शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

डॉ. पायल तडवीच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याच्या मागणीसाठी जळगावात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 12:03 IST

राज्यभरातून आदिवासी बांधव सहभागी

जळगाव : डॉ. पायल तडवी यांची आत्महत्या नसून, हत्या झाली आहे. जाती व्यवस्थेने तिचा बळी घेतला असून, त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या. अशी मागणी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेतर्फे बुधवारी काढण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाआक्रोश मोर्चाद्वारे करण्यात आली. मोर्चासाठी राज्यभरातुन आलेल्या आदिवासी तडवी समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करुन, प्रशासनाचे लक्ष वेधले.गेल्या आठवड्यात जळगावातील रहिवासी व मुंबई येथे नायर हॉस्पीटलमध्ये पुढील उच्च शिक्षण घेणाºया डॉ. पायल तडवी यांनी वरिष्ठांच्या मानसिक छळाला कंटाळून मुंबई येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेप्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून,सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेप्रकरणी जळगावतही राष्ट्रीय एकता परिषदेतर्फे बुधवारी दुपारी १२ वाजता राज्यस्तरीय आदिवासी महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.हा मोर्चा बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम व यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.मोर्चामध्ये डॉ. पायल तडवी यांच्या आई आबेदा तडवी, पती सलमान तडवी व भाऊ रितेश तडवी सहभागी झाले होते.शिवतीर्थ मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चासाठी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नांदेड, औरगांबाद यासह राज्याच्या विविध भागातून महिला व पुरुषांसह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव एकत्र आले होते.न्याय द्या.. न्याय द्या.. डॉ. पायलच्या मारेकºयांना फाशी द्याराष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेसह इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन, भारतीय विद्यार्थी मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ व विविध ठिकाणाहून आलेल्या समाजबांधवांनी महाआक्रोश मोर्चातून डॉ. पायल यांना न्याय मिळण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा समन्वयक सुनिल देहरे व जिल्हाध्यक्ष सुनिल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ मैदानापासून महाआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली.यावेळी महिला व पुरुषांनी हातामध्ये विविध मागण्यांचे फलक घेऊन, डॉ. पायल तडवी यांना न्याय मिळालाच पाहिजे, त्यांच्या मारेकºयांना फाशीची शिक्षा द्या, तिन्ही महिला आरोपी डॉक्टरांवर अ‍ॅट्रासिटी कायद्या अंतर्गंत कारवाई करा, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा यासह इतर मागण्या संदर्भात जोरदार घोषणाबाजी केली.महिला व पुरुषांसह १० ते १५ हजार समाज बांधव महाआक्रोश मोर्चात सहभागी झाले होते.पोलिसांचा चोख बंदोबस्तया महाआक्रोश मोर्चासाठी राज्यभरातुन आलेल्या आदिवासी समाज बांधवांनी शिवतीर्थ मैदानावर सकाळी दहापासूनच गर्दी केली होती.डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सर्वत्र संतापाची लाट उमटली असतांना, कुठलाही गैरप्रकार उद्भवू नये, यासाठी शिवतीर्थ मैदानावर व मोर्चाच्या मार्गावर चोख महिला व पुरुषांचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.जाती व्यवस्थेतून डॉ. पायल यांची हत्याशिवतीर्थ मैदानापासून निघालेल्या महाआक्रोश मोर्चाचे रुपांतर सागर पार्कवर सभेच्या रुपामध्ये झाले. या ठिकाणी बोलतांना बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी सांगितले की, डॉ. पायल तडवी यांची आत्महत्या नसून, त्यांची हत्या झाली आहे. त्या तिन्ही डॉक्टरांनी डॉ. पायल यांना जाती व्यवस्थेतून त्रास दिला. त्यांचा छळ केला. त्यामुळे जाती व्यवस्थेतूनच त्यांची हत्या झाली असल्याचे सांगितले. तसेच बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून डॉ. पायल यांना न्याय मिळण्यासाठी न्यायालयींन लढा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय संयोजक प्रेमकुमार गेडाम यांनी भारताला स्वातंत्र्य मिळून, ७० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, तरीदेखील आजही जाती व्यवस्थेचा तिढा सुटला नसल्याचे सांगितले. तर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हजरत मौलाना अजहरी यांनीदेखील या घटनेबद्दल तीव्र निषेध नोंदवून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. या महाआक्रोश मोर्चाला विविध प्रकारच्या ५० हून अधिक सामाजिक संघटना व सर्व समाजबांधवांनी पाठिंबा दिला होता.

टॅग्स :Jalgaonजळगाव