शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

धरणगावला ‘कुणी पाणी देतं का पाणी’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST

काही दिवसांपूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील एका उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना काळे झेंडे दाखवून पाणी प्रश्नावर नाराजी व्यक्त ...

काही दिवसांपूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील एका उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना काळे झेंडे दाखवून पाणी प्रश्नावर नाराजी व्यक्त केली. यानंतर भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. यावर आक्रमक झालेल्या भाजपने पाणी मागणे गुन्हा आहे का..?, असा सवाल उपस्थित केला तर त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेने भाजपवर विकास कामांना विरोध करत असल्याचा आरोप केलाय. परंतु या आरोप-प्रत्यारोपात पाणी प्रश्न सोडवायला कुणालाही वेळ नाही, अशी परिस्थिती आहे.

या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक जवळ येत असून या विषयावर राजकीय पक्ष आक्रमक होत असल्याचे लक्षात येते. मात्र या विषयात स्थानिक नागरिकांची पाण्यावाचून कोंडी होत आहे.

धरणगाव शहरात विकास कामे जोरात सुरू आहेत हे मात्र तेवढेच खरे. मात्र पाणी प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा आहे.

दुसरीकडे अनलॉक झाल्यानंतर धरणगाव शहरात प्रचंड प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. नागरिक गावात विनामास्क फिरताना दिसून येत आहेत. तर सततच्या कारवाईमुळे नागरिकांसह पोलीस अधिकारी यांना पोलीस खात्यातील कर्मचारी देखील कंटाळले आहेत. दुसरीकडे मात्र, गावातील चोऱ्यांचे सत्र मात्र सुरूच आहे. मागील काही दिवसात घरफोडी झालेल्या आहेत. चोरांचा तपास लावण्यात पोलीस प्रशासन मात्र अपयशी ठरलेले दिसून येत आहे. शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दोन महिने उलटल्यानंतर भरड धान्य खरेदी केंद्र सुरू होणार आहे. यात शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले धान्य मोजक्या किमतीत देण्यात येणार असून शेतकरी वर्ग देखील चिंतेत दिसून येत आहे.