शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पोस्टाच्या माध्यमातून महिन्याला आठ ते दहा हजार वाहन परवान्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST

राज्य प्रादेशिक परिवहन विभागातर्फे नागरिकांची आरटीओ कार्यालयातील फिरफिर थांबवण्यासाठी आरटीओ विभागातर्फे वाहन परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र डाक विभागातर्फे ...

राज्य प्रादेशिक परिवहन विभागातर्फे नागरिकांची आरटीओ कार्यालयातील फिरफिर थांबवण्यासाठी आरटीओ विभागातर्फे वाहन परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र डाक विभागातर्फे घरपोच देण्यात येत आहे. यासाठी राज्य शासन व डाक विभाग यांच्यात करार करण्यात आला आहे. या करारानुसार आरटीओ विभागातर्फे यासाठी डाक विभागाला एका टपालाचे ४५ रुपये देण्यात येतात. महिन्याला जितके टपाल आरटीओ कार्यालयाकडून डाक विभागाला पाठविण्यात येईल, त्याप्रमाणे आरटीओकडून डाक विभागाला पैसे देण्यात येत असतात. दरमहा आरटीओकडून डाक विभागाला आठ ते दहा लाखांचा धनादेश पाठविण्यात येत आहे. दरम्यान, पोस्टाचे कर्मचारी दररोज आरटीओ कार्यालयात जाऊन, वाहन परवाने व आरसी बुक आणून, त्याची पोस्टात नोंदणी करीत असतात. त्यानंतर एका पाकिटात हे वाहन परवाने व आरसी बुक टाकून त्यावर संबंधित व्यक्तीचा पत्ता टाकून ते त्या-त्या भागातील पोस्ट कर्मचाऱ्यांमार्फत वाटप करण्यात येत आहे.

आरटीओ कार्यालयातून हे टपाल आणल्यावर दुसऱ्या दिवसापासूनच वाटपाची प्रक्रिया सुरू होत असल्याचे डाक विभागातर्फे सांगण्यात आले. तसेच ज्या व्यक्तीचे टपाल परत येते, ते टपाल पुन्हा आरटीओ कार्यालयाकडे सोपविण्यात येत असल्याचे डाक विभागातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

रेल्वेच्या डाक विभागामार्फत बाहेरच्या जिल्ह्यातील टपाल रवाना

आरटीओ कार्यालयाकडून डाक विभागाकडे जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातीलही एखाद्या व्यक्तीचे वाहन परवाना व आरसी बुक पाठविण्यात येत असते. हे टपालही डाक विभागातर्फेच वाटप करण्यात येत असते. मात्र, बाहेरगावी हे टपाल रेल्वेच्या डाक विभागातर्फे (आरएमएस) पाठविण्यात येते. आरटीओ कार्यालयाकडून दररोज कधी ३००, तर कधी ४०० टपाल येत असून, त्यातील मोजके टपाल हे बाहेरच्या जिल्ह्यातील असते तर हे टपालही रेल्वेच्या डाक विभागामार्फत त्या त्या जिल्ह्यात रवाना करून पोस्टातर्फे वाटप करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.