शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. पायल तडवीच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याच्या मागणीसाठी जळगावात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 12:03 IST

राज्यभरातून आदिवासी बांधव सहभागी

जळगाव : डॉ. पायल तडवी यांची आत्महत्या नसून, हत्या झाली आहे. जाती व्यवस्थेने तिचा बळी घेतला असून, त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या. अशी मागणी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेतर्फे बुधवारी काढण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाआक्रोश मोर्चाद्वारे करण्यात आली. मोर्चासाठी राज्यभरातुन आलेल्या आदिवासी तडवी समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करुन, प्रशासनाचे लक्ष वेधले.गेल्या आठवड्यात जळगावातील रहिवासी व मुंबई येथे नायर हॉस्पीटलमध्ये पुढील उच्च शिक्षण घेणाºया डॉ. पायल तडवी यांनी वरिष्ठांच्या मानसिक छळाला कंटाळून मुंबई येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेप्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून,सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेप्रकरणी जळगावतही राष्ट्रीय एकता परिषदेतर्फे बुधवारी दुपारी १२ वाजता राज्यस्तरीय आदिवासी महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.हा मोर्चा बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम व यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.मोर्चामध्ये डॉ. पायल तडवी यांच्या आई आबेदा तडवी, पती सलमान तडवी व भाऊ रितेश तडवी सहभागी झाले होते.शिवतीर्थ मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चासाठी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नांदेड, औरगांबाद यासह राज्याच्या विविध भागातून महिला व पुरुषांसह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव एकत्र आले होते.न्याय द्या.. न्याय द्या.. डॉ. पायलच्या मारेकºयांना फाशी द्याराष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेसह इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन, भारतीय विद्यार्थी मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ व विविध ठिकाणाहून आलेल्या समाजबांधवांनी महाआक्रोश मोर्चातून डॉ. पायल यांना न्याय मिळण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा समन्वयक सुनिल देहरे व जिल्हाध्यक्ष सुनिल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ मैदानापासून महाआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली.यावेळी महिला व पुरुषांनी हातामध्ये विविध मागण्यांचे फलक घेऊन, डॉ. पायल तडवी यांना न्याय मिळालाच पाहिजे, त्यांच्या मारेकºयांना फाशीची शिक्षा द्या, तिन्ही महिला आरोपी डॉक्टरांवर अ‍ॅट्रासिटी कायद्या अंतर्गंत कारवाई करा, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा यासह इतर मागण्या संदर्भात जोरदार घोषणाबाजी केली.महिला व पुरुषांसह १० ते १५ हजार समाज बांधव महाआक्रोश मोर्चात सहभागी झाले होते.पोलिसांचा चोख बंदोबस्तया महाआक्रोश मोर्चासाठी राज्यभरातुन आलेल्या आदिवासी समाज बांधवांनी शिवतीर्थ मैदानावर सकाळी दहापासूनच गर्दी केली होती.डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सर्वत्र संतापाची लाट उमटली असतांना, कुठलाही गैरप्रकार उद्भवू नये, यासाठी शिवतीर्थ मैदानावर व मोर्चाच्या मार्गावर चोख महिला व पुरुषांचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.जाती व्यवस्थेतून डॉ. पायल यांची हत्याशिवतीर्थ मैदानापासून निघालेल्या महाआक्रोश मोर्चाचे रुपांतर सागर पार्कवर सभेच्या रुपामध्ये झाले. या ठिकाणी बोलतांना बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी सांगितले की, डॉ. पायल तडवी यांची आत्महत्या नसून, त्यांची हत्या झाली आहे. त्या तिन्ही डॉक्टरांनी डॉ. पायल यांना जाती व्यवस्थेतून त्रास दिला. त्यांचा छळ केला. त्यामुळे जाती व्यवस्थेतूनच त्यांची हत्या झाली असल्याचे सांगितले. तसेच बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून डॉ. पायल यांना न्याय मिळण्यासाठी न्यायालयींन लढा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय संयोजक प्रेमकुमार गेडाम यांनी भारताला स्वातंत्र्य मिळून, ७० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, तरीदेखील आजही जाती व्यवस्थेचा तिढा सुटला नसल्याचे सांगितले. तर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हजरत मौलाना अजहरी यांनीदेखील या घटनेबद्दल तीव्र निषेध नोंदवून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. या महाआक्रोश मोर्चाला विविध प्रकारच्या ५० हून अधिक सामाजिक संघटना व सर्व समाजबांधवांनी पाठिंबा दिला होता.

टॅग्स :Jalgaonजळगाव