रश्न कायम सोडविण्यासाठी तापी नदीवरुन निम्न बंधाºयातून नियोजित उपसा सिंचन योजना तयार करण्यात याव्यात, तापी नदीचे पाणी तालुक्यातील प्रत्येक नाल्याच्या सुरुवातीला पुनर्भरणासाठी टाकले तर तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटू शकेल. अमळनेर तालुक्यातील तापी नदी ते सूरत रेल्वे मार्ग एवढे ४० टक्के क्षेत्र मंजूर व अस्तित्वात असलेल्या उपसा सिंचन योजनांमध्ये समावेश केल्यास हे सर्व शक्य असल्याची माहिती पाटील यांनी दिली़या शिवारातील नदी नाल्यावर तापी नदीवरुन उपसा सिंचनाद्वारे जुलै ते जानेवारी महिन्यापर्यंत सात महिने पावसाचे पाणी टाकल्यास पाणी टंचाई कायमस्वरुपी दूर होण्यास मदत होणार आहे.राज्यात उपसा सिंचन योजनांना सध्या भरमसाठ वीजबिलांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. चांगल्या योजनांना यामुळे खीळ बसत आहे. तसे होऊ नये, म्हणून सौर उर्जा व वीज अशा हायब्रीङ पद्धतीने वीज बिलाची समस्या सोडविता येईल. या विषयावर ग्रामसभा घेऊन लोकांना याचे महत्व पटावे, यासाठी लोकचळवळ उभी करण्याचा मानस आहे.- रमेश पाटील, अध्यक्ष, जयकिसान शेतकरी मंडळ, गडखांब, अमळनेर.

टॅग्स :AmalnerअमळनेरWaterपाणी