शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 15:34 IST

दान हे एक धर्मांचे प्रभावी अंग आहे. सत्प्रवृत्तीचा गृहस्थाश्रमी आपल्या कष्टाच्या कमाईतून काही तरी सत्कारणी लागावे म्हणून सारखा तळमळतो व आपल्या विचारांप्रमाणे यथाशक्ती दान करून माझी कष्टाची कमाई सार्थक झाली.

दातव्यमिती यद्यानं दीपते नुपकारणेदेश कालेच पात्रे तद्यानं सात्विकं स्मृतम ।। गीता अ. १७, श्लोक-२०.दान हे एक धर्मांचे प्रभावी अंग आहे. सत्प्रवृत्तीचा गृहस्थाश्रमी आपल्या कष्टाच्या कमाईतून काही तरी सत्कारणी लागावे म्हणून सारखा तळमळतो व आपल्या विचारांप्रमाणे यथाशक्ती दान करून माझी कष्टाची कमाई सार्थक झाली. काही तरी सत्कारणी लागली. याने माझ्या आत्म्याचे काही तरी हीत होईल म्हणून समाधान मानतो. कधी काळी यज्ञ, भांडारे, नगर भोजन, ब्राह्म भोज व लग्न मुंजी बंघनादि कार्यात हजारो लोकांच्या पक्ती उठत असत. मठ मंदिर आदी धार्मिक संस्थांना धन, धान्य, शेती दिली जाई. आजकाल भूदान, श्रमदान, संपत्ती दान आदी सारखे दान पुढे येत आहेत. पण या सर्वांच्या बुडाशी आपल्या अंतकरणात रुतलेले धार्मिक संस्कारच होय. दानाच्या सहाय्याने मोठमोठाले महत्त्वाचे राष्ट्रकार्य,धर्म कार्य चालू आहेत. दानाने चांगले कार्य ही केले व करीत आहे व दानाने वाईट कार्य ही केले व अजून ही करीत आहे, जसे या दानाने आळशी, ऐतखाऊ, ठग, राष्ट्रदोषी, धर्मद्रोही, निर्माण केले हे पण नाकारता येणार नाही. ज्याप्रमाणे पाणी ज्या भांड्यात टाकतो त्याला तसा आकार येतो. त्याप्रमाणे कार्यकर्ते जसे असतील तसे कार्याला वळण मिळते. त्याचप्रमाणे दान घेणारे व देणारे तसे दानाला स्वरुप प्राप्त होते. म्हणून दान देणारा जाणता असून श्रद्धाळू पाहिजे. निव्वळ धर्मभोळेपणा हानिकारक आहे.कर्तव्य बुद्धीने कार्याचे महत्त्व ओळखून देणे हे दान होय. त्याला पण तीन अटी आहेत. भगवान श्रीकृष्ण महाराज गीतेच्या १७ व्या अध्यायात सांगतात. १) देश २) काळ आणि ३) पात्र हे पाहून दान करावे. नाही तर केलेले दान व्यर्थ तर होतेच पण नानाविध समाज विघातक दोष उत्पन्न करते.-लेखक-कै.महंत आराध्य मुरलीधर शास्त्री,संकलन- वैशाली आराध्य,भुसावळ.