शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘वाचवाऽ वाचवाऽऽ’ टाहो फोडूनही डाॅक्टरनी दाखल केले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 23:07 IST

मला वाचवा, मला वाचवा-मला श्वास घ्यायला त्रास होत आहे,’ अशी गयावया चोपडा येथील एक रुग्ण पोटचा मुलगा आणि सुनेसमोर करीत होता. पण...

ठळक मुद्दे कोविडच्या रुग्णाची नातेवाईकांसह चार तास फिरस्तीजळगाव शहरातील डॉक्टरांकडून बाहेरची वाट

लोकमत न्यूज नेटवर्क

चोपडा : ‘अहो, मला कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करा. मला वाचवा, मला वाचवा-मला श्वास घ्यायला त्रास होत आहे,’ अशी गयावया चोपडा येथील एक रुग्ण पोटचा मुलगा आणि सुनेसमोर करीत होता. मुलगा आणि सून जळगाव शहरातील सर्व हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी चार तास वाहनातून फिरत असताना एकही डॉक्टरांनी रुग्णास दाखल केले नाही. अक्षरशः राजकीय स्त्रोत वापरूनही मंत्री, आमदार, खासदार यांनी भ्रमणध्वनीवर डॉक्टरांना संपर्क करूनही रुग्णास दाखल केले नाही. त्यामुळे कोरोनाबरोबरच माणुसकीहीनता किती वाढली आहे, याचेच प्रत्यंतर आले आहे.

चोपडा येथील जयप्रकाश माधवराव पाटील (६५) या रुग्णास दाखल करण्यासाठी त्यांच्या मुलास आलेल्या अनुभवाची व्यथा मांडताना त्यांना गहिवरून आले.

रुग्ण जयप्रकाश पाटील यांचे व्याही व चोपडा पंचायत समितीचे सदस्य, पंकज विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील यांनी डोळ्यात आसवं आणून सांगितले की, आमच्यासारख्या राजकीय व्यक्तींची अशी गत आणि अवस्था असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? आणि केवळ मंत्री, आमदार, खासदार यांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना फोन करूनही केवळ आपल्याला शासकीय दरानुसार बिल घ्यावे लागेल. या भीतीपोटी गयावया करणाऱ्या रुग्णाससुद्धा जळगाव शहरांमधील जवळपास पन्नास हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दाखल करून घेण्यास नकार दिला. रुग्ण जेव्हा मला वाचवा, मला वाचवा अशा गयावया करीत होता, त्या वेळेस मन गहिवरून येत होते. परंतु इतकी बिकट आणि वाईट परिस्थिती जर रुग्णास दाखल करून घेण्याच्याबाबतीत असेल तर राजकारण कशासाठी आणि कोणासाठी करायचे? असा प्रश्नही त्यांनी निर्माण केलेला आहे.

रुग्णाच्या बाबतीत माहिती देताना एम. व्ही. पाटील म्हणाले की, चोपडा येथील चैतन्य हॉस्पिटलमध्ये व्याही व रुग्ण जयप्रकाश माधवराव पाटील यांनी सहा दिवस उपचार घेऊन तब्येत ठीक झाल्यानंतर घरी गेले होते. घरी गेल्यानंतर दोन-तीन दिवसानंतर त्यांना पुन्हा श्वासाचा त्रास व्हायला लागला. म्हणून चैतन्य हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जळगाव येथे नेण्याचा सल्ला दिला. जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक दिवस दाखल करण्यात आले. त्यानंतर रुग्ण नॉन कोविड असल्यामुळे तेथून बाहेर काढण्यात आले आणि खासगी हॉस्पिटलमध्ये पुन्हा चार ते पाच दिवस दाखल ठेवण्यात आले. त्यानंतर या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणी मात्र पॉझिटिव्ह आल्याने या हॉस्पिटलमधूनही नंतर बाहेर काढून कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करा, असे सांगण्यात आले.

पुन्हा तेथून रुग्णाला सोमवारी ॲम्बुलन्समध्ये टाकले. तेथून सहयोग हॉस्पिटलमध्ये ठेवले. सहयोग हॉस्पिटलच्या डॉक्टरांनीही आमचे हॉस्पिटल ही कोविड हॉस्पिटल नसल्याने तुम्ही रुग्णास कोविड हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, असा सल्ला दिला. त्यानंतर पुन्हा रुग्णाला रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले आणि जवळपास जळगाव शहरामध्ये सर्व पन्नास हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या गयावया करून रुग्णास चार तास फिरूनही एकाही डॉक्टरने रुग्णास दाखल करून घेण्यास संमती दर्शवली नाही. बोलताना त्याचे कारण जाणवले की राजकीय लोकांचा रुग्ण असल्यामुळे आपल्याला पाहिजे तसे बिल मिळणार नाही, म्हणून रुग्णास दाखल करून घेण्यासाठी डॉक्टरांनी नकार दिला.

रुग्णाचा ऑक्सिजनचा स्तर हा ६०पर्यंत खाली आलेला होता आणि घरी परत घेऊन जाताना वाटेवर असलेल्या एका जळगाव शहरातीलच एका हॉस्पिटलमध्ये या रुग्णास जे होईल, ते होईल, या भरोशावर दाखल करण्यात आले आहे. म्हणजेच खऱ्या अर्थाने डॉक्टर सेवाभाव जोपासतात का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालेला आहे.

सगळेच मार्ग संपले अन् हिंमत सोडली..

या चार तासाच्या कालावधीमध्ये रुग्ण मात्र पोटच्या मुलाकडे ‘मला वाचवा रे, मला वाचवा रे, मला ॲडमिट करा’, अशी गयावया करीत असताना पोरगा, सून आणि व्याही यांचे मन गहिवरून आले. आपणही काही करू शकत नसल्याने व सर्व व्हीआयपी सोर्सेस वापरून झाल्याने काहीही उपयोग होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी यांनी कोविड रुग्णांच्या संदर्भात तयार केलेल्या पथकाकडे गयावया केली. पथकाकडूनही एकाही हॉस्पिटलमध्ये एकही बेड शिल्लक नसल्याचे सांगितल्याने हिंमत सोडली.

राजकारण कशासाठी? आणि जीवन जगावे तरी कशासाठी?

मंत्री, खासदार आणि आमदार यांचे भ्रमणध्वनी करूनही आणि स्वतः राजकारणात सक्रिय असल्यानंतर जर रुग्णास दाखल करून घेतले जात नसेल तर राजकारण कशासाठी करावे आणि जीवनही कशासाठी जगावे? असा सवाल पंचायत समितीचे सदस्य व माजी उपसभापती एम. व्ही. पाटील यांनी असा हताश होऊन केला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडाcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर