शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

नागरिकांनी साथ दिल्यास जिल्हा कोरानामुक्तच राहील - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 23:40 IST

‘लोकमत’च्या मुलाखतीत उपाययोजनांची माहिती, परिस्थिती नियंत्रणात

जळगाव : जिल्हाभरात दोन पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेले होते़ अशा स्थितीत आरोग्य यंत्रणेने पूर्ण दक्षता घेऊन त्यांचे कॉण्टॅक्ट ट्रेसिंग करून परिस्थिती नियंत्रणात आणली़ पहिल्या रुग्णाचाही अहवालही निगेटीव्ह आल्याने सद्यस्थितीत जिल्हा कोरोनामुक्त म्हणू शकतो, मात्र, यात लॉकडाउनचे पालन होणे अत्यंत गरजेचे आहे़ शासकीय रुग्णालयात सध्या पूर्ण कॉर्पोरेट रुग्णालयासारख्या सुविधा आहे़़, स्थानिक पातळ्यांवर कोव्हीड केअर सेंटरचे नियोजन आहे, त्यामुळे नागरिकांनी साथ दिल्यास जिल्हा आगामी काळात कोरोनामुक्तच राहील, असा विश्वास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांनी व्यक्त केला आहे़ त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत विविध उपाययोजनांची माहिती दिली़प्रश्न : सद्यस्थितीत परिस्थिती कशी व आपल्याकडे उपाययोजना कशा?उत्तर : पहिल्या पॉझिटीव्ह रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह आला असल्याने शिवाय तो राहत असलेल्या परिसरातही कोणालाही लक्षणे नाहीत, त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही, असे म्हणता येईल़ आपल्या जिल्ह्यात २५२ लोक परदेशातून आलेले होते़ त्यांचा चौदा दिवसांचा क्वॉरंटाईन कालावधी संपलेला आहे़ यासह ५० हजारांपर्यंत विविध बाहेरच्या जिल्ह्यात स्थलांतरित झालेले परतले आहेत़ त्यांच्या तपासण्या झाल्या असून कोणाला लक्षणे नाहीत़प्रश्न : संशयितांच्या मृतांचा आकडा वाढत आहे, कारण काय?उत्तर : सारी अर्थात सिव्हीअर अ‍ॅक्युड रेस्पीरेटरी इलनेस या आजाराची लक्षणे ही कोव्हीड सारखीच असतात़ या आजाराचा प्रार्दुभाव अनेक जिल्ह्यांमध्ये आढळत आहे़ अशा स्थितीत या आजाराचे रुग्णही कोरोना संशयितच मानले जातात़ मात्र, त्यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह असतात़ प्रतिकारक क्षमता कमी असणे, अन्य व्याधी असणे, शिवाय अगदी गंभीरावस्थेत दाखल ही मृत्यू झालेल्या संशयित रुग्णांची परिस्थिती होती़ मात्र, त्यांचे अहवाल निगेटीव्ह आहेत़ त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, लवकर उपचार घ्यावेत़प्रश्न : अहवालास होणाऱ्या विलंबाने काय परिणाम होतात?उत्तर : धुळ्यात किट व काही तांत्रिक अडचणी होत्यात शिवाय तपासण्यां अधिक असल्याने लोड होता़ औरंगाबादलाही हीच परिस्थिती होती़ त्यामुळे अहवालास विलंब झाला़ यामुळे संबंधित रुग्ण व नातेवाईकांच्या मानसिकस्थितीवर परिणाम होतो़ आरोग्य कर्मचाऱ्यांना तर सेवा द्यावीच लागते़प्रश्न : कोरोना रुग्णालय कुठपर्यंत राहील?उत्तर : मार्चच्या सुरुवातीला भारतात तीन रुग्ण होते़ दीड महिन्यात तो आकडा साडेनऊ हजारांवर गेला अशा स्थितीत लॉकडाऊनचे पालन न केल्यास हा प्रार्दुभाव अतिशय वेगाने होऊ शकतो़ त्यामुळे परिस्थित नियंत्रणात येईपर्यंत हे रुग्णालय कोरोना रुग्णालय राहील, त्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी असेल़

टॅग्स :Jalgaonजळगाव